शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

पूरग्रस्तांना मदत देण्यात सरकार असंवेदनशील - सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 01:52 IST

गेल्या २० दिवसांपासून कोकणासह पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात राज्य सरकार तोकडे पडत आहे.

महाड : गेल्या २० दिवसांपासून कोकणासह पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात राज्य सरकार तोकडे पडत आहे. यावरून सरकारची पूरग्रस्तांबाबत असंवेदनशीलता दिसून येत असल्याचा आरोप रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केला.महाडमधील पूरस्थितीची तटकरे यांनी शनिवारी पाहणी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी माजी आ. माणिक जगताप, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद घोसाळकर आदी उपस्थित होते. पूर ओसरल्यावर केवळ दोन दिवसांत महाड शहरात नगरपरिषदेने केलेल्या स्वच्छतेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. आपद्ग्रस्तांना मदत देण्यासाठी २००५ च्या शासननिर्णयाची अंमलबजावणी करावी. त्या वेळी विलासराव देशमुख सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात केलेल्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे आपद्ग्रस्तांना व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर त्याच्या चारपट नुकसानभरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी तटकरे यांनी केली. पूर ओसरून आज पाच दिवस झाले तरी पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचली नाही. पूरग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यात विमा कंपन्या टाळाटाळ करत असल्याचे तटकरेंनी नमूद केले.महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, मुख्यमंत्री योग्य वेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली जाईल, असे सांगतात. हे जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री कुठल्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत, असा प्रश्न तटकरे यांनी उपस्थित केला. सरकारच्या मनात दानत असेल तर सर्वकाही शक्य आहे.२००५ मध्ये दरडी कोसळून स्थलांतर केलेल्या दासगाव येथील दरडग्रस्तांंना अद्यापही घरांसाठी उर्वरित निधी मिळालेला नाही. हा निधी त्वरित द्यावा, अशा सूचना खा. तटकरे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना दिल्या. कमकुवत झालेल्या दादली पुलाची दुरुस्ती न करता नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी तटकरे यांनी या वेळी केली.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेRaigadरायगड