शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळाच्या प्रकोपात बागायतदार आडवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 01:54 IST

६६ हजार हेक्टर क्षेत्राला बसला फटका; विशेष आर्थिक पॅकेजची मागणी

आविष्कार देसाई

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळामुळेरायगड जिल्ह्यातील सुमारे ६६ हजार हेक्टर क्षेत्रावरील नारळ सुपारीसह आंबा, काजूच्या फळबागा पुरत्या झोपल्या आहेत. बागायतदार शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे न भरुन येणारे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारने बागायतदार शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी होत आहे.

भारतीय अर्थ व्यवस्थेची चक्रे अधिक गतीमान होण्यासाठी उद्योगांबरोबरच कृषी क्षेत्राला आजही अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र ३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे अर्थ व्यवस्थेचे दुसरे चाक कोलमडून पडले आहे. निसर्गाचा प्रकोप इतका भयानक होता की, रायगड जिल्ह्यातील नारळ, सुपारी, आंबा, काजूंच्या बागा या अशरक्ष: भूईसपाट झाल्या आहेत. अलिबाग, मुरुड, पेण, कर्जत, रोहे, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर या तालुक्यात सर्वाधिक फटका बसला आहे. वर्षानुवर्षे संगोपन केलेली झाडे नजरेच्या समोर भूईसपाट होताना पाहण्यावाचून बागायतदार शेतकºयांसमोर कोणताच पर्याय नव्हता. वादळाने तडाखा दिल्याने सर्व तयार झालेले आंबे खाली कोसळले. तशीच स्थिती नारळ, सुपारी, काजूंच्या बागांची झाली आहे.

रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नारळ-सुपारी विविध राज्यांमध्ये पाठवण्यात येतात. पण वादळामध्ये बागांचे मोठे नुकसान झाल्याने नारळ, सुपारी बागायतदारांना प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला आहे, अशी माहिती मुरुड तालुक्यातील शेतकरी विनोद पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. सरकार आम्हाला मदत करेलही मात्र ती तुटपूंजी असणार आहे. कारण एक झाड किमान २० वर्षे फळ देते. त्यामुळे एकदाच मदत मिळून उपयोग होणार नाही. यासाठी सरकारने सरासरी काढून विशेष आर्थिक नुकसान भरपाई दिल्यास वादळात फटका बसलेल्या शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असेही पाटील यांनी स्पष्ट केले.निसर्ग चक्रीवादळामुळे येथील शेती, नारळ, सुपारी, काजू, आंबा या बागायती उध्वस्त झाल्या आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतरच नुकसानीचा अंदाज येऊ शकेल.- पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधिक्षक, अधिकारी, रायगडनिसर्ग चक्रीवादळाने संबंध कोकणातील शेती आणि बागायची भूईसापट केल्या आहेत. मोठ्या संख्येने घर, विजेच खांब, विज जनित्र यांचेही नुकसान झाले आहे. रायगडातील नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी कोकणाला पाच हजार कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - खासदार सुनील तटकरे, रायगडआंबा बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसानझाडाला लागलेले आंबे खाली उतरवणे बाकी असतानाच वादळाने आमच्या बागा उध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे आंबा बागायतदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेती कर्जाचे हफ्ते कसे फेडायचे, मजुरी, मशागत अशा सर्व गोष्टीच वाया गेल्या आहेत, असे अलिबाग-शेखाचे गाव येथील आंबा बागायतदार परेश म्हात्रे यांनी सांगितेल.बागेतील आंब्याची झाडे जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळे कायम स्वरुपी उत्पादन देणारे झाड दगावले आहे. सरकारने विशेष आर्थिक नुकसान भरपाई देताना याचाही विचार करणे अधिक गरजेचे आहे. असे केले तरच बागायतदार तग धरु शकतील अन्यथा बागांप्रमाणे तेही कमरेतून मोडून पडतील याकडेही त्यांनी लक्ष वेधले.रायगडमधील बागायतीचे क्षेत्र : रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे २१ हजार हेक्टरवर नारळाचे उत्पादन घेतले जाते. तसेच नऊ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये सुपारीचे पीक घेतले जाते. सुमारे २६ हजार हेक्टरवर आंब्याची लागवड होते, तर तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्रावर काजूची शेती केली जाते.

टॅग्स :Raigadरायगडcycloneचक्रीवादळ