शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या नावे शेतकऱ्यांची फसवणूक, प्रकल्पासाठी घेतली खातिवरे, मेढेखारमधील ८० एकर जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 03:54 IST

अलिबाग तालुक्यातील खातिवरे व मेढेखार गावातील ७० शेतकºयांना नोकरीचे आमिष दाखवून आणि तसा करार करून शेतकºयांची ८० एकर भातशेती २६ वर्षांपूर्वी, १९९२ मध्ये स्वील इंडिया लिमिडेट या खासगी कंपनीने शेतकºयांकडून अल्प किमतीने खरेदी केली.

- जयंत धुळपअलिबाग : तालुक्यातील खातिवरे व मेढेखार गावातील ७० शेतकºयांना नोकरीचे आमिष दाखवून आणि तसा करार करून शेतकºयांची ८० एकर भातशेती २६ वर्षांपूर्वी, १९९२ मध्ये स्वील इंडिया लिमिडेट या खासगी कंपनीने शेतकºयांकडून अल्प किमतीने खरेदी केली. मात्र, गेल्या २६ वर्षांत कंपनीचा कारखाना सुरू झालाच नाही.स्थानिकांची शेती घेतली आणि नोकरीही मिळाली नाही, या पार्श्वभूमीवर आता सर्व शेतकºयांनी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली, प्रतिएकरी ३१ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन रायगड जिल्हा प्रशासनास दिले आहे. श्रमिक मुक्ती दलाचे मेढेखार येथील शेतकरी प्रतिनिधी राजन वाघ यांनी ही माहिती दिली.स्वील इंडिया लिमिटेड कंपनीचे रायगड जिल्ह्यात स्थानिक कार्यालय नाही, तर मुंबई व कोलकाता येथील कार्यालये बंद करण्यात आल्याने, शेतकºयांनी कंपनीस दिलेल्या नोटिसा परत आल्या आहेत.औद्योगिक कारखान्याकरिता शेतजमीन खरेदी केल्यापासून पुढील १० वर्षांत त्या जमिनीचा औद्योगिक वापर सुरू झाला नाही तर मूळ खरेदी किमतीस, जमीन शेतकºयास परत दिली पाहिजे, असा सरकारी कायदा आहे. शासनाने प्रकल्पाखालील जमिनीची खातरजमा गेल्या २६ वर्षांत कधीही केली नाही. परिणामी, शेतजमीन पण गेली आणि नोकरीही नाही, अशा मोठ्या विचित्र कात्रीत हे ७० शेतकरी सापडल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे मेढेखार येथील शेतकरी प्रतिनिधी अनिकेत पाटील यांनी दिली आहे.चार वर्षांपूर्वी सर्व बाधित शेतकरी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्त्वाखाली एकत्र आले असून, प्रतिएकरी ३१ लाख रु पये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी रायगडच्या जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.तीन महिन्यांत जमिनी परत मिळाल्या नाहीत, तर शेतकरी स्वत: जमिनींचा ताबा घेतील, असे निवेदनही शेतकºयांनी जिल्हा प्रशासनाला दिले. मात्र, तीन महिने झाले तरी प्रशासनाने कोणतेही उत्तर वा खुलासा न केल्याची माहिती नाईक यांनी दिली.८० एकर जमीन झाली नापीकस्वील इंडिया लि. कंपनीने शेतकºयांची केलेली फसवणूक आणि २६ वर्षांत शासनाच्या निष्क्रियतेमुळे पेझारी-नागोठणे मार्गालगत आणि धरमतर खाडीकिनारी असणाºया ८० एकर भातशेतीचे नुकसान झाले आहे. शेतीच्या संरक्षणार्थ असणाºया समुद्र संरक्षक बंधाºयांची शासनाच्या खारलॅण्ड विभागाने देखभाल व दुरुस्तीच गेल्या २६ वर्षांत केली नाही. परिणामी, उधाणाने बंधारे फुटून खारे पाणी घुसून शेतजमिनी नापीक झाल्या आहेत.आता या भागात कांदळवनांचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, शेतकºयांनी या जमिनी आता पुन्हा ताब्यात घेतल्यावर त्या पिकत्या करण्याकरिता मोठा खर्च करावा लागणार आहे. तो खर्चदेखील शासनाकडून नुकसानभरपाई मिळणे अनिवार्य असल्याची भूमिका शेतकºयांची आहे.मुंबईत जशा गिरण्या बंद करून कामगारांना हाकलून कोट्यवधींच्या जमिनी लाटल्या तशीच पुनरावृत्ती अलिबाग तालुक्यात होत आहे. जमिनी स्वस्तात व नोकरीचे आमिष दाखवून घ्यायच्या, खोटी कारणे दाखवून प्रकल्प रखडवायचे, अथवा रद्द करायचे, मग त्याच जमिनी जादा किमतीत विकून नफा मिळवायचा, हे होऊ नये म्हणून शेतकºयांना आर्थिक नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने खारेपाटात सुरू केली आहे. त्यामुळे यापुढे भांडवलदार शेतकºयांना फसवू शकणार नाहीत.- सुनील नाईक 

टॅग्स :RaigadरायगडfraudधोकेबाजीFarmerशेतकरी