शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता ५७ जणांना मृत घोषित करण्याचा शासनाला प्रस्ताव; इर्शाळवाडीतील पीडितांना सरकारच्या मंजुरीनंतर मदत मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 06:43 IST

मृत जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव सोमवारी रायगड जिल्हाधिकारी कायार्लयाने राज्य सरकारकडे पाठविला आहे.

अलिबाग :   इर्शाळवाडीतील आदिवासी वाडीवरील दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याची भीती व्यक्त होणाऱ्या व शोध न लागलेल्या ५७ जणांना बेपत्ता घोषित करण्यात आले आहे. त्यांना मृत जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव सोमवारी रायगड जिल्हाधिकारी कायार्लयाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. सरकारच्या मंजुरीनंतर संबंधितांच्या नातेवाइकांना शासनाने जाहीर केलेली मदत मिळण्याचा मार्ग  मोकळा  होणार  आहे. प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेला किमान महिनाभराचा अवधी लागण्याची शक्यता  अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली. 

 इर्शाळवाडीत १९ जुलैला रात्री दरड कोसळून झालेल्या  दुर्घटनेत २७ जणांचे मृतदेह मिळाले. चार दिवसांत सुमारे ६० तास शोधकार्य सुरू होते. मात्र मुसळधार पावसामुळे सर्वत्र झालेला चिखल आणि अन्य कोणतीही उपकरणे  घटनास्थळी नेण्याची सुविधा नसल्याने रविवारी सायंकाळी शोधमोहीम थांबविण्यात आली. या  दुर्घटनेतून १४४ वाचले आहेत. यापैकी अनेकजण घटनेच्या रात्रीच स्वत: घरातून डोंगराच्या पायथ्याशी पळत आले होते. अनेक जण जखमी झाले होते. त्यांच्यावर  उपचार करण्यात आले. बहुतांश जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

दुर्घटनेत एकूण २७ मृतदेह मिळाले असून,  ५७ जण बेपत्ता असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. ढिगाऱ्याखाली ते दबले गेले असल्याची शक्यता असून, त्यांचे वाचणे अशक्यप्राय असल्याने त्यांना मृत घोषित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनातर्फे शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. 

शासनाकडून मृत म्हणून घोषणा केल्यानंतर पुढील नुकसान मदतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरडीखालून काढलेल्या २७ मृतदेहांच्या वारसांना पाच लाखांची मदत प्रशासनाकडून  येत्या दोन दिवसांत दिली जाणार असल्याने निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिली आहे.

३२ कंटेनरमध्ये तात्पुरता निवारा

दुर्घटनेतील १४४ जण सुखरूप आहेत. निर्वासित झालेल्या कुटुंबांसाठी चौक येथे ३२ कंटेनर घरे उपलब्ध करण्यात आली आहेत. या कंटेनरमध्ये कपडे, अंथरुण, गृहोपयोगी वस्तू, तीन महिने पुरेल एवढे रेशन, वीज, पाणी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. निर्वासित झालेले आदिवासी कुटुंब कंटेनरमध्ये वास्तव्यास आहेत.

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण