शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात वृक्षलागवडीची लोकचळवळ

By admin | Updated: May 13, 2017 01:13 IST

जागतिक तापमानातील वाढ आणि ऋतू बदल त्याचबरोबर राज्यातील वनक्षेत्र २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्याच्या प्रयत्नांचा

जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : जागतिक तापमानातील वाढ आणि ऋतू बदल त्याचबरोबर राज्यातील वनक्षेत्र २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून येत्या तीन वर्षात ५० कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्र म राज्य शासनाने हाती घेतला आहे. या कार्य क्रमांतर्गत सन २०१७ मध्ये ४ कोटी, २०१८ मध्ये १३ कोटी, २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. १ जुलै ते ७ जुलै या वनमहोत्सव कालावधीत होणाऱ्या या वृक्षारोपण मोहिमेकरिता संपूर्ण कोकणात विशेष नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात एकूण ३० लाख ४० हजार ११७ रोपांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी तब्बल ८० टक्के म्हणजे २४ लाख ४ हजार ८९५ रोपे जगवण्यात यश आले आहे. यंदा रोपे जगवण्याचे प्रमाण ९० टक्के करण्याचा संकल्प कोकण विभागाने केला आहे.गतवर्षी १ जुलै २०१६ रोजी जनतेच्या सक्रिय सहभागामुळे एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सहजगत्या साध्य झाले. १ जुलै २०१६ रोजी एकूण २ कोटी ८२ लाख वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली. लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने या अभिनव उपक्र माची नोंद घेतली असून राज्य शासनास या विक्रमाचे प्रमाणपत्र देखील दिले आहे. वनमहोत्सवातील वृक्ष लागवड करण्यास वने व सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमधून सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे. जिथे अडचण असेल तिथे वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत रोपे देण्याचा प्रयत्नही ऊराहाणार आहे. साधारणत: सहजरीत्या व कमी पाण्यावर जगणारी, लवकर वाढ असणारी झाडे लावणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने पारंपरिक आंबा, चिंच, आवळा, जांभूळ, करंज, कवठ, काजू, फणस, वड, पिंपळ, कडूलिंब, पळस, कॅशिया, रेन ट्री, गुलमोहर, चाफा ही झाडे अपेक्षित आहेत.वृक्षारोपण कार्यक्र मांतर्गत रोपांचे जिवंत राहण्याचे प्रमाण किमान ८० ते ९० टक्के ठेवण्याच्या दृष्टीने करावयाच्या विविधांगी उपाययोजनाबाबत कोकण विभागाने विशेष नियोजन केले आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समिती, हरित सेना, डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, स्वाध्याय परिवार भक्तगण यांच्यामार्फत लागवड व संगोपन केले जाईल. रोपवनाच्या भोवती जैविक कुंपण करणे व त्यानुसार अंदाजपत्रकात तरतूद केली जाईल. विहार मॉडेलप्रमाणे रोपवनाचे संरक्षण स्थानिक ग्रामस्थांच्या कुंटुंबामार्फत करण्यात येईल. रोपवन संरक्षणासाठी रखवालदार ठेवण्यात येतील. शक्य होईल तेथे ट्री गार्ड बसविणे, लहान रोपवने देखभालीसाठी देणे, ग्रामपंचायत रोपांचे संरक्षणासाठी काही अटी व शर्ती बंधनकारक करणे, रोपवनास सिंचन सोय करणे असे नियोजन करण्यात आले आहे.या मोहिमेंतर्गत लागवड केलेल्या झाडांचे, रोपांचे पहिल्या चार वर्षापर्यंतच्या खबरदारीसाठी असलेल्या कामाचे संनियंत्रण, जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर गठीत केलेल्या समित्याद्वारे करण्यात येणार आहे. गतवर्षी या उपक्र मात राज्य शासनाचे विविध असे २१ विभाग सहभागी झाले होते. यावर्षी सर्व म्हणजे ३३ शासकीय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील निमशासकीय महामंडळे आणि मंडळे यांचा समावेश राहणार आहे.