शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

महाडमध्ये पुरामुळे नुकसानीचे प्रमाण प्रचंड, घरामध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 03:14 IST

गेले आठ दिवस पुराने महाड शहरासह संपूर्ण तालुक्याला वेढा घातला होता. यामुळे वेगवेगळ्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका अनेक गावांना बसला आहे.

- सिकं दर अनवारेदासगाव  - गेले आठ दिवस पुराने महाड शहरासह संपूर्ण तालुक्याला वेढा घातला होता. यामुळे वेगवेगळ्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका अनेक गावांना बसला आहे. नागरिकांना मनस्तापासोबत आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. येथे पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम बहुतेक पूर्ण झाले असले तरी नुकसानीची आकडेवारी निश्चित झालेली नाही. पंचनाम्यामध्ये अद्याप शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत असले तरी शासनाचे काही निष्कर्ष आड येत असल्याने शहर आणि तालुक्याला एकही रुपया मदत मिळालेली नाही.२००५ मध्ये महाड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर येऊन अतिवृष्टी झाली होती. संपूर्ण तालुक्यामध्ये हाहाकार उडाला होता. मात्र, त्यानंतर खबरदारी घेतली होती. १३ वर्षे महाडकर पावसाळ्यामध्ये शांत झोपले. छोटे पूर आले; परंतु काही नुकसान न करता ओसरले. पाऊस येणार लागणार आणि जाणार हा विचार नागरिकांच्या डोक्यात असताना यंदा मात्र पावसाने महाडकरांना चांगलाच फटका दिला आहे. संपूर्ण महाड तालुका पुराच्या पाण्याने जलमय झाला. आठ दिवस पुराचे पाणी महाडमध्ये वेढा घालून बसले होते. १३ वर्षांचा गाफिलपणा यंदा व्यापारी, छोटे-मोठे दुकानदार आणि नदीकाठी असणाऱ्या दुकानदारांना चांगलाच भोवला.महाडमध्ये पूर ओसरेपर्यंत ३२८७ मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली. यामध्ये १ ते ८ आॅगस्ट या आठ दिवसांत १२३४ मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली. या आठ दिवसांच्या पावसामुळे संपूर्ण महाड परिसर आणि शहराला पुराचा वेढा पडला. दरवर्षी छोटे पूर येत असतात. या भ्रमात महाडकर नागरिक राहिले आणि पडणाºया पावसामुळे एकच हाहाकार उडत संपूर्ण महाड जलसंकटात सापडला. तालुका आणि शहर संपूर्ण पाण्याखाली आले. अनेक नागरिक या संकटात सापडले, त्यामुळे एनडीआरएफ यांच्यामार्फत बचावकार्य सुरू करण्यात आले. एनडीआरएफ ने महाड शहर ४००, बिरवाडी ७०, आसनपोई ९०, आके १०, भोराव २५, सव १६, दासगाव ३०, तेटघर १५, काचले ५, कोलोसे १० या दहा ठिकाणांहून ६७१ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम केले. त्याचबरोबर शहर आणि तालुक्यामधील ६१ ठिकाणी पुराचे पाणी घरात शिरून आणि अतिवृष्टीचा फटका बसला. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीमध्ये १९४४ घरे, १५०० दुकाने आणि १५ शेतकऱ्यांचे गुरांचे गोठे यांचा समावेश आहे. यामध्ये १५०० दुकाने आणि १५०० घरेही महाड शहरामधीलच आहेत. त्यामुळे आजही शहरातील अनेक दुकाने बंद आहेत. इतर नुुकसानीप्रमाणे दुधाचा व्यापार करणाºया शेतकºयांनाही पुराने सोडले नसून तालुक्यातील गोंडाळे आणि पाली बु. या दोन गावांमधील शेतकºयांच्यातीन म्हैशी व दोन गाई वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.दोन दिवसांत मदत न मिळाल्यास सरकारचा पंचनामा करू - जगतापमहाड : अतिवृष्टीमुळे महाडमध्ये आलेल्या महापुरात नुकसानग्रस्तांना येत्या दोन दिवसांत सरकारने रोख रक्कम वाटप न केल्यास नुकसानग्रस्तांचे पंचनामे करणाºया सरकारचाच पंचनामा करू, असा इशारा रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार माणिक जगताप यांनी दिला. या महापुरामुळे महाड शहरासह तालुक्यातील व्यापारी, नागरिक तसेच शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूर ओसरून सहा दिवस लोटले तरी पूरग्रस्तांना कोणतीही नुकसानभरपाई तसेच आपद्ग्रस्त कुटुंबांंपर्यंत अद्यापही शासकीय मदत पोहचलेली नाही. त्यामुळे या आपद्ग्रस्तांमध्ये शासनाच्या या कारभाराबाबत तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असल्याचे जगताप यांनी सांगितले. ग्रामीण भागातील अनेक रस्ते वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माणिक जगताप यांनी केला.ज्याठिकाणी दोन दिवस पुराचे पाणी असेल त्याच ठिकाणच्या पूरग्रस्तांना शासकीय मदत मिळणार असल्याचा शासकीय आदेश असल्याने या आदेशाची अंमलबजावणी झाल्यास महाडमधील पूरग्रस्तांना शासकीय रोख रक्कम व मदत मिळणे शक्य नाही, त्यामुळे हा निर्णय रद्द करून शासनाने जुलै २००५ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावा, अशी आग्रही मागणी माणिक जगताप यांनी केली. महाड तालुक्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टीत नुकसान झालेल्या बिरवाडीसह सावरट,शेवते, माझेरी आदी ठिकाणी जगताप यांनी भेट देऊन स्थानिकांशी चर्चा केली.रस्त्याचे नुकसान; गावांचा संपर्क तुटलापावसाने जोर धरल्याने गांधारी आणि सावित्री नद्यांनी अचानक धोक्याच्या पातळ्या ओलांडल्या. त्यामुळे पाडवाडी ते आदिवासीवाडी शहरावरील पूल खचला. बावले गावातील पुलाचे नुकसान झाले. महाडला जोडणाºया दादली पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्याचप्रमाणे काही ठिकाणी अतिवृष्टी होत रस्ते वाहून गेले, तर काही ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे सांदोशी, बावळे, करमर, कावळेत नाते, सावरट, पुनाडे त नाते निजामपूर, पाचाड, निगडे, पिंपळवाडी, माझेरी, वरंध, पारमाची, शिवथर घळ, कोंझर या गावातील २५०० ग्रामस्थांचा संपर्क तुटला, आजही तीच अवस्था आहे.त्याचप्रमाणे कसबे शिवथर, अंबेनळी, सोलमकोंड, धबागडवाडी या गावांमध्ये काही ठिकाणी डोंगराला भेगा पडल्या. काही ठिकाणी घरांना तडे गेले तर काही ठिकाणी धोका निर्माण झाला, त्यामुळे या गावातील ७२ कुटुंबांतील २४२ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.शेती सोडून महाडमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुराच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून काही बंद घरे आणि दुकानांचे शिल्लक आहेत. उद्यापासून शेतीच्या पंचनाम्यांना सुरुवात करण्यात येईल.- विठ्ठल इनामदार, प्रांताधिकारी, महाडशहरामध्ये अचानक पाणी भरण्यास सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात पाण्यात वाढ होईल, एवढी कल्पना नसल्याने दक्षता म्हणून गोडाऊनमधला तांदूळ व इतर मसाले व सामान चार फूट उंचीवर उचलून ठेवले. पाण्याचा जोर वाढला आणि सर्व सामान पाण्यामध्ये गेले. जवळपास साडेतीन लाखांचे नुकसान झाले.- दिनेश तलाठी, दुकानदार2005मध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर दरवर्षी महाड तालुक्यातील अनेक गावांच्या पावसाळ्यापूर्वी महाड आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल विभागाकडून बैठक घेत दक्षतेच्या सूचना देण्यात येत असतात. १३ वर्षे अशीच गेली.13वर्षे महाडकरांनी २००५ सारखा पूर पाहिला नाही. २००५ मधील नुकसान महाडकर नागरिक विसरून गेले होते. या पुराने महाडकरांना पुन्हा जुनी आठवण करून दिल्याने भीतीचे वातावरण निर्माण करून दिले. पुराचे पाणी जरी नद्यांना जाऊन मिळाले असले तरी चार दिवस उलटून गेले.आजही महाडची बाजारपेठ ५० टक्के बंद आहे. संपर्क तुटलेले गावही आज त्याच परिस्थितीत आहेत.प्रशासनाने युद्धपातळीवर पंचनामे सुरू केले असून पंचनामे पूर्ण झाल्याचे दावे करत असले तरी आज शेतीच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत.आलेल्या पुरामध्ये किती नुकसान झाले हेही आज निश्चित झालेले नाही. मात्र, आलेल्या पूर आणि अतिवृष्टीमुळे नागरिकांची झोपउडाली आहे.

टॅग्स :Raigadरायगडfloodपूर