शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

माथेरानमध्ये चार दुकाने भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 06:19 IST

माथेरान येथील मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी रोडवर पहाटे लागलेल्या  आगीत चार दुकाने जळून खाक झाली. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी  तीन ते चार तास लागले असून, या आगीत जवळपास ७0 ते ८0 लाखांच्या  आसपास दुकानातील मालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठळक मुद्देमुख्य बाजारपेठेत आग दुकानदारांचे ७0 ते ८0 लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : येथील मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी रोडवर पहाटे लागलेल्या  आगीत चार दुकाने जळून खाक झाली. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी  तीन ते चार तास लागले असून, या आगीत जवळपास ७0 ते ८0 लाखांच्या  आसपास दुकानातील मालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून,  दुकानांना लागूनच असलेल्या घरातील रोकड, दागिने, टीव्ही, फ्रीज या सार ख्या किमती वस्तू या आगीत भस्मसात झाल्याने येथील दुकानदारांचे मोठय़ा  प्रमाणात नुकसान झाले आहे.या वेळी हीना चिक्की मार्ट, निहाल एजन्सी, के.जी.एन. बेकरी, दिलावर बेकरी  या दुकानांची आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला; परंतु कर्जत व  खोपोली येथील अग्निबंब वाहन मोठे असल्याने घाटातून वर आणण्यास श क्य नसल्याने तसेच वेळेत पोहोचू शकत नसल्याने, माथेरान नगरपरिषदेच्या  अग्निबंब गाडीच्या साहाय्याने पाणीपुरवठा केंद्र येथून तीन ते चार फेर्‍या  पाण्याच्या, तसेच शेजारील केतकर हॉटेलमालक प्रमोद नायक व मिस्टी  रीसॉर्टचे अल्ताफ शेख यांनी आपल्याकडील संपूर्ण पाणी आग  विझविण्यासाठी उपलब्ध करून दिल्यामुळे तसेच स्थानिक तरु ण व काही  लोक प्रतिनिधींनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी मदतकार्य केले. या  वेळी आग विझविण्यासाठी स्थानिक तरु ण सीताराम कुंभार, भास्कर शिंदे,  किरण चौधरी, कुलदीप जाधव, नासीर शारवान, माजी नगरसेवक प्रकाश सु तार तसेच इतर रहिवाशांनी आगीवर नियंत्रण आणले.या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी,  नगरसेविका वर्षा रॉड्रिक्स, पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, गटनेते प्रसाद  सावंत यांनी धाव घेतली. या वेळी स्थानिक तरु णांनी आपल्या जीवाची परवा  न करता, आग आटोक्यात आणल्यामुळे या दुकानांना लागून असलेली दुसरी  दुकाने व घरे वाचली; परंतु या घटनेमुळे खान कुटुंबीय आपली राहते घर,  दुकाने जळल्यामुळे होत्याचे नव्हते झाल्याने माथेरान नगरपरिषद व  नागरिकांकडे व्यवसाय करण्यासाठी दुकाने व घरासाठी दया, याचना करत  सहकार्याची अपेक्षा करीत आहेत. या आगीचे अद्याप कारण समजले नसून स्थानिकांच्या मदतीने आगीवर  नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला असून, माथेरानमध्ये या आ पत्तीजनक घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न प्रशासनाने, आपत्कालीन  कक्ष, ग्राम सुरक्षा दल, अग्निशमन दल कार्यान्वित करणे गरजेचे आहे, असे  स्थानिकांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :fireआग