शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळाच्या प्रकोपात बागायतदार आडवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 01:54 IST

६६ हजार हेक्टर क्षेत्राला बसला फटका; विशेष आर्थिक पॅकेजची मागणी

आविष्कार देसाई

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळामुळेरायगड जिल्ह्यातील सुमारे ६६ हजार हेक्टर क्षेत्रावरील नारळ सुपारीसह आंबा, काजूच्या फळबागा पुरत्या झोपल्या आहेत. बागायतदार शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे न भरुन येणारे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारने बागायतदार शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी होत आहे.

भारतीय अर्थ व्यवस्थेची चक्रे अधिक गतीमान होण्यासाठी उद्योगांबरोबरच कृषी क्षेत्राला आजही अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र ३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे अर्थ व्यवस्थेचे दुसरे चाक कोलमडून पडले आहे. निसर्गाचा प्रकोप इतका भयानक होता की, रायगड जिल्ह्यातील नारळ, सुपारी, आंबा, काजूंच्या बागा या अशरक्ष: भूईसपाट झाल्या आहेत. अलिबाग, मुरुड, पेण, कर्जत, रोहे, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर या तालुक्यात सर्वाधिक फटका बसला आहे. वर्षानुवर्षे संगोपन केलेली झाडे नजरेच्या समोर भूईसपाट होताना पाहण्यावाचून बागायतदार शेतकºयांसमोर कोणताच पर्याय नव्हता. वादळाने तडाखा दिल्याने सर्व तयार झालेले आंबे खाली कोसळले. तशीच स्थिती नारळ, सुपारी, काजूंच्या बागांची झाली आहे.

रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नारळ-सुपारी विविध राज्यांमध्ये पाठवण्यात येतात. पण वादळामध्ये बागांचे मोठे नुकसान झाल्याने नारळ, सुपारी बागायतदारांना प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला आहे, अशी माहिती मुरुड तालुक्यातील शेतकरी विनोद पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. सरकार आम्हाला मदत करेलही मात्र ती तुटपूंजी असणार आहे. कारण एक झाड किमान २० वर्षे फळ देते. त्यामुळे एकदाच मदत मिळून उपयोग होणार नाही. यासाठी सरकारने सरासरी काढून विशेष आर्थिक नुकसान भरपाई दिल्यास वादळात फटका बसलेल्या शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असेही पाटील यांनी स्पष्ट केले.निसर्ग चक्रीवादळामुळे येथील शेती, नारळ, सुपारी, काजू, आंबा या बागायती उध्वस्त झाल्या आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतरच नुकसानीचा अंदाज येऊ शकेल.- पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधिक्षक, अधिकारी, रायगडनिसर्ग चक्रीवादळाने संबंध कोकणातील शेती आणि बागायची भूईसापट केल्या आहेत. मोठ्या संख्येने घर, विजेच खांब, विज जनित्र यांचेही नुकसान झाले आहे. रायगडातील नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी कोकणाला पाच हजार कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - खासदार सुनील तटकरे, रायगडआंबा बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसानझाडाला लागलेले आंबे खाली उतरवणे बाकी असतानाच वादळाने आमच्या बागा उध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे आंबा बागायतदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेती कर्जाचे हफ्ते कसे फेडायचे, मजुरी, मशागत अशा सर्व गोष्टीच वाया गेल्या आहेत, असे अलिबाग-शेखाचे गाव येथील आंबा बागायतदार परेश म्हात्रे यांनी सांगितेल.बागेतील आंब्याची झाडे जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळे कायम स्वरुपी उत्पादन देणारे झाड दगावले आहे. सरकारने विशेष आर्थिक नुकसान भरपाई देताना याचाही विचार करणे अधिक गरजेचे आहे. असे केले तरच बागायतदार तग धरु शकतील अन्यथा बागांप्रमाणे तेही कमरेतून मोडून पडतील याकडेही त्यांनी लक्ष वेधले.रायगडमधील बागायतीचे क्षेत्र : रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे २१ हजार हेक्टरवर नारळाचे उत्पादन घेतले जाते. तसेच नऊ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये सुपारीचे पीक घेतले जाते. सुमारे २६ हजार हेक्टरवर आंब्याची लागवड होते, तर तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्रावर काजूची शेती केली जाते.

टॅग्स :Raigadरायगडcycloneचक्रीवादळ