शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

माथेरानमध्ये चार दुकाने भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 06:19 IST

माथेरान येथील मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी रोडवर पहाटे लागलेल्या  आगीत चार दुकाने जळून खाक झाली. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी  तीन ते चार तास लागले असून, या आगीत जवळपास ७0 ते ८0 लाखांच्या  आसपास दुकानातील मालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठळक मुद्देमुख्य बाजारपेठेत आग दुकानदारांचे ७0 ते ८0 लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : येथील मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी रोडवर पहाटे लागलेल्या  आगीत चार दुकाने जळून खाक झाली. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी  तीन ते चार तास लागले असून, या आगीत जवळपास ७0 ते ८0 लाखांच्या  आसपास दुकानातील मालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून,  दुकानांना लागूनच असलेल्या घरातील रोकड, दागिने, टीव्ही, फ्रीज या सार ख्या किमती वस्तू या आगीत भस्मसात झाल्याने येथील दुकानदारांचे मोठय़ा  प्रमाणात नुकसान झाले आहे.या वेळी हीना चिक्की मार्ट, निहाल एजन्सी, के.जी.एन. बेकरी, दिलावर बेकरी  या दुकानांची आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला; परंतु कर्जत व  खोपोली येथील अग्निबंब वाहन मोठे असल्याने घाटातून वर आणण्यास श क्य नसल्याने तसेच वेळेत पोहोचू शकत नसल्याने, माथेरान नगरपरिषदेच्या  अग्निबंब गाडीच्या साहाय्याने पाणीपुरवठा केंद्र येथून तीन ते चार फेर्‍या  पाण्याच्या, तसेच शेजारील केतकर हॉटेलमालक प्रमोद नायक व मिस्टी  रीसॉर्टचे अल्ताफ शेख यांनी आपल्याकडील संपूर्ण पाणी आग  विझविण्यासाठी उपलब्ध करून दिल्यामुळे तसेच स्थानिक तरु ण व काही  लोक प्रतिनिधींनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी मदतकार्य केले. या  वेळी आग विझविण्यासाठी स्थानिक तरु ण सीताराम कुंभार, भास्कर शिंदे,  किरण चौधरी, कुलदीप जाधव, नासीर शारवान, माजी नगरसेवक प्रकाश सु तार तसेच इतर रहिवाशांनी आगीवर नियंत्रण आणले.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी,  नगरसेविका वर्षा रॉड्रिक्स, पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, गटनेते प्रसाद  सावंत यांनी धाव घेतली. या वेळी स्थानिक तरु णांनी आपल्या जीवाची परवा  न करता, आग आटोक्यात आणल्यामुळे या दुकानांना लागून असलेली दुसरी  दुकाने व घरे वाचली; परंतु या घटनेमुळे खान कुटुंबीय आपली राहते घर,  दुकाने जळल्यामुळे होत्याचे नव्हते झाल्याने माथेरान नगरपरिषद व  नागरिकांकडे व्यवसाय करण्यासाठी दुकाने व घरासाठी दया, याचना करत  सहकार्याची अपेक्षा करीत आहेत. या आगीचे अद्याप कारण समजले नसून स्थानिकांच्या मदतीने आगीवर  नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला असून, माथेरानमध्ये या आ पत्तीजनक घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न प्रशासनाने, आपत्कालीन  कक्ष, ग्राम सुरक्षा दल, अग्निशमन दल कार्यान्वित करणे गरजेचे आहे, असे  स्थानिकांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :fireआग