शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

वादळ शमल्याने गेटवे - एलिफंटा लॉन्च सुरू, मासेमारीही पूर्ववत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 08:47 IST

मागील पाच दिवसांपासून वादळ, खराब हवामानामुळे डोंगराएवढ्या लाटा, ६५ ते ७० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, जोरदार पाऊस यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता.

उरण : तीन नंबरचा बावटा उतरविण्यात आल्याने गेटवे - एलिफंटा, गेटवे - जेएनपीए, मोरा - भाऊचा धक्का, करंजा - रेवस या मार्गांवरील सागरी वाहतुकीबरोबर शनिवारपासून मासेमारीही पूर्ववत सुरू झाली आहे.मागील पाच दिवसांपासून वादळ, खराब हवामानामुळे डोंगराएवढ्या लाटा, ६५ ते ७० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, जोरदार पाऊस यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. त्यामुळे विविध बंदरांत खबरदारीची उपाययोजना म्हणून धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला होता. या धोक्याच्या इशाऱ्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून गेटवे - एलिफंटा प्रवासी सेवा खंडित झाल्याने या सागरी मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी, पर्यटकांची गैरसोय झाली  होती. धोक्याच्या इशाऱ्यानंतर या सागरी मार्गावरील प्रवासी, पर्यटक वाहतूक कोलमडली होती.तीन नंबरचा बावटा आता उतरविण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारपासून सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. तसेच मासेमारी बोटीही रवाना झाल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे अधिकारी प्रकाश कांदळकर यांनी दिली. वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवासी आणि पर्यटक यांना मोठा दिलासा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

मासेमारीवरही विपरीत परिणाम खराब हवामानामुळे मासेमारीवरही विपरित परिणाम झाला होता. धोक्याच्या इशाऱ्यानंतर स्थानिक मासळी बाजारात मिळेनाशी झाली.  गेटवे - एलिफंटा दरम्यान पर्यटक वाहतूक कोलमडली होती. पर्यटकांअभावी बेटावरील व्यावसायिकांना आर्थिक नुकसानाला सामोरे जाण्याची वेळ आली होती.  

टॅग्स :Fishermanमच्छीमार