शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

बेपत्ता ५७ जणांना मृत घोषित करण्याचा शासनाला प्रस्ताव; इर्शाळवाडीतील पीडितांना सरकारच्या मंजुरीनंतर मदत मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 06:43 IST

मृत जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव सोमवारी रायगड जिल्हाधिकारी कायार्लयाने राज्य सरकारकडे पाठविला आहे.

अलिबाग :   इर्शाळवाडीतील आदिवासी वाडीवरील दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याची भीती व्यक्त होणाऱ्या व शोध न लागलेल्या ५७ जणांना बेपत्ता घोषित करण्यात आले आहे. त्यांना मृत जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव सोमवारी रायगड जिल्हाधिकारी कायार्लयाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. सरकारच्या मंजुरीनंतर संबंधितांच्या नातेवाइकांना शासनाने जाहीर केलेली मदत मिळण्याचा मार्ग  मोकळा  होणार  आहे. प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेला किमान महिनाभराचा अवधी लागण्याची शक्यता  अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली. 

 इर्शाळवाडीत १९ जुलैला रात्री दरड कोसळून झालेल्या  दुर्घटनेत २७ जणांचे मृतदेह मिळाले. चार दिवसांत सुमारे ६० तास शोधकार्य सुरू होते. मात्र मुसळधार पावसामुळे सर्वत्र झालेला चिखल आणि अन्य कोणतीही उपकरणे  घटनास्थळी नेण्याची सुविधा नसल्याने रविवारी सायंकाळी शोधमोहीम थांबविण्यात आली. या  दुर्घटनेतून १४४ वाचले आहेत. यापैकी अनेकजण घटनेच्या रात्रीच स्वत: घरातून डोंगराच्या पायथ्याशी पळत आले होते. अनेक जण जखमी झाले होते. त्यांच्यावर  उपचार करण्यात आले. बहुतांश जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

दुर्घटनेत एकूण २७ मृतदेह मिळाले असून,  ५७ जण बेपत्ता असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. ढिगाऱ्याखाली ते दबले गेले असल्याची शक्यता असून, त्यांचे वाचणे अशक्यप्राय असल्याने त्यांना मृत घोषित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनातर्फे शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. 

शासनाकडून मृत म्हणून घोषणा केल्यानंतर पुढील नुकसान मदतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरडीखालून काढलेल्या २७ मृतदेहांच्या वारसांना पाच लाखांची मदत प्रशासनाकडून  येत्या दोन दिवसांत दिली जाणार असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिली आहे.

३२ कंटेनरमध्ये तात्पुरता निवारा

दुर्घटनेतील १४४ जण सुखरूप आहेत. निर्वासित झालेल्या कुटुंबांसाठी चौक येथे ३२ कंटेनर घरे उपलब्ध करण्यात आली आहेत. या कंटेनरमध्ये कपडे, अंथरुण, गृहोपयोगी वस्तू, तीन महिने पुरेल एवढे रेशन, वीज, पाणी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. निर्वासित झालेले आदिवासी कुटुंब कंटेनरमध्ये वास्तव्यास आहेत.

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण