शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
8
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
9
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
10
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
11
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
12
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
13
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
14
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
15
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
16
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
17
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
18
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
19
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
20
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!

चक्रीवादळाच्या प्रकोपात बागायतदार आडवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 01:54 IST

६६ हजार हेक्टर क्षेत्राला बसला फटका; विशेष आर्थिक पॅकेजची मागणी

आविष्कार देसाई

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळामुळेरायगड जिल्ह्यातील सुमारे ६६ हजार हेक्टर क्षेत्रावरील नारळ सुपारीसह आंबा, काजूच्या फळबागा पुरत्या झोपल्या आहेत. बागायतदार शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे न भरुन येणारे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारने बागायतदार शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी होत आहे.

भारतीय अर्थ व्यवस्थेची चक्रे अधिक गतीमान होण्यासाठी उद्योगांबरोबरच कृषी क्षेत्राला आजही अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र ३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे अर्थ व्यवस्थेचे दुसरे चाक कोलमडून पडले आहे. निसर्गाचा प्रकोप इतका भयानक होता की, रायगड जिल्ह्यातील नारळ, सुपारी, आंबा, काजूंच्या बागा या अशरक्ष: भूईसपाट झाल्या आहेत. अलिबाग, मुरुड, पेण, कर्जत, रोहे, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर या तालुक्यात सर्वाधिक फटका बसला आहे. वर्षानुवर्षे संगोपन केलेली झाडे नजरेच्या समोर भूईसपाट होताना पाहण्यावाचून बागायतदार शेतकºयांसमोर कोणताच पर्याय नव्हता. वादळाने तडाखा दिल्याने सर्व तयार झालेले आंबे खाली कोसळले. तशीच स्थिती नारळ, सुपारी, काजूंच्या बागांची झाली आहे.

रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नारळ-सुपारी विविध राज्यांमध्ये पाठवण्यात येतात. पण वादळामध्ये बागांचे मोठे नुकसान झाल्याने नारळ, सुपारी बागायतदारांना प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला आहे, अशी माहिती मुरुड तालुक्यातील शेतकरी विनोद पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. सरकार आम्हाला मदत करेलही मात्र ती तुटपूंजी असणार आहे. कारण एक झाड किमान २० वर्षे फळ देते. त्यामुळे एकदाच मदत मिळून उपयोग होणार नाही. यासाठी सरकारने सरासरी काढून विशेष आर्थिक नुकसान भरपाई दिल्यास वादळात फटका बसलेल्या शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असेही पाटील यांनी स्पष्ट केले.निसर्ग चक्रीवादळामुळे येथील शेती, नारळ, सुपारी, काजू, आंबा या बागायती उध्वस्त झाल्या आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतरच नुकसानीचा अंदाज येऊ शकेल.- पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधिक्षक, अधिकारी, रायगडनिसर्ग चक्रीवादळाने संबंध कोकणातील शेती आणि बागायची भूईसापट केल्या आहेत. मोठ्या संख्येने घर, विजेच खांब, विज जनित्र यांचेही नुकसान झाले आहे. रायगडातील नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी कोकणाला पाच हजार कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - खासदार सुनील तटकरे, रायगडआंबा बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसानझाडाला लागलेले आंबे खाली उतरवणे बाकी असतानाच वादळाने आमच्या बागा उध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे आंबा बागायतदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेती कर्जाचे हफ्ते कसे फेडायचे, मजुरी, मशागत अशा सर्व गोष्टीच वाया गेल्या आहेत, असे अलिबाग-शेखाचे गाव येथील आंबा बागायतदार परेश म्हात्रे यांनी सांगितेल.बागेतील आंब्याची झाडे जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळे कायम स्वरुपी उत्पादन देणारे झाड दगावले आहे. सरकारने विशेष आर्थिक नुकसान भरपाई देताना याचाही विचार करणे अधिक गरजेचे आहे. असे केले तरच बागायतदार तग धरु शकतील अन्यथा बागांप्रमाणे तेही कमरेतून मोडून पडतील याकडेही त्यांनी लक्ष वेधले.रायगडमधील बागायतीचे क्षेत्र : रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे २१ हजार हेक्टरवर नारळाचे उत्पादन घेतले जाते. तसेच नऊ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये सुपारीचे पीक घेतले जाते. सुमारे २६ हजार हेक्टरवर आंब्याची लागवड होते, तर तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्रावर काजूची शेती केली जाते.

टॅग्स :Raigadरायगडcycloneचक्रीवादळ