शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

जिल्ह्यात शेतकऱ्यांपाठोपाठ मच्छीमार संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 2:08 AM

उपजीविके चा प्रश्न गंभीर; चिंता वाढली

संतोष सापते 

श्रीवर्धन : कोकणातील मुख्य व्यवसाय असलेल्या मच्छीमारीला ‘क्यार’ वादळाचा मोठा फटका बसला आहे. शेतक ऱ्यांविषयी सरकारने संवेदनशीलता दर्शवत तत्काळ नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामास लावली आहे. मात्र, कोकणातील हजारो मच्छीमार व्यावसायिकांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यात कोळी समाजाव्यतिरिक्त मुस्लीम, भंडारी, मराठा या समाजातील लोकही मासेमारीशी निगडित व्यवसाय करतात. वाहतूक, बोट बांधणी, मासेमारीसाठी आवश्यक बाबी यांचा व्यापार नारळी पौर्णिमेनंतर जोरात असतो. नोव्हेंबर-डिसेंबर हा मासेमारीसाठी सुगीचा कालावधी मानला जातो.‘क्यार’चे दुरगामी परिणाम मासेमारीवर झाले आहेत. समुद्रातील वादळाचा धोका पत्करत मासेमारी करणे अवघड झाले आहे. हवामानात अचानक बदल होत आहेत, सकाळी धुक्याचे प्रमाण वाढले आहे. आकाशात कधी लख्ख सूर्यप्रकाश असतो तर कधी मळभ दाटून येते. मेघगर्जना तर कधी विजांचा खेळ सुरू होतो.

जोरदार वारे हे मच्छीमारांच्या दृष्टीने सगळ्यात आव्हानात्मक बाब ठरत आहे. समुद्राच्या भरती-ओहटीविषयी मच्छीमार सजग असतो; परंतु हवामान बदलामुळे समुद्रात निर्माण होणाºया वादळी वाºयाने हैराण झाला आहे. समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या वादळाने मासेमारीसाठी लोकांना समुद्रात दूरवर जावे लागत आहे.अगोदर पाच ते आठ वावपर्यंत मासेमारी करताना सहज मासे मिळत होते; परंतु आज दहा वावच्या पुढे जाऊन मच्छीमारी करावी लागत आहे. त्यामुळे निश्चितच मच्छीमारांच्या समस्या वाढल्या आहेत.श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात दिघी, श्रीवर्धन, शेखार्डी, जीवना, आदगाव, सर्वा, हरवीत, रोहिणी, तुरुबाडी, वाशी या ठिकाणी मासेमारी केली जाते. आज दोन्ही तालुक्यांतील अनेक बोटी किनाºयावर नांगरण्यात आल्या आहेत. जीवितास धोका व उत्पन्नाची हमी नसणे, या दोन्ही बाबी मासेमारी करणाºयांसाठी आव्हानात्मक ठरत आहेत.मदतीची कोळी बांधवांची मागणीकोकणातील सर्वात मोठा मानला गेलेला कोळी समाज हा आजही मुखत्वे मासेमारीवर अवलंबून आहे. उत्पन्नाचे दुसरे साधन नाही त्यामुळे सर्व उपजीविका ही मासेमारीवर चालते. अनेक वर्षांचा पूर्वापार चालत आलेला व्यवयाय म्हणून कोळी समाज मासेमारीकडे बघतो.समाजातील शिक्षणाचे प्रमाण अतिशय नगण्य आहे, त्यामुळे मासेमारी या व्यवसायाला प्राधान्य दिले जाते. गेल्या वर्षीपासून हवामानातील बदल मासेमारी व्यवसायासाठी धोकादायक ठरू लागला आहे. तितली, क्यार व आता ‘महा’ वादळ मासेमारी करणाºया लोकांना देशोधडीला लावत आहे.तर दुसरीकडे कोकणात येणारे रासायनिक प्रकल्प मासेमारी संपुष्टात आणण्यासाठी टपलेले आहेत. कोळी समाजाची श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यांतील लोकसंख्या अंदाजे २२ हजारांच्या जवळपास आहे. शेतकºयांबरोबर मासेमारी करणाºया लोकांना सरकारकडून मदत मिळावी, ही अपेक्षा कोळी बांधव व्यक्त करत आहेत.समुद्रातील वादळाने मासेमारी अवघड झाली आहे, मासे लवकर मिळत नाहीत. अगोदर १ ते २ तासांत मासे मिळत होते. आता पाच ते सहा तास दूर गेल्यावर मासे मिळतात. मात्र, त्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. सर्व लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.- हरिदास वाघे, मच्छीमार, श्रीवर्धनश्रीवर्धन तालुक्यातील अनेक कुटुंबे मासेमारीवर अवलंबून आहेत. निसर्गाचा कोप मासेमारीसाठी घातक ठरत आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. लहान बोटी पाण्यात चालवणे अवघड झाले आहे. वातावरण केव्हा बदलेल ते सांगणे कठीण आहे. सरकारने मासेमारीवर अवलंबून असणाºया लोकांना मदत करावी ही अपेक्षा आहे.- जुनेद दुस्ते,मच्छीमार, श्रीवर्धनआम्ही हजारो रुपये गुंतवणूक करून मासेमारी व्यवसायाला प्रत्येक वर्षी सुरुवात करतो. गेल्या वर्षीपासून समुद्रातील विविध वादळांनी धंद्याची पुरती वाट लावली आहे. धंद्यात गुंतवलेले पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे.- मोहन वाघे,मच्छीमार, जीवनामासेमारी व्यवसायाला वादळाचा फटका बसला आहे, मासे मिळत नाहीत, खलाशी व इतरांचे पगार देणे अवघड झाले आहे. त्यात डिझेलचे दर वाढलेले आहेत. सरकारने मासेमारीचा दुष्काळ जाहीर करून आम्हाला शेतकºयांप्रमाणे मदत करावी.- चंद्रकांत वाघे,व्यावसायिक, जीवना 

टॅग्स :Raigadरायगडfishermanमच्छीमार