शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

गडसंवर्धन मोहीम प्रभावीपणे राबविणार, जयकुमार रावल यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 02:01 IST

संपूर्ण महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र गडकिल्ले संवर्धन मोहीम प्रभावीपणे राबवणार असल्याची घोषणा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केली. छत्रपती संभाजी राजे यांच्या पुढाकारातून किल्ले रायगडावर सोमवारी आयोजित केलेल्या दुर्ग संवर्धन परिषदेत रावल बोलत होते.

महाड : संपूर्ण महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र गडकिल्ले संवर्धन मोहीम प्रभावीपणे राबवणार असल्याची घोषणा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केली. छत्रपती संभाजी राजे यांच्या पुढाकारातून किल्ले रायगडावर सोमवारी आयोजित केलेल्या दुर्ग संवर्धन परिषदेत रावल बोलत होते. राज्यातील ४५० किल्ल्यांंवर राज्य शासनातर्फे शंभर दिवस स्थानिक जनतेच्या सहकार्यातून ही मोहीम राबविण्यात येईल, असेही रावल यांनी स्पष्ट केले.जोपर्यंत समाज जागृत होत नाही तोपर्यंत गडसंवर्धन करणे मोठे आव्हान आहे. गडसंवर्धन ही लोकचळवळ व्हायला हवी यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे सांगताना गड संवर्धनाखेरीज गाइड प्रशिक्षण, वृक्ष लागवड आदी उपक्र म राबवले जातील, असे रावल यांनी सांगितले.पाचाड येथील राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधीचे सुशोभीकरण लवकरच केले जाईल, असे रावल यांनी जाहीर केले. रायगडची पुनर्बांधणी होऊ शकत नाही, मात्र या ऐतिहासिक बहुमोल ठेव्याचे जतन होऊ शकते. या गडावर आजही उत्खनन करताना शिवकालीन अवशेष सापडतात. रायगड विकासाच्या माध्यमातून रायगडाला शिवकालीन गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्राधिकरणाचा प्रामाणिक प्रयत्न राहील, असेही खा. संभाजीराजे यांनी या वेळी स्पष्ट केले.जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे व माजी आमदार माणिक जगताप यांनी रायगड संवर्धन विकास योजना राबवताना परिसरातील २१ गावांच्या स्थानिकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी केली.परिषदेला रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष खा. छत्रपती संभाजीराजे, राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, वन विभागाचे मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक विभागाचे सचिव भूषण गगराणी आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Jaykumar Rawalजयकुमार रावल