शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने गरिबांच्या तोंडचा घास पळवला; चित्रा वाघ यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:31 IST

गोरगरिबांच्या तोंडचा घास पळविण्याचे पाप या सरकारने केले आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.

नवी मुंबई : महागाई कमी करू, महिलांना सुरक्षा देऊ, रोजगारनिर्मिती, बेरोजगारी कमी करू आदी मुद्दे या सरकारने निवडणूक काळात मांडून जनतेसमोर एक वेगळे चित्र निर्माण केले होते. गोरगरिबांच्या तोंडचा घास पळविण्याचे पाप या सरकारने केले आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे रविवारी नवी मुंबई जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.हे सरकार सोशल मीडियाच्या माध्यमातून पाटीभर काम केल्याचे सांगत आहेत; परंतु या सरकारचे वाटीभरही काम झाले नसल्याची टीकाही त्यांनी केली. सरकारने दिलेल्या आश्वासनांची सत्यता नागरिकांच्या लक्षात येऊ लागली असून, सरकारने फसवणूक केल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या दिवसांत याचे उत्तर जनता राज्य सरकारला दिल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील अनेक जिल्ह्यांत फिरत असताना कर्जमाफी मिळालेले शेतकरी आढळले नसून, शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे त्या या वेळी म्हणाल्या. या मेळाव्याला माजी मंत्री गणेश नाईक, राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, महिला जिल्हा अध्यक्षा माधुरी सुतार आदी उपस्थित होते.खोटे बोलणे या सरकारचा धंदाया सरकारने आमच्या नेत्यांवर खोटेनाटे आरोप केले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांचे सरकार आहे. जे आरोप केले त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही ही वस्तुस्थिती असून, खोटे बोला; पण रेटून बोला, हा या सरकारचा धंदा असल्याचा आरोप वाघ यांनी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाGovernmentसरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी