शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पूरग्रस्तांना मदत देण्यात सरकार असंवेदनशील - सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 01:52 IST

गेल्या २० दिवसांपासून कोकणासह पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात राज्य सरकार तोकडे पडत आहे.

महाड : गेल्या २० दिवसांपासून कोकणासह पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात राज्य सरकार तोकडे पडत आहे. यावरून सरकारची पूरग्रस्तांबाबत असंवेदनशीलता दिसून येत असल्याचा आरोप रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केला.महाडमधील पूरस्थितीची तटकरे यांनी शनिवारी पाहणी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी माजी आ. माणिक जगताप, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद घोसाळकर आदी उपस्थित होते. पूर ओसरल्यावर केवळ दोन दिवसांत महाड शहरात नगरपरिषदेने केलेल्या स्वच्छतेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. आपद्ग्रस्तांना मदत देण्यासाठी २००५ च्या शासननिर्णयाची अंमलबजावणी करावी. त्या वेळी विलासराव देशमुख सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात केलेल्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे आपद्ग्रस्तांना व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर त्याच्या चारपट नुकसानभरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी तटकरे यांनी केली. पूर ओसरून आज पाच दिवस झाले तरी पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचली नाही. पूरग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यात विमा कंपन्या टाळाटाळ करत असल्याचे तटकरेंनी नमूद केले.महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, मुख्यमंत्री योग्य वेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली जाईल, असे सांगतात. हे जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री कुठल्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत, असा प्रश्न तटकरे यांनी उपस्थित केला. सरकारच्या मनात दानत असेल तर सर्वकाही शक्य आहे.२००५ मध्ये दरडी कोसळून स्थलांतर केलेल्या दासगाव येथील दरडग्रस्तांंना अद्यापही घरांसाठी उर्वरित निधी मिळालेला नाही. हा निधी त्वरित द्यावा, अशा सूचना खा. तटकरे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना दिल्या. कमकुवत झालेल्या दादली पुलाची दुरुस्ती न करता नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी तटकरे यांनी या वेळी केली.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेRaigadरायगड