शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

वणव्यामुळे वनसंपदेचा -हास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 02:26 IST

मार्च महिना सुरू होताच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

दासगांव : मार्च महिना सुरू होताच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तापमान वाढल्याने वणवे लागण्याचे प्रकारही वाढले आहेत. रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी लागणाऱ्या वणव्यांतून आगीच्या ज्वालांनी वातावरण आणखीनच तापले आहे. याचा परिणाम मानवी जीवनावर, तसेच पशू-पक्ष्यांवर होत असून, वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दोन दिवसांपासून दासगाव डोंगर भागात लागलेल्या वणव्यामुळे परिसरात उष्णतेत वाढ झाली आहे. हा वणवा विझवण्यासाठी पुरेशी यंत्रणा कार्यान्वित नसल्याने उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत.कोकणातील बहुतांश गावे ही डोंगर कुशीमध्ये वसलेली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील वनसंपत्तीमुळे कोकणातील तापमान कायम कमी किंवा थंड राहिलेले आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे वनसंपदा नष्ट होत आहे. यामुळे कोकणातील तापमानाचा पाढा दिवसेंदिवस वाढू लागलेला दिसून येत आहे. त्यातच शेतकºयांच्या गैरसमजुतीतून आणि नैसर्गिकरीत्या वणवा लागण्याचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे.एकीकडे शेतकरी परंपरागत पद्धतीतून भातशेती करण्यासाठी जंगलातील झाडांच्या कोवळ्या फांद्या तोडून तरवा भाजण्याचे काम करीत आहे. त्यामुळे वनसंपत्तीचा ºहास आणि वातावरणावरील परिणाम होत आहे. पूर्वीपासूनच्या डोंगरांना वणवा लावून गवत जाळण्याचे प्रमाणदेखील आजही कायम आहे. यामुळे जानेवारी महिन्यापासूनच विविध ठिकाणी डोंगरात आगीचे लोट उठताना दिसतात.शासकीय पातळीवर वणवा आणि तरवा भाजणीबाबत जनजागृती करण्यात येत असली तरी वारंवार लागणारे वणव्यांचे प्रकार बघता शेतकºयांनी परंपरागत शेतीत बदल केला नसल्याचेच दिसून येत आहे. नेहमीच अशाच प्रकारे वणवा लागल्याने सध्या असलेल्या तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाड तालुक्यात असे वणवे लागण्याचे प्रकार होत आहेत. दासगावमध्ये दोन दिवसांपूर्वी महामार्गालगतच्या डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणात वणवा लागला आहे. त्यात संपूर्ण डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी गेला आहे.