शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

चांगल्या विचारांचे रोपण आवश्यक

By admin | Updated: February 23, 2016 02:18 IST

चांगल्या विचारांचे रोपण केल्यास सर्वच प्रकारचे प्रदूषण दूर होतील. विश्वप्रार्थना सर्वांच्या मनात रु जली पाहिजे. चांगले विचार कधीही वाया जात नाहीत, त्याला अन्न, पाणी विजेची

पनवेल : चांगल्या विचारांचे रोपण केल्यास सर्वच प्रकारचे प्रदूषण दूर होतील. विश्वप्रार्थना सर्वांच्या मनात रु जली पाहिजे. चांगले विचार कधीही वाया जात नाहीत, त्याला अन्न, पाणी विजेची तमा नसते, असे मौलिक मार्गदर्शन जीवनविद्यामिशनचे प्रल्हाद पै यांनी केले. पनवेल येथील मिडलक्लास सोसायटीच्या मैदानात रविवारी लोकमत व पनवेल नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने जीवन विद्या मिशन परिवाराच्या गौरव व सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जीवन विद्या मिशनच्या कार्याबद्दल पै यांना मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत, पाणीपुरवठा सभापती अनिल भगत, शिवसेना नगरसेवक रमेश गुडेकर, बांधकाम सभापती राजू सोनी, जीवन विद्या मिशनचे अध्यक्ष प्रदीप सुभेदार, सचिव आनंद राणे, कोषाध्यक्ष उमेश पांगम, प्रभाकर उंडे, तुषार राणे, सुनील मोरे, निरंजन खवळे, संतोष सावंत, लोकमत मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, साहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला, लोकमत ठाणेचे साहाय्यक महाव्यवस्थापक राघवेंद्र शेठ, पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन अभिनेता विघ्नेश जोशी यांनी केले. कार्यक्र माची सुरु वात जीवन विद्या मिशनच्या कार्याची माहिती देणाऱ्या ध्वनिचित्रफितीतून करण्यात आली. यानंतर लोकमतने दिलेल्या पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमात पै यांनी आठवणींना उजाळा दिला. २००६ मध्ये नाशिक येथे लोकमत व जीवन विद्या मिशन यांचे एकमत झाले तर क्र ांती होईल, असे उद्गार सद्गुरू वामनराव पै यांनी काढले होते. लोकमतने जीवन विद्या मिशन परिवाराला पुरस्कार देवून गौरवले आहे. त्यामुळे हे नाते आणखी दृढ होत चालले असल्याचे त्यांनी सांगितले. हा पुरस्कार म्हणजे लोकमतने जीवन विद्या मिशनच्या ६० वर्षांच्या कार्याची दखल घेतल्याची पावती आहे. लोकमत हे वाचनीय वृत्तपत्र असून, राज्यभरात लोकमत चांगले काम करीत असून, वाचकांची संख्या २० लाखांच्या वर असल्याचे सांगत लोकमतच्या सखी मंच, दीपोत्सव, कालदर्शिका आदी उपक्रमांचीदेखील पै यांनी भरभरून स्तुती केली. (प्रतिनिधी)शिस्तबद्ध कार्यक्र मात हजारोंची उपस्थितीकार्यक्रमाला पनवेलकरांबरोबरच ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबईमधील हजारो सदस्यांनी उपस्थिती दर्शवली. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने पार पडलेला या कार्यक्रमात ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या जीवन विद्या मिशनच्या घोषवाक्याची प्रचिती आली. पै यांनी लोकमतच्या ‘काहीतरी कर पनवेलकर’ या उपक्रमाचेही कौतुक केले. माध्यम समाजातील महत्त्वाचा घटकसमाजात चांगल्या गोष्टीही घडत असतात. त्या दाखविण्याचे काम माध्यमांनी केले पाहिजे. मागील काळात बुवाबाजीवर खूप टीका झाली. मात्र सर्वच आध्यात्मिक संघटनांना यामध्ये गृहीत धरता येणार नाही. सध्या वैचारिक प्रदूषणही वाढत आहे, त्यावर चांगल्या विचारांनी मात होऊ शकते. माध्यमांनी याकरिता पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला पै यांनी दिला.