शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

रायगडमधील सर्व बीचेसवर समुद्रात फ्लोटिंग बोयाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 18:21 IST

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नाविण्यपूर्ण योजनेतून उपक्रम

- जयंत धुळप

अलिबाग: पर्यटकांना समुद्रात पोहताना सुरक्षित हद्दीची कल्पना यावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख समुद्र किनाऱ्यांवर फ्लोटींग बोयाज बसवले जात आहेत. पहिल्या टप्प्यात मुरुड आणि काशिद या दोन बीचेसवर बोयाज बसवण्यात आले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून ५ लाख २० हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पर्यटक सुरक्षा व्यवस्था अंतर्गत बीचवर पोहण्याचे सुरक्षित क्षेत्र दर्शविण्यासाठी फ्लोटिंग बोयाज लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नागाव, आक्षी, काशिद, मुरुड, अलिबाग, वरसोली, मांडवा, हरेश्वर, किहिम, रेवदंडा, कोर्लई या सर्व प्रमुख समुद्र किनाऱ्यांवर हे बोयाज लावण्याचं काम सुरु आहे. येत्या १५ दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी लोकमतशी बोलताना दिली.समुद्रात पोहण्याचे सुरक्षित क्षेत्र दर्शवण्यासाठी तसंच धोकादायक पातळी दर्शवण्यासाठी फ्लोटिंग बोयाजचा वापर होतो. समुद्र किनाऱ्याच्या काठापासून साधारणतः ५० ते ६० मीटर अंतरावर किंवा भरती ओहटीच्या पातळ्यांचा अभ्यास करुन व स्थानिकांच्या अनुभवाच्या आधारे ही ठिकाणं निश्चित करण्यात येतात. त्यावर हे बोयाज लावण्याचं काम सध्या सुरु असल्याचं पाठक यांनी पुढे सांगितलं. जिल्ह्यात एकूण ११५ बोयाज बसवण्यात येत आहेत.पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा उपयुक्त उपक्रम असून यामुळे पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांनाही जिल्हा प्रशासनानं पुरेशी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. बीचनिहाय भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असल्यानं साधारणपणे साडेतीन फूट खोलीच्या पुढे समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये. मद्यपान करून पोहू नये. जीव धोक्यात घालून आनंद घेण्याचा प्रयत्न करू नये. आपली स्वत:ची जबाबदारी ओळखून समुद्रात पोहण्यासाठी उतरावं. प्रशासनानं प्रत्येक बीचवर लावलेल्या सुरक्षा सूचना व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सूचनांकडे लक्ष द्यावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. 

टॅग्स :Raigadरायगड