शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

महाराष्ट्रातील पहिली बांबू नर्सरी माणगावातील डोंगरोलीमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 03:19 IST

महाराष्ट्रातील पहिली बांबू नर्सरी माणगाव तालुक्यातील डोंगरोली येथे विकसित करण्यात आली आहे.

गिरीश गोरेगावकर गोरेगाव : महाराष्ट्रातील पहिली बांबू नर्सरी माणगाव तालुक्यातील डोंगरोली येथे विकसित करण्यात आली आहे. ही नर्सरी तरुण उद्योजक आनंद पत्की यांनी मोठ्या कल्पकतेने तयार केली आहे. नर्सरीत ग्रीन गोल्डच्या २४ प्रकारच्या जातींचे बांबू आहेत. त्यांनी भारत देशातील विविध राज्यांतून बांबूच्या प्रजाती आणून पहिली बांबू नर्सरी उभारली आहे. त्यासाठी ते विविध राज्यात जाऊन विकसित बांबू जातींचा अभ्यास करून आले आहेत. त्यांच्या नर्सरीतील दक्षिण पूर्व आशियातील उष्ण कटिबंधातील घनदाट वृक्ष जातीतील डेंड्रोकॅलॅमस जाएजांटस किंवा ड्रॅगन बांबू ही जात सध्या लक्षवेधी ठरत आहे. हा जगातील सर्वात मोठा बांबू प्रकार असून, तिचा घेर अंदाजे एक फूट होतो, तर त्याची उंची १०० फूट वाढते. साधारण सहा वर्षांत हा बांबू पूर्णपणे वाढतो. या बांबूची किंमत एक हजार ते दोन हजार होते. त्याचे आयुष्य ६० ते ७० वर्षे असते. एका बांबूच्या रोपापासून दरवर्षी कमीत कमी सहा ते आठ बांबू तयार होतात. चांगल्या जातीची ३५० रोपटी लावली की, त्यापासून २१०० बांबू तयार होतात. एका बांबूचे वजन १०० ते १२० किलो होते, म्हणजेच दोन लाख ५२ हजार किलो टिंबर तयार होते. त्यामुळे सहा वर्षांनंतर अनेक पिढ्यांना या बांबूपासून दरवर्षी वाढीव उत्पन्न मिळत जाते. या बांबूचे उत्पन्न घेणारी व्यक्तीची पुढील पिढी बसून उपन्न मिळवणार आहे.कोकणातील पारंपरिक बांबू ५० ते ६० रु पयाला विकत मिळतो. मात्र, एक बांबू तोडण्यासाठी २० ते ३० रु पये खर्च येतो. विकसित बांबू नर्सरी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे, ते कुठेही लावू शकतो. विशेष म्हणजे, बांबूच्या रोपांना आणि झाडांना पाणी कमी लागते. पत्की यांच्या नर्सरीमध्ये रोपांचीही निर्मिती केली जाते. या रोपांची किंमत २०० ते ३०० रु पये आहे. शेतकऱ्यांनी ही रोपे लावून अनेक पिढ्या उत्पन्न मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. सध्या या रोपाना आॅनलाइन मागणी आहे. बांबूची रोपे मोठ्या कष्टाने मिळतात. या बांबूच्या झाडांना ६६ आणि ९९ वर्षांनी एकदाच फुले येतात. त्यामुळे बरेच वर्षे रोपे मिळविण्यासाठी वाट पाहावी लागते.माणगाव तालुक्यातील डोंगरोली हे गाव मुंबईपासून १५२ कि.मी.वर आहे. पुण्यापासून १०० कि.मी.वर आहे. पत्की यांनी १४ एकरांमध्ये ही नर्सरी उभी केली आहे. त्यामध्ये २४ प्रकारच्या ग्रीन गोल्ड जाती आहेत. मुंबई महामार्गापासून सात कि.मी.वर डोंगरोली हे गाव असून, नर्सरीच्या सभोवती घनदाट झाडी असून, बांबू संवर्धनासाठी अनकूल हवामान आहे. दरवर्षी या भागात दोन हजार मि.मी. पाऊस पडतो; परंतु पाणी साठत नाही. यासाठी पत्की यांनी दोन तलाव बांधले आहेत. शिवाय पॉलिहाउस व शेडनेट बांधले आहे. बांबू ही वनस्पती नैसर्गिक कठीण परिस्थितीत चांगल्या प्रकारे जगू शकते. साधारण तीन वर्षांनी हे झाड बºयापैकी तयार होते. सहा वर्षांनंतर तोडणी दरवर्षी करू शकतो, असे पत्की यांनी सांगितले.>भारतात बांबूचे ४.६ दशलक्ष टन उत्पादन होते. त्यापैकी १.९ दशलक्ष टन उत्पादन पल्प (लगदा) उद्योगात होते. केंद्र सरकारने बांबू संवर्धन करणाºया खेड्यांलगत १०८ मार्केट्स तयार केली आहेत.या शेतीसाठी ऊर्जेची गरज होती, म्हणून त्यांनी पवन चक्कीद्वारे दहापट वीज स्वस्त पद्धतीने निर्माण करून, बांबू व्यवसायात लोकप्रिय होण्यासाठी व्यापारपेठेत सहभागी घेतला. शेतकºयांना बांबू लागवड करणे, नर्सरी तयार करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, उत्पादकांना मार्केट देणे, प्रोत्साहन, आर्थिक मदत यासाठी प्रयत्न करत आहेत.