शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

रायगडमध्ये चार विद्यमान आमदार हॅट्ट्रिकच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 02:45 IST

भाजप-शिवसेना यांच्या जागावाटपाचे घोंगडे अजूनही भिजत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग - भाजप-शिवसेना यांच्या जागावाटपाचे घोंगडे अजूनही भिजत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोण कोठून लढणार याबाबत तर्क-वितर्क लढवले जात असले, तरी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड आणि शेकापचे आमदार धैर्यशील पाटील हे हॅट्ट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे युती न होण्याच्या आधारावर उमेदवारांची अदलाबदल होऊन प्रमुख राजकीय पक्षातील उमेदवार अन्य पक्षाच्या तिकिटावर लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे.युतीच्या जागावाटपाची घोषणा अद्याप झालेली नाही. भाजप-शिवसेनेला १२० पेक्षा कमी जागा देण्याची तयारीत असल्याने शिवसेना स्वाभिमान बाजूला ठेवण्याच्या मन:स्थितीमध्ये नसल्याचेच चित्र त्यानिमित्ताने दिसून येते. युती न झाल्याचा परिणाम राज्यात होत असताना रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभेच्या जागांवर त्याचा प्रभाव पडत आहे. युतीची घोषणा न झाल्याने काही ठिकाणच्या जागेवर कोण लढणार याबाबत कमालीची उत्सुकता लागून आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीत शेकाप आहे. मात्र, अलिबागमध्ये काँग्रेसचा उमेदवार उभा केला जाणार असल्याने अलिबाग वगळता अन्य ठिकाणी ही आघाडी असल्याचे चित्र दिसू शकते.निवडणूक विभागाने आपल्या बाजूने सर्व तयारी पूर्ण केलेली आहे. मात्र, निवडणुकीच्या मांडवात ज्यांची लग्न लागणार आहेत, त्यांचीच नावे समोर आलेली नसल्याने जनतेच्या मनातील कुतूहल वाढले आहे.२७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र, अद्याप प्रमुख पक्षातील उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे दिसत नाही. सोमवार, ३० तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे.युती-आघाडी यांचा सावळागोंधळ सुरू असताना दुसरीकडे पनवेलमधील भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, महाडमधील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, कर्जतमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड आणि पेणमधील शेकापचे धैर्यशील पाटील यांचे विधानसभेचे तिकीट पक्के समजले जात असल्याने ते सर्व हॅट्ट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत.१आमदार प्रशांत ठाकूर, आमदार भरत गोगावले, सुरेश लाड आणि धैर्यशील पाटील हे २००९ आणि २०१४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झालेले आहेत. त्यामुळे २०१९ मध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जिंकून ते हॅट्ट्रिक साधतील, अशी त्यांची आणि त्यांच्या समर्थकांची धारणा आहे. हॅट्ट्रिक साधण्यासाठी त्यांनी सर्व तयारी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे युती अथवा आघाडीची वाट न बघता यांनी त्यांच्या पद्धतीने कामाला सुरुवात केल्याचे दिसून येते.२प्रशांत ठाकूर हे भाजपच्याच तिकिटावर लढणार आहेत, तर धैर्यशील पाटील हे शेकापच्याच तिकिटावर लढणार असल्याचे त्यांच्याच पक्षाने जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड हे नक्की कोणत्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर लढणार याबाबत मतदारसंघामध्ये अद्यापही उलटसुलट चर्चा आहे. मध्यंतरी त्यांनी याचा इन्कार करत राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.उमेदवारांची अदलाबदलअद्यापही युतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे युती झाली नाही तर उमेदवारांची अदलाबदल होऊ शकते, असे एका राजकीय पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. युती झाली नाही तर कोणत्या पक्षाचा उमेदवार कोठून लढणार याबाबत विचारले असता, दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल असे त्याने उत्तर दिले. दरम्यान, युती न होण्याच्या आधारावर उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यता खरी ठरली, तर प्रमुख राजकीय पक्षातील उमेदवार अन्य पक्षातील तिकिटावर लढण्याची शक्यता त्यामुळे बळावली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019