शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

Fathers Day: बाप राबतोय शेतात अन् अ‍ॅन्ड्रॉइड फोन पोरांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:51 IST

ग्रामीण भागातील विदारक सत्य; मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल

- शरद निकुंभ पाली : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बळीराजा खूश झाला असून, ग्रामीण भागात पेरणीपूर्व कामांची लगबग सुरू झाली आहे. शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. आपल्या वडिलांची धावपळ सुरू असताना तरुण पोरं मात्र मोबाइल हातात धरून तासन्तास फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि मनोरंजन करण्यात गुंग असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. गुड मॉर्निंग, गुड नाइटचे संदेश, दिवसभरात वाढदिवसांच्या शुभेच्छा, टीकात्मक लेख, टिकटॉकच्या मागे वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी वडिलांना शेतीच्या कामात मदत गेल्यास मजुरांवर होणारा खर्च वाचेल, शिवाय उत्पादनातही वाढ होईल, अशी भावना सध्या ग्रामीण भागातील चिंतातून बळीराजाकडून व्यक्त होत आहे.सध्या शेतीच्या कामासाठी मजुरांची कमतरता भासत आहे, त्यामुळे अधिक मजुरी द्यावी लागत आहे. अशा स्थितीत घरातील तरुण पोरगा मात्र आपल्या वडिलांना शेतात हातभार लावायचा सोडून निरर्थक कामात आपला वेळ वाया घालवत आहे. शेतातील कामाची आजच्या तरुणांना लाज वाटत असल्याचे चित्र अनेक कुटुंबांत पाहायला मिळत आहे. मदर डे आणि फादर डे च्या शुभेच्छा फक्त मोबाइलवर देऊन कृती मात्र शून्य असते. आईवडिलांची घरकामात, शेतीच्या कामात मदत करण्यापेक्षा सोशल मीडियावर अधिकाधिक वेळ घालविण्यात ही पिढी धन्यता मानत आहे.आजचा तरुणवर्ग मोबाइलच्या फेºयात गुरफटला आहे. त्यामुळे शेतीच्या कामात मदत करायला तयार नाही. शेतकरी असून शेतीच्या कामांची त्याला पुरेशी माहिती नाही. पुढील पिढी शेतीचे काम करेल, असा प्रश्न पालकांना पडतो. शिक्षणाबरोबरच शेतीचे शिक्षणही तरुण पिढीने घेणे, काळाची गरज आहे.- किसन उमटे,शेतकरी, कानसळवडिलांनी शेती तरुण पिढीने टिकवणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावर तासन्तास वेळ वाया घालविण्यात धन्यता मानणारी ही पिढी वडिलांच्या कष्टाला कशी न्याय देणार? शिक्षण झाले तरी नोकरी नाही आणि शेतीचे काम येत नाही तर पुढे ही मंडळी काय करणार असा प्रश्न आहे?- राजेश गोळे,सामाजिक कार्यकर्ते, पेडली

टॅग्स :Farmerशेतकरी