शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

घारापुरी बेटाच्या विकासासाठी शासन सहकार्य करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 23:19 IST

ग्रामपंचायतीने दिले समस्यांविषयी निवेदन

उरण : जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी बेटावरील ग्रामस्थ व पर्यटकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि रखडलेली विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे ठोस आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यांना दिले. ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी निवेदन दिले आहे.

बेटावर दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक हजेरी लावतात. मात्र, त्यांना सोयी देण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पुरेशी आर्थिक तरतूद नाही. केंद्र सरकारने २०१५ साली कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली आहे. या मंजूर निधीप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने बेटाच्या विकासासाठी आराखडा तयार केला आहे. मात्र, विकास आराखडाच रखडल्याने पर्यटकांना सोईसुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.बेटाच्या चौफेर असलेल्या समुद्रातून मोठ्या प्रमाणात वाहात येणाऱ्या कचऱ्यामुळे किनाऱ्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे, तसेच यामुळे बेटावर प्रदूषण वाढीस लागले आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी निधी आणि योजनाही उपलब्ध आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. घारापुरी ग्रामस्थ आणि पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची समस्यांवर उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. कारण १,२०० लोकवस्तीच्या बेटावर उपलब्ध असलेल्या एकमेव धरणातूनच राजबंदर, शेेेतबंदर आणि मोराबंदर आदी तीन गावांना आणि पर्यटकांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, गळक्या धरणात पावसाळ्यापर्यंत पाणीसाठा शिल्लक राहात नाही. यामुळे पर्यटक आणि ग्रामस्थांना कायम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे अशा अनेक समस्यांविषयी घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच सचिन म्हात्रे आणि अन्य सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी खासदार विनायक राऊत, अनिल देसाई आदी मान्यवरही उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेgram panchayatग्राम पंचायत