शहरं
Join us  
Trending Stories
1
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
2
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
3
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
4
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
5
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
6
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
7
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
8
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
9
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
10
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
11
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
12
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
13
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
14
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
15
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
16
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
17
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
18
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
19
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
20
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाडमधील पाच गावांना भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: April 17, 2016 01:16 IST

महाड तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगडजवळच असणाऱ्या कोतुर्डे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या करंजखोल, गंधारपाले, केंबुर्ली, वहूर आणि दासगांव

- सिकंदर अनवारे,  दासगावमहाड तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगडजवळच असणाऱ्या कोतुर्डे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या करंजखोल, गंधारपाले, केंबुर्ली, वहूर आणि दासगांव या ५ गावांना सध्या पाणीटंचाईची मोठी झळ बसली होती. गेल्या पाच वर्षांपासून कोतुर्डे धरणाची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होत असून, गेल्या वर्षी याच धरणाला मोठे भगदाड पडले होते. त्या ठिकाणाहून या पाच गावांसाठी सोडण्यात येणारे पाणी या पाच गावांची जॅकवेल जवळपास या धरणापासून २० किमी एवढ्या अंतरावर असल्याने हे धरणाचे सोडलेले पाणी गेल्या १५ दिवसांपासून नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. सध्याच्या या पाच गावांना तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, या पाचही गावांमधून अद्याप एकाही ग्रामपंचायतीने गावासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली नसल्याची माहिती गटविकास अधिकारी महाड संघटना खिलारे यांनी दिली आहे. मात्र पाणीपुरवठ्यासाठी टँकरद्वारे मागणी करूनही पाणी न आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.महाड तालुक्यातील या पाच गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांना रायगडच्या जवळच असलेल्या कोतुर्डे धरणातूनच होत आहे. गेल्या वर्षी धरणाला भगदाड पडून गळती लागली होती. मात्र त्या वेळी त्या धरणाची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून एप्रिल महिन्यातच या धरणापासून या पाच गावांना मिळणारे पाणी बंद होते. पंचायत समिती महाड यांच्यामार्फत या पाचही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. पाच गावांतील जवळपास २५ वाड्यांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली आहे. करंजखोल, गंधारपाले, केंबुर्ली आणि वहूर या गावांना विहिरींची संख्या कमी असून, त्याही विहिरींचे पाणी संपत आले आहे. दासगांवमध्ये काही विहिरी कोरड्या झाल्या आहेत, तर काही विहिरींचे पाणी औद्योगिक वसाहतींच्या सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. परिणामी पाचही गावांची सध्याची पाण्याची परिस्थिती गेल्या १५ दिवसांपासून बिकट आहे व येत्या पावसाळ्यापर्यंत परिस्थिती बिकट राहणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.