शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

मुंबईच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; एक मित्र बुडू लागला म्हणून इतर तिघे गेले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 07:13 IST

खालापूर तालुक्यातील मोरबे धरणाच्या बंधाऱ्यात दुर्घटना.

लोकमत न्यूज नेटवर्क, मोहोपाडा : मुंबईतून पर्यटनासाठी आलेल्या ३७ तरुणांच्या गटातील चौघांचा खालापूर तालुक्यातील  पोखरवाडी जवळच्या मोरबे डॅम साईबंधारा येथे बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. इशांत यादव (वय १९), आकाश धर्मदास माने (वय २६), रणथ महादू बंदा (वय १८) आणि एकलव्य सिंग (वय १८) अशी मृतांची नावे आहेत. यापैकी काही जण रिझवी काॅलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचे समजते.  

मुंबईतील विविध काॅलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणांचा एक गट सकाळी सोडाई किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आला होता. मात्र, ट्रेकिंगला जाण्याऐवजी ते दुपारी पोखरवाडी येथील मोरबे डॅमच्या बंधाऱ्याजवळ आले. यापैकी एक जण बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरला. त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो बुडत असताना वाचविण्यासाठी अन्य तिघे मित्र गेले. यामध्ये चौघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, खालापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे आदी घटनास्थळी दाखल झाले. 

अपघातग्रस्त मदत टीमचे गुरुनाथ साठेलकर यांच्यासह पथकाने स्थानिकांच्या मदतीने चारही तरुणांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले. त्यांचे चौक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत उपविभागीय अधिकारी विक्रम कदम पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :Raigadरायगडdam tourismधरण पर्यटनdrowningपाण्यात बुडणेMumbaiमुंबई