शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

भरावामुळे घारापुरी बेटाची धूप

By admin | Updated: December 27, 2016 02:41 IST

जेएनपीटी बंदरातील भरावांच्या कामांमुळे समुद्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावरील किनारपट्टीचे बांध

- मधुकर ठाकूर,  उरणजेएनपीटी बंदरातील भरावांच्या कामांमुळे समुद्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावरील किनारपट्टीचे बांध बंदिस्ती, संरक्षक तट सागरी लाटांमुळे पार उद्ध्वस्त झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी बेटालगत संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर संरक्षक भिंतीचे काम झालेच नसल्याने बेटावरील चहुबाजूंच्या सागरी किनाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. घारापुरी बेटावर समुद्राचे पाणी किनारपट्टीची पातळी सोडून १० मीटर आत घुसू लागले आहे. रहदारीचे रस्तेही पाण्याखाली जाऊ लागले आहेत. बेटाच्या अस्तित्वालाच गंभीर धोका निर्माण झाल्याची तक्रार शिवसेनेचे उपविभाग प्रमुख तथा घारापुरी ग्रा. पं. सदस्य बळीराम ठाकूर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.जेएनपीटी बंदराची उभारणी १९८९ करण्यात आली. तेव्हापासून बंदराचा विकासाच्या नावाखाली आणखी दोन बंदरे खासगीकरणातून उभारण्यात आली आहेत. त्यानंतर बंदरातील सर्वाधिक लांबीचे तसेच क्षमतेचे चौथे बंदर उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. विविध बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात मोठ्या प्रमाणात दगड, मातीचे भराव के ले आहेत. समुद्रात होत असलेल्या प्रचंड भरावामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. परिणामी समुद्राचे पाणी किनाऱ्यावरील बांध बंदिस्ती, संरक्षक तट उद्ध्वस्त करीत बेटांवरील गावांच्या दिशेने वाढू लागले आहे. जेएनपीटीच्याकामामुळे पर्यावरणाच्या होत असलेल्या हानीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस. एच. पडवळ नवी मुंबई यांनी २३ जानेवारी २०१७ रोजी जनसुनावणी घेण्याचे जाहीर केले आहे. या जनसुनावणीदरम्यान प्रकल्प आणि पर्यावरणाबाबत तक्रारी, सूचना, टीका टिप्पणीवर चर्चा केली जाणार आहे. जनसुनावणीला अनुसरून शिवसेनेचे उपविभाग प्रमुख तथा घारापुरी ग्रा. पं. सदस्य बळीराम ठाकूर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.पर्यटक आणि नागरिकांसाठी रहदारीसाठी असलेले प्रमुख रस्तेही इतिहासजमा होण्याच्या स्थितीत आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास आणि त्याकडे शासन, जेएनपीटीने वेळीच लक्ष दिल्यास बेटावरील रहदारीसाठी उरलेले रस्तेही समुद्राच्या पाण्यात वाहून जाण्याची भीती बळीराम ठाकूर यांनी तक्रारीतून व्यक्त केली आहे. जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावर देश-विदेशातून वर्षभर लाखो पर्यटक ऐतिहासिक लेणी पाहण्यासाठी येतात. मात्र अशा या जागतिक दर्जा लाभलेल्या बेटासभोवार असलेल्या सागरी किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप होवून समुद्राच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. या गंभीर प्रकाराकडे शासनानेही दुर्लक्षच चालविलेले आहे. जेएनपीटीच्या विविध बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात सातत्याने होणाऱ्या प्रचंड भरावामुळे सागरी किनाऱ्यांची होणारी धूप, समुद्राच्या सातत्याने वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीमुळे बेटाला होऊ पाहणाऱ्या धोक्याबाबत जेएनपीटीने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी घारापुरी ग्रा. पं. ने केली होती. बेटावर समुद्रातून येणारा कचरा, प्लास्टिक आणि तेलतवंगामुळे सागरी किनारा पार काळवंडला आहे. तसेच दुर्मीळ खारफुटीची झाडेही नष्ट होत चालली आहेत. सातत्याने येणाऱ्या कचऱ्यामुळे किनारपट्टी दुर्गंधीयुक्त बनत चालली आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसायही अडचणीत आला आहे. बेटाच्या होत चाललेल्या विद्रूपीकरणाचे विदेशीपर्यटक चित्रीकरण करीत आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावरील बेटाचे नाव खराब होत चालले आहे. याकडेही बळीराम ठाकूर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तक्रारीतून लक्ष वेधले आहे. जेएनपीटीच्या चॅनेलची खोली वाढविणे, चौथे बंदर उभारण्याच्या कामासाठी सुरू असलेल्या भरावामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. सागराच्या प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे घारापुरी बेटावरील शेतबंदर, मोरा बंदर, राजबंदर या तिन्ही गावांवर असलेल्या किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. सर्वाधिक राजबंदर जेट्टी ते स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याची, समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने पार दुर्दशा झाली आहे. जमिनीच्या झालेल्या प्रचंड धूपमुळे पार खचून गेला आहे.- बळीराम ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य, घारापुरी