शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मतभेद विसरून समन्वयाने काम कारा- खा. सुनिल तटकरे

By निखिल म्हात्रे | Updated: January 14, 2024 19:10 IST

'मैत्रीपुर्ण लढत कराची ठरविले तर माझ्या उमेदवारांना निवडून आणन्याचा दिलेला शब्द मी पाळतो.'

अलिबाग - राज्यात महायुतीमध्ये तिन प्रमुख पक्षांसहीत 12 घटक पक्ष असून त्यांना एकत्रीत आणन्यासाठी रविवारी एकाच दिवशी ३६ जिल्ह्यांत समन्वय मेळावे घेण्यात आले. यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे. १५ राजकीय पक्षांच्या समन्वयातून आगामी लोकसभा निवडणूक लढवली जाणार आहे. त्यामुळे आता महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरुन एकत्रीतपणे कामाला सुरुवात करणे अत्यावश्य असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले. तसेच एकदा मैत्रीपुर्ण लढत कराची ठरविले तर माझ्या उमेदवारांना निवडून आणन्याचा दिलेला शब्द मी पाळतो अशी कोपरखळी ही तटकरे यांनी लगावली.

अलिबाग येथील समुद्र किनारी आयोजित महायुती मेळाव्यात व्यासपीठावर मावळचे खासदार श्रीरंग बारणे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार भरत गोगावले, आमदार रविंद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर,आमदार अनिकेत तटकरे, भाजप चे महाराष्ट्र महामंत्री विक्रांत पाटील,माजी आमदार तथा भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, माजी आमदार सुरेश लाड,उत्तर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, महिला अध्यक्षा उमा मुंडे, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील महेश मोहिते, मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महायुतीला अधिक बळकट करण्यासाठी काही दिवसापूर्वी समन्वय मेळावे घेण्याचे ठरले. त्यानंतर या कार्यक्रमाची पुर्व तयारी करून प्रत्येक जिल्ह्यात आज समन्वय मेळावे होत आहेत. जिल्ह्यात नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून रायगडचा विकास झपाट्याने होत आहे. तसेच पर्यटन स्थळांचे सुशोभिकरण झाल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक जिल्ह्यात पर्यटनासाठी येत असल्याने भविष्यात रायगडचे चित्र बदलले जाणार आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार विकास काम जलद गतीने करीत आहे. हेच खरे महायुतीवर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले शेतकरी यांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले आहेत. मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसान योजना अंतर्गत 6 हजार शेतकऱ्यांना मिळत असताना राज्य सरकार कडून सहा हजार असे मिळून  बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत आहे. जिल्ह्यात शिवसेना व भाजपा मोदीयांच्या धेय्य व धोरणांमुळे वाढत आहे. अनंत गिते यांनी आठवेळा लोकमसभा निवडणूक भाजप सोबत लढविल्या. त्यामुळे आता भाजपला नेस्तनाबूत करणार वक्तव्य त्यांना अशोभनिय आहे. सरकारने विकासाचे अनेक मोठे प्रकल्प मार्गी लावण्यासोबतच शासन आपल्या दारी अभियानच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे निकाली काढले आहेत.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर हे मेळावे संपन्न होत आहे. प्रमुख पक्षाचे पदाधिकारी या जिल्ह्याचे नेतृत्व कोणाच्या हातात दय्याचे आहे. यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख कार्यकर्ते यांचा मनोमिलन व्हावे त्यासाठी मेळावा घेत आहोत. देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाचे नेतृत्व पुन्हा आपल्याला द्याचे असेल तर यासाठी महा युतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल मनोमिलन करून आता पासूनच कामाला लगण अत्यावश्यक आहे.

जिल्ह्यात महायुतीचा एकत्र मेळावा कधी होणार याची वाट कार्यकर्ते पाहत होते. मागील ग्रामपंच्यातींच्या निवडणूकीत तळागाळातील कार्यकर्त्यामध्ये असलेल्या अबोळ्यामळे ग्रामपंच्याती हातातून निसटल्या होत्या. आता आगामी काळात युतीचे सरकार आणायचे असेल तर सर्वांनी एकत्रीत येणे गरचे असून त्यासाठी ग्रामपंचायत मुख्य आधार असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

आमदार महेंद्र दळवी म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्याला एकमेकांतील मतभेद विसरून दिलजमाई करण गरजेचे आहे. राजकीय बदल करण्यासाठी ताकद महायुतीमध्ये आहे. आता बदल निश्चित आहे. रायगड जिल्ह्यात होणारे प्रकल्प रायगड जिल्ह्याला उंचावर नेवून ठेवेल. चौथा सागरी महामार्ग काही दिवसात होणार आहे. रायगड जिल्ह्याला प्रगतीच्या मार्गावर न्यायचे असेल तर सर्वांनी एकत्रीत येवून निवडणुका लढविण्यासाठी कटिबध्द असणे गरजेचे आहे. मागील दिवसात काही झाले असेल ते विसरून नव्याने हातात हात घालून एकत्रीत येत जिल्ह्याचा विकास करू.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस