शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

वणव्यामुळे वनसंपदेचा -हास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:26 IST

मार्च महिना सुरू होताच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

दासगांव : मार्च महिना सुरू होताच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तापमान वाढल्याने वणवे लागण्याचे प्रकारही वाढले आहेत. रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी लागणाऱ्या वणव्यांतून आगीच्या ज्वालांनी वातावरण आणखीनच तापले आहे. याचा परिणाम मानवी जीवनावर, तसेच पशू-पक्ष्यांवर होत असून, वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दोन दिवसांपासून दासगाव डोंगर भागात लागलेल्या वणव्यामुळे परिसरात उष्णतेत वाढ झाली आहे. हा वणवा विझवण्यासाठी पुरेशी यंत्रणा कार्यान्वित नसल्याने उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत.कोकणातील बहुतांश गावे ही डोंगर कुशीमध्ये वसलेली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील वनसंपत्तीमुळे कोकणातील तापमान कायम कमी किंवा थंड राहिलेले आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे वनसंपदा नष्ट होत आहे. यामुळे कोकणातील तापमानाचा पाढा दिवसेंदिवस वाढू लागलेला दिसून येत आहे. त्यातच शेतकºयांच्या गैरसमजुतीतून आणि नैसर्गिकरीत्या वणवा लागण्याचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे.एकीकडे शेतकरी परंपरागत पद्धतीतून भातशेती करण्यासाठी जंगलातील झाडांच्या कोवळ्या फांद्या तोडून तरवा भाजण्याचे काम करीत आहे. त्यामुळे वनसंपत्तीचा ºहास आणि वातावरणावरील परिणाम होत आहे. पूर्वीपासूनच्या डोंगरांना वणवा लावून गवत जाळण्याचे प्रमाणदेखील आजही कायम आहे. यामुळे जानेवारी महिन्यापासूनच विविध ठिकाणी डोंगरात आगीचे लोट उठताना दिसतात.शासकीय पातळीवर वणवा आणि तरवा भाजणीबाबत जनजागृती करण्यात येत असली तरी वारंवार लागणारे वणव्यांचे प्रकार बघता शेतकºयांनी परंपरागत शेतीत बदल केला नसल्याचेच दिसून येत आहे. नेहमीच अशाच प्रकारे वणवा लागल्याने सध्या असलेल्या तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाड तालुक्यात असे वणवे लागण्याचे प्रकार होत आहेत. दासगावमध्ये दोन दिवसांपूर्वी महामार्गालगतच्या डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणात वणवा लागला आहे. त्यात संपूर्ण डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी गेला आहे.