शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
2
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
3
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
4
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
5
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
6
शर्टच्या आतून लावला बॉम्ब, गेटजवळ पोहचताच दाबले डेटोनेटर, पाकिस्तानातील आत्मघाती हल्ल्याचा फोटो
7
सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
8
डॉक्टर, सुशिक्षित तरुणांना पाकिस्तानी 'आका'ने दिली ट्रेनिंग; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचे जैश-ए-मोहम्मदशी थेट कनेक्शन!
9
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
10
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
11
"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
12
आता सरकारी विमा कंपन्यांचे विलीनीकरण की खासगीकरण? विचार सुरू; सरकार म्हणते...
13
Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
14
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
15
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
16
Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
17
Palmistry: भाग्य रेषा तुटलेली आहे की अखंड? 'या' स्थितीवरून उलगडते संपत्ति आणि नशिबाचे गूढ
18
Nashik Crime: कॉल केला आणि म्हणाली, 'पतीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवायचे नसेल तर पाच लाख दे!'
19
सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा!
20
भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम! दुबई एअर शोमध्ये शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांच्या सन्मानार्थ F-16 डेमॉन्स्ट्रेशन रद्द
Daily Top 2Weekly Top 5

महाडमधील पुरामुळे अनेक संसार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:00 IST

महाड-पुणे मार्गावरील वरंधघाटामध्ये कोसळली दरड; वाहतूक ठप्प; मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान

बिरवाडी : महाड-पुणे मार्गावरील वरंध घाटामध्ये माझेरी गावाजवळ दरड कोसळल्याने या ठिकाणांवरील वाहतूक मंगळवार, ६ आॅगस्टपासून ठप्प झाली आहे तर पुरामध्ये अडकलेल्या ७० कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथक व स्थानिक ग्रामस्थांना यश आले आहे. घाटामध्ये दरड कोसळलेल्या ठिकाणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातर्फे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.मंगळवार, ६ आॅगस्ट रोजी आलेल्या महापुरामध्ये महाड एमआयडीसीमधील आसनपोई गावच्या हद्दीत लक्ष्मी आॅरगॅनिक कंपनीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने या कंपनीमधील महिला कामगारांसह ७० जणांना बचाव पथक पोलीस कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी भ्रमणध्वनीद्वारे दिली. वरंध घाटांमध्ये दरड कोसळलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.बिरवाडी परिसरांमध्ये पुराचे पाणी ओसरले असून, बिरवाडीमधील बापटनगर, आदर्शनगर, कुंभारवाडा मोहल्ला या ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे, तर वेरखोले येथील चंद्रकांत धोंडू तांबे यांचे घर कोसळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा बिरवाडी तलाठी सज्जाचे तलाठी यांच्याकडून करण्यात आला आहे.

अनेक घरांचे नुकसानमुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरामध्ये महाड एमआयडीसीमधील रस्ते, खरवली-बिरवाडी पूल, भावे पूल पाण्याखाली गेल्याची घटना २००५ नंतर प्रथमच घडली आहे, यामुळे जवळपास ८४ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता.पाचाड, रायगडवाडीला फटकाकिल्ले रायगड परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या भागातील पाचाड, रायगडवाडी, छत्री निजामपूर, पुनाडे, या गावातील घरे कोसळली आहेत. पाचाडमध्ये सात, रायगडवाडी १३, छत्री निजामपूर तीन, पुनाडेमध्ये दोन घरांचे नुकसान झाले आहे. पाचाड गावात राजेंद्र खातू, अनिल खातू, किसन भोसले, गोविंद भोसले, ललिता भोसले, लता मोरे, गोपाळ गायकवाड यांच्या घरांचा समावेश आहे तर रायगडवाडी गावातील गणपत साटम, पुनाडे गावातील जितेंद्र लामजे, मारुती कंक यांच्या घरांचे नुकसान झाले असून येथील तलाठी योगेश वार्डे यांनी पंचनामा केला आहे. कोसबी गावात जितेंद्र जाधव आणि त्यांचे भाऊ या दोघांच्या घरांचे नुकसान, सोलमकोंड येथील पांडुरंग सुतार, चोचिंदे गावातील भानुदास जाधव, रमेश मांडवकर, शांताराम भुवड, रुपवली गावातील प्रकाश शिर्के, विजय शिर्के, सीताबाई साळवी यांच्या घराचे नुकसान झाले. नडगावतर्फे बिरवाडी गावातील निर्मला मांडे, बिरवाडी वेरखोले येथील चंद्रकांत तांबे, मोहोप्रे येथील अनिल पवार यांचा जनावरांचा वाडा, तेलंगे गावातील मुक्ता मुकणे, दाभोळ गावातील बंडू रामा नाडकर यांच्या घरांची पडझड झाल्याची माहिती नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी दिली.वरंध जिल्हा परिषद मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाड-पुणे रस्त्यावरील वरंध घाटामध्ये माझेरी गावाजवळ मोठ्या प्रमाणात दरड कोसळली असून, या घटनेची माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कळविण्यात आली आहे. मात्र, अपेक्षित प्रतिसाद लाभत नसल्याने या ठिकाणी दरड हटविण्याच्या कामास विलंब होत आहे. मंगळवार रात्रीपासून शेकडो प्रवासी या घाटामध्ये अडकल्याची भीती त्यांनी व्यक्त केली असून दरड हटविल्याशिवाय प्रवासी पलीकडे येऊ शकत नाहीत. काही प्रवाशांनी घाटांमधील वाघजाई मंदिर परिसराचा आसरा घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दरड कोसळलेल्या ठिकाणी जेसीबी पाठविण्यात आला नसल्याने बुधवार, ७ आॅगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत या ठिकाणी दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे महाड येथील शाखा अभियंता अमृत पाटील यांच्याशी संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.शेतीचे नुकसानमहाड तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसाने १ आॅगस्टपासून मंगळवार, ६ आॅगस्टपर्यंत जवळपास ९३२ मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण पावसाची नोंद जवळपास ३००० मि.मी. इतकी झाली आहे. फक्त पाच दिवसांतच पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने नद्यांना पूर आला होता. पूरपरिस्थितीत महाड तालुक्यात शेकडो एकर भात पीक क्षेत्र पाण्याखाली गेले आहे.महाड शहराला लागून असलेल्या सावित्री नदीकाठी असलेल्या महाड, गांधारपाले, मोहोप्रे, करंजखोल, गांधारी नदीकिनारील लाडवली, नाते, चापगाव, खर्डी या गावांसह बिरवाडी, नडगाव, कोल कोथेरी, राजेवाडी, कोंडिवते आदी गावांमधील भातशेतात गेल्या पाच दिवसांपासून पुराचे पाणी साचून राहिले होते.आमदार गोगावले यांनी के ली जेवणाची व्यवस्थाबिरवाडी : महाड शहरातील पूर ओसरल्यानंतर आमदार भरत गोगावले यांनी बुधवारी मालबाजार पेठेतील नुकसानीची पाहणी करत पूरग्रस्त नागरिक व्यापाऱ्यांची विचारपूस केली. प्रांताधिकारी विठ्ठल नामदार, तहसीलदार चंद्रसेन पवार, महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याबरोबर चर्चा करत पूरपरिस्थितीमधील बचाव कार्याची व नुकसानीची माहिती घेतली, तसेच पूरपरिस्थितीमध्ये महाड-पंढरपूर राज्यमार्गावरील भावे पुलावर पाणी आल्याने अडकलेल्या नागरिकांना आपल्या शिवनेरी येथील निवासस्थानी आणून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली, तर अपघातामध्ये जखमी झालेल्या तरुणाला रा.जि.प. सदस्या सुषमा गोगावले यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने सरकारी मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे गोगावले म्हणाले.

टॅग्स :Rainपाऊस