शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

चांगल्या विचारांचे रोपण आवश्यक

By admin | Updated: February 23, 2016 02:18 IST

चांगल्या विचारांचे रोपण केल्यास सर्वच प्रकारचे प्रदूषण दूर होतील. विश्वप्रार्थना सर्वांच्या मनात रु जली पाहिजे. चांगले विचार कधीही वाया जात नाहीत, त्याला अन्न, पाणी विजेची

पनवेल : चांगल्या विचारांचे रोपण केल्यास सर्वच प्रकारचे प्रदूषण दूर होतील. विश्वप्रार्थना सर्वांच्या मनात रु जली पाहिजे. चांगले विचार कधीही वाया जात नाहीत, त्याला अन्न, पाणी विजेची तमा नसते, असे मौलिक मार्गदर्शन जीवनविद्यामिशनचे प्रल्हाद पै यांनी केले. पनवेल येथील मिडलक्लास सोसायटीच्या मैदानात रविवारी लोकमत व पनवेल नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने जीवन विद्या मिशन परिवाराच्या गौरव व सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जीवन विद्या मिशनच्या कार्याबद्दल पै यांना मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत, पाणीपुरवठा सभापती अनिल भगत, शिवसेना नगरसेवक रमेश गुडेकर, बांधकाम सभापती राजू सोनी, जीवन विद्या मिशनचे अध्यक्ष प्रदीप सुभेदार, सचिव आनंद राणे, कोषाध्यक्ष उमेश पांगम, प्रभाकर उंडे, तुषार राणे, सुनील मोरे, निरंजन खवळे, संतोष सावंत, लोकमत मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, साहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला, लोकमत ठाणेचे साहाय्यक महाव्यवस्थापक राघवेंद्र शेठ, पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन अभिनेता विघ्नेश जोशी यांनी केले. कार्यक्र माची सुरु वात जीवन विद्या मिशनच्या कार्याची माहिती देणाऱ्या ध्वनिचित्रफितीतून करण्यात आली. यानंतर लोकमतने दिलेल्या पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमात पै यांनी आठवणींना उजाळा दिला. २००६ मध्ये नाशिक येथे लोकमत व जीवन विद्या मिशन यांचे एकमत झाले तर क्र ांती होईल, असे उद्गार सद्गुरू वामनराव पै यांनी काढले होते. लोकमतने जीवन विद्या मिशन परिवाराला पुरस्कार देवून गौरवले आहे. त्यामुळे हे नाते आणखी दृढ होत चालले असल्याचे त्यांनी सांगितले. हा पुरस्कार म्हणजे लोकमतने जीवन विद्या मिशनच्या ६० वर्षांच्या कार्याची दखल घेतल्याची पावती आहे. लोकमत हे वाचनीय वृत्तपत्र असून, राज्यभरात लोकमत चांगले काम करीत असून, वाचकांची संख्या २० लाखांच्या वर असल्याचे सांगत लोकमतच्या सखी मंच, दीपोत्सव, कालदर्शिका आदी उपक्रमांचीदेखील पै यांनी भरभरून स्तुती केली. (प्रतिनिधी)शिस्तबद्ध कार्यक्र मात हजारोंची उपस्थितीकार्यक्रमाला पनवेलकरांबरोबरच ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबईमधील हजारो सदस्यांनी उपस्थिती दर्शवली. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने पार पडलेला या कार्यक्रमात ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या जीवन विद्या मिशनच्या घोषवाक्याची प्रचिती आली. पै यांनी लोकमतच्या ‘काहीतरी कर पनवेलकर’ या उपक्रमाचेही कौतुक केले. माध्यम समाजातील महत्त्वाचा घटकसमाजात चांगल्या गोष्टीही घडत असतात. त्या दाखविण्याचे काम माध्यमांनी केले पाहिजे. मागील काळात बुवाबाजीवर खूप टीका झाली. मात्र सर्वच आध्यात्मिक संघटनांना यामध्ये गृहीत धरता येणार नाही. सध्या वैचारिक प्रदूषणही वाढत आहे, त्यावर चांगल्या विचारांनी मात होऊ शकते. माध्यमांनी याकरिता पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला पै यांनी दिला.