शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या विचारांचे रोपण आवश्यक

By admin | Updated: February 23, 2016 02:18 IST

चांगल्या विचारांचे रोपण केल्यास सर्वच प्रकारचे प्रदूषण दूर होतील. विश्वप्रार्थना सर्वांच्या मनात रु जली पाहिजे. चांगले विचार कधीही वाया जात नाहीत, त्याला अन्न, पाणी विजेची

पनवेल : चांगल्या विचारांचे रोपण केल्यास सर्वच प्रकारचे प्रदूषण दूर होतील. विश्वप्रार्थना सर्वांच्या मनात रु जली पाहिजे. चांगले विचार कधीही वाया जात नाहीत, त्याला अन्न, पाणी विजेची तमा नसते, असे मौलिक मार्गदर्शन जीवनविद्यामिशनचे प्रल्हाद पै यांनी केले. पनवेल येथील मिडलक्लास सोसायटीच्या मैदानात रविवारी लोकमत व पनवेल नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने जीवन विद्या मिशन परिवाराच्या गौरव व सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जीवन विद्या मिशनच्या कार्याबद्दल पै यांना मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत, पाणीपुरवठा सभापती अनिल भगत, शिवसेना नगरसेवक रमेश गुडेकर, बांधकाम सभापती राजू सोनी, जीवन विद्या मिशनचे अध्यक्ष प्रदीप सुभेदार, सचिव आनंद राणे, कोषाध्यक्ष उमेश पांगम, प्रभाकर उंडे, तुषार राणे, सुनील मोरे, निरंजन खवळे, संतोष सावंत, लोकमत मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, साहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला, लोकमत ठाणेचे साहाय्यक महाव्यवस्थापक राघवेंद्र शेठ, पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन अभिनेता विघ्नेश जोशी यांनी केले. कार्यक्र माची सुरु वात जीवन विद्या मिशनच्या कार्याची माहिती देणाऱ्या ध्वनिचित्रफितीतून करण्यात आली. यानंतर लोकमतने दिलेल्या पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमात पै यांनी आठवणींना उजाळा दिला. २००६ मध्ये नाशिक येथे लोकमत व जीवन विद्या मिशन यांचे एकमत झाले तर क्र ांती होईल, असे उद्गार सद्गुरू वामनराव पै यांनी काढले होते. लोकमतने जीवन विद्या मिशन परिवाराला पुरस्कार देवून गौरवले आहे. त्यामुळे हे नाते आणखी दृढ होत चालले असल्याचे त्यांनी सांगितले. हा पुरस्कार म्हणजे लोकमतने जीवन विद्या मिशनच्या ६० वर्षांच्या कार्याची दखल घेतल्याची पावती आहे. लोकमत हे वाचनीय वृत्तपत्र असून, राज्यभरात लोकमत चांगले काम करीत असून, वाचकांची संख्या २० लाखांच्या वर असल्याचे सांगत लोकमतच्या सखी मंच, दीपोत्सव, कालदर्शिका आदी उपक्रमांचीदेखील पै यांनी भरभरून स्तुती केली. (प्रतिनिधी)शिस्तबद्ध कार्यक्र मात हजारोंची उपस्थितीकार्यक्रमाला पनवेलकरांबरोबरच ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबईमधील हजारो सदस्यांनी उपस्थिती दर्शवली. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने पार पडलेला या कार्यक्रमात ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या जीवन विद्या मिशनच्या घोषवाक्याची प्रचिती आली. पै यांनी लोकमतच्या ‘काहीतरी कर पनवेलकर’ या उपक्रमाचेही कौतुक केले. माध्यम समाजातील महत्त्वाचा घटकसमाजात चांगल्या गोष्टीही घडत असतात. त्या दाखविण्याचे काम माध्यमांनी केले पाहिजे. मागील काळात बुवाबाजीवर खूप टीका झाली. मात्र सर्वच आध्यात्मिक संघटनांना यामध्ये गृहीत धरता येणार नाही. सध्या वैचारिक प्रदूषणही वाढत आहे, त्यावर चांगल्या विचारांनी मात होऊ शकते. माध्यमांनी याकरिता पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला पै यांनी दिला.