शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
6
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
7
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
8
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
9
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
10
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
11
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
12
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
13
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
14
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
16
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
17
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
18
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
19
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
20
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!

जिल्ह्यात २०० कोटींचे पॅकेज द्या; मच्छीमारांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:22 IST

मत्स्य व्यवसाय आयुक्तांना दिले निवेदन

अलिबाग : अवकाळी पाऊस, क्यार आणि महाचक्रिवादळामुळे रायगड जिल्ह्यातील मासेमारी करणारे, तसेच त्याच्यावर उदरनिर्वाह करणाऱ्यांचे तब्बल २०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने आर्थिक पॅकेज मंजूर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाने केली आहे. तसे निवेदन त्यांनी राज्याच्या मत्स्य व्यवसाय आयुक्तांना गुरुवारी दिले.राज्यात पडलेल्या परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून राज्य सरकारने दहा हजार कोटी रु पयांची तरतूद केली आहे. मात्र, क्यार वादळ आणि महाचक्रिवादळामुळे मच्छीमारांच्या नुकसानभरपाईबाबत अद्याप कोणतीही भूमिका सरकारने स्पष्ट केलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून अरबी समुदातील क्यार आणि महाचक्रिवादळामुळे मासेमारी करणाºयांना मासेमारी करण्यासाठी जाताच आलेले नाही. त्यामुळे त्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.जिल्ह्यामध्ये एक नौका सहा सिलिंडर व बिगर यांत्रिकी नौकांची संख्याही तीन हजार ४५५ आहे. त्यांचे सुमारे १२७ कोटी दहा लाख तीन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मच्छीविक्रेतींची संख्या ही सात हजार ४७७ आहे. त्यांचे २० कोटी ७६ लाख २५ हजार ५०० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच मच्छी सुकवणारे (महिला) तीन हजार ८१२ अशी संख्या आहे. त्यांना नऊ कोटी २८ लाख ३८ हजार रुपयांचा फटका बसला आहे.जिल्ह्यात आठ हजार २३९ खलाशांचे ३४ कोटी ५४ लाख ३९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अन्य कामगार आणि जाळी विणणाºया दोन हजार ३६४ जणांना चार कोटी ७९ लाख १६ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. असे एकूण १९६ कोटी ४८ लाख २१ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे, असे निवेदनात रायगड जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघाचे अध्यक्ष शेषनाथ कोळी यांनी नमूद केले आहे.सरकारने मच्छीमार समाजाला न्याय द्यावा, तरच त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी राज्य मच्छीमार संघाचे अध्यक्ष रामदास संधे, अलिबाग मच्छीमार संघाचे अध्यक्ष विजय तांडेल, संचालक सत्यजित पेरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :fishermanमच्छीमार