शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

कर्जतमध्ये कृत्रिम तलावांकडे गणेशभक्तांनी फिरवली पाठ; बहुतेकांनी उल्हास नदीत केले विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:10 IST

तालुक्यात ५९८३ गणपती, २६१० गौरी

कर्जत : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने गणरायाच्या विसर्जनासाठी या शहरात ठीकठिकाणी १० कृत्रिम तलाव तयार केले होते. दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन बऱ्याच भाविकांनी त्या तलावांमध्ये केले होते. मात्र त्यानंतर ठेकेदाराने त्या गणेशमूर्तींची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली नाही. स्मशानाजवळ खड्डा खोदून त्यामध्ये मूर्ती टाकल्या. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखवल्या. त्यामुळे गुरुवारी बहुतांश भाविकांनी कृत्रिम तलावांकडे पाठ करून पारंपरिक पद्धतीने उल्हास नदीच्या गणेश घाटांवर जाऊन ५९८३ गणरायांचे व २६१० गौरींचे विसर्जन केले.

कर्जत तालुक्यात दरवर्षी पुढच्या वर्षी लवकर या, अशा उत्साहात गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात येते. यंदा कोरोनाचे संकट असल्याने कर्जत नगर परिषदेने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गणेश विसर्जनासाठी कर्जत नगर परिषद क्षेत्रातील कर्जत, मुद्रे, आकुर्ले, भिसेगाव, गुंडगे व दहिवली येथे एकूण दहा कृत्रिम तलाव तयार करून घेतले. त्यासाठी त्यांनी ठेकेदाराची नियुक्ती केली. नगर परिषदेच्या वतीने कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे चारशे दीड दिवसाच्या गणरायांचे या तलावांमध्ये विसर्जन केले. मात्र त्यानंतर ठेकेदाराने त्या जमा झालेल्या गणेशमूर्ती सुरुवातीला कचरा डेपो येथे खड्ड्यात टाकण्यास नेल्या; मात्र तेथे एका भविकाने विरोध केल्याने त्या मूर्ती मुद्रे खुर्द गावा जवळील स्मशानभूमीच्या नजीक खड्डा खोदून त्यामध्ये अस्ताव्यस्तपणे टाकल्या. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या व काहींनी या प्रकाराचा जाहीर निषेध केला.

या प्रकाराने भावनावश झालेल्या कर्जतकर भाविकांनी गौरी-गणपतींचे विसर्जन कृत्रिम तलावांत न करता पारंपरिक पद्धतीने पूर्वीसारखेच उल्हास नदीच्या घाटावर जाऊन केले. या वेळी भाविकांमध्ये उत्साह नव्हता. मुद्रे परिसरातील भाविकांनी त्या भागात वाहणाºया उल्हास नदीत, भिसेगाव व गुंडगे भागातील भाविकांनी कर्जत शहरातील गणेश घाटावर, दहिवली येथील भाविकांनी दहिवली येथील गणेश घाटावर आणि आकुर्ले येथील भाविकांनी आकुर्ले येथील गणेश घाटावर जाऊन गौरी-गणपतींचे विसर्जन केले.

तालुक्यात कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ सार्वजनिक, ३८३० खाजगी व १३४६ गौरी, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०८३ खाजगी व १२५२ गौरींचे तर माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ सार्वजनिक, ६४ खाजगी व १२ गौरींचे असे एकूण ५९८३ गणरायांचे व २६१० गौरींचे विसर्जन करण्यात आले. या वेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विसर्जन शांततेत पार पडले.1) दीड दिवसाच्या गणेश विसर्जनानंतर झालेल्या प्रकारावर सर्वप्रथम मनसेचे शहर अध्यक्ष समीर चव्हाण यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन जाहीर निषेध व्यक्त केला, त्यानंतर राष्ट्रवादी काँगेसचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ‘मी माझ्या गौरी व गणपतीचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने उल्हास नदीच्या घाटावर जाऊन करीन,’ असे स्पष्ट करून या घटनेने भावना दुखल्याचे सांगितले.2)त्यापाठोपाठ काँग्रेस तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे यांनी मीसुद्धा माझ्या गणरायाचे विसर्जन माझे वडील माजी आमदार तुकाराम सुर्वे करीत होते त्याच पारंपरिक पद्धतीने उल्हास नदीच्या घाटावर जाऊन करीन, असे स्पष्टपणे सांगून नदीचे प्रदूषण थांबवायचे असेल तर प्रथम महावीर पेठेतील इमारतीमध्ये राहणाऱ्यांचे मलमूत्र उल्हास नदीमध्ये येते त्याचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा, असेही सूचित केले. याबाबत नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी गणेश विसर्जनाबाबत ‘राजकारण’ करू नये, असे सांगितले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव