शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

घारापुरी बेटाच्या विकासासाठी शासन सहकार्य करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 23:19 IST

ग्रामपंचायतीने दिले समस्यांविषयी निवेदन

उरण : जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी बेटावरील ग्रामस्थ व पर्यटकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि रखडलेली विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे ठोस आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यांना दिले. ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोमवारी निवेदन दिले आहे.

बेटावर दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक हजेरी लावतात. मात्र, त्यांना सोयी देण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पुरेशी आर्थिक तरतूद नाही. केंद्र सरकारने २०१५ साली कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली आहे. या मंजूर निधीप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने बेटाच्या विकासासाठी आराखडा तयार केला आहे. मात्र, विकास आराखडाच रखडल्याने पर्यटकांना सोईसुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.बेटाच्या चौफेर असलेल्या समुद्रातून मोठ्या प्रमाणात वाहात येणाऱ्या कचऱ्यामुळे किनाऱ्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे, तसेच यामुळे बेटावर प्रदूषण वाढीस लागले आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी निधी आणि योजनाही उपलब्ध आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नाही. घारापुरी ग्रामस्थ आणि पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची समस्यांवर उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. कारण १,२०० लोकवस्तीच्या बेटावर उपलब्ध असलेल्या एकमेव धरणातूनच राजबंदर, शेेेतबंदर आणि मोराबंदर आदी तीन गावांना आणि पर्यटकांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, गळक्या धरणात पावसाळ्यापर्यंत पाणीसाठा शिल्लक राहात नाही. यामुळे पर्यटक आणि ग्रामस्थांना कायम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे अशा अनेक समस्यांविषयी घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच सचिन म्हात्रे आणि अन्य सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी खासदार विनायक राऊत, अनिल देसाई आदी मान्यवरही उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेgram panchayatग्राम पंचायत