शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

वसईतील ग्रा.पं.च्या आर्थिक नाड्या आवळल्या

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

वसई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींवर आर्थिक संकट ओढावले असून पंचायतीचा आर्थिक डोलारा सांभाळणाऱ्या घरपट्टीची वसुली बंद आहे.

पारोळ : वसई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींवर आर्थिक संकट ओढावले असून पंचायतीचा आर्थिक डोलारा सांभाळणाऱ्या घरपट्टीची वसुली बंद आहे. आता मालमत्तेवर घरपट्टी आकारणी करण्याचा विचार शासन करत असल्याने चार महिने घरपट्टी वसुली ठप्प आहे. ही आकारणी अमलात येईपर्यंत ग्रामपंचायतीचा आर्थिक भार कसा पेलायचा, असा प्रश्न सरपंच व उपसरपंच यांना पडला आहे. तर, नवीन घरपट्टी पावती मिळत नसल्याने नागरिकांची इतर कामे अडकली आहेत.काही वर्षांपूर्वी शासनाने स्क्वेअर फुटांप्रमाणे घरपट्टी आकारणीचे आदेश दिले. तसेच ग्रामपंचायतींना विकासासाठी मिळणाऱ्या निधीतही कपात करण्यात आली. पण, शासन आता मालमत्तेच्या किमतीनुसार घरपट्टी आकारणीचा विचार करत असल्यामुळे एप्रिलपासून सर्व ग्रामपंचायतींना घरपट्टी वसूल न करण्याचा आदेश आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांचे पगार थकले, तसेच काही ग्रामपंचायतींचे तर वीजबिल, वृक्षारोपणाचेही बिल थकले आहे. पावसाळ्याचा विचार करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या फवारणीसाठीही निधी उपलब्ध नसल्याचे ग्रामपंचायत सदस्य सांगतात.याबाबत, वसईच्या गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता याबाबतचा आदेश अजून आला नसल्याचे सांगून पुढे बोलण्याचे टाळले. (वार्ताहर)