शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सरकारने गरिबांच्या तोंडचा घास पळवला; चित्रा वाघ यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:31 IST

गोरगरिबांच्या तोंडचा घास पळविण्याचे पाप या सरकारने केले आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.

नवी मुंबई : महागाई कमी करू, महिलांना सुरक्षा देऊ, रोजगारनिर्मिती, बेरोजगारी कमी करू आदी मुद्दे या सरकारने निवडणूक काळात मांडून जनतेसमोर एक वेगळे चित्र निर्माण केले होते. गोरगरिबांच्या तोंडचा घास पळविण्याचे पाप या सरकारने केले आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे रविवारी नवी मुंबई जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला.हे सरकार सोशल मीडियाच्या माध्यमातून पाटीभर काम केल्याचे सांगत आहेत; परंतु या सरकारचे वाटीभरही काम झाले नसल्याची टीकाही त्यांनी केली. सरकारने दिलेल्या आश्वासनांची सत्यता नागरिकांच्या लक्षात येऊ लागली असून, सरकारने फसवणूक केल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या दिवसांत याचे उत्तर जनता राज्य सरकारला दिल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील अनेक जिल्ह्यांत फिरत असताना कर्जमाफी मिळालेले शेतकरी आढळले नसून, शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे त्या या वेळी म्हणाल्या. या मेळाव्याला माजी मंत्री गणेश नाईक, राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, महिला जिल्हा अध्यक्षा माधुरी सुतार आदी उपस्थित होते.खोटे बोलणे या सरकारचा धंदाया सरकारने आमच्या नेत्यांवर खोटेनाटे आरोप केले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांचे सरकार आहे. जे आरोप केले त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही ही वस्तुस्थिती असून, खोटे बोला; पण रेटून बोला, हा या सरकारचा धंदा असल्याचा आरोप वाघ यांनी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाGovernmentसरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी