शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गडसंवर्धन मोहीम प्रभावीपणे राबविणार, जयकुमार रावल यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 02:01 IST

संपूर्ण महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र गडकिल्ले संवर्धन मोहीम प्रभावीपणे राबवणार असल्याची घोषणा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केली. छत्रपती संभाजी राजे यांच्या पुढाकारातून किल्ले रायगडावर सोमवारी आयोजित केलेल्या दुर्ग संवर्धन परिषदेत रावल बोलत होते.

महाड : संपूर्ण महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र गडकिल्ले संवर्धन मोहीम प्रभावीपणे राबवणार असल्याची घोषणा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केली. छत्रपती संभाजी राजे यांच्या पुढाकारातून किल्ले रायगडावर सोमवारी आयोजित केलेल्या दुर्ग संवर्धन परिषदेत रावल बोलत होते. राज्यातील ४५० किल्ल्यांंवर राज्य शासनातर्फे शंभर दिवस स्थानिक जनतेच्या सहकार्यातून ही मोहीम राबविण्यात येईल, असेही रावल यांनी स्पष्ट केले.जोपर्यंत समाज जागृत होत नाही तोपर्यंत गडसंवर्धन करणे मोठे आव्हान आहे. गडसंवर्धन ही लोकचळवळ व्हायला हवी यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे सांगताना गड संवर्धनाखेरीज गाइड प्रशिक्षण, वृक्ष लागवड आदी उपक्र म राबवले जातील, असे रावल यांनी सांगितले.पाचाड येथील राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधीचे सुशोभीकरण लवकरच केले जाईल, असे रावल यांनी जाहीर केले. रायगडची पुनर्बांधणी होऊ शकत नाही, मात्र या ऐतिहासिक बहुमोल ठेव्याचे जतन होऊ शकते. या गडावर आजही उत्खनन करताना शिवकालीन अवशेष सापडतात. रायगड विकासाच्या माध्यमातून रायगडाला शिवकालीन गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्राधिकरणाचा प्रामाणिक प्रयत्न राहील, असेही खा. संभाजीराजे यांनी या वेळी स्पष्ट केले.जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे व माजी आमदार माणिक जगताप यांनी रायगड संवर्धन विकास योजना राबवताना परिसरातील २१ गावांच्या स्थानिकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी केली.परिषदेला रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष खा. छत्रपती संभाजीराजे, राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, वन विभागाचे मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक विभागाचे सचिव भूषण गगराणी आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Jaykumar Rawalजयकुमार रावल