शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Fathers Day: बाप राबतोय शेतात अन् अ‍ॅन्ड्रॉइड फोन पोरांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:51 IST

ग्रामीण भागातील विदारक सत्य; मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल

- शरद निकुंभ पाली : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बळीराजा खूश झाला असून, ग्रामीण भागात पेरणीपूर्व कामांची लगबग सुरू झाली आहे. शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. आपल्या वडिलांची धावपळ सुरू असताना तरुण पोरं मात्र मोबाइल हातात धरून तासन्तास फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि मनोरंजन करण्यात गुंग असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. गुड मॉर्निंग, गुड नाइटचे संदेश, दिवसभरात वाढदिवसांच्या शुभेच्छा, टीकात्मक लेख, टिकटॉकच्या मागे वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी वडिलांना शेतीच्या कामात मदत गेल्यास मजुरांवर होणारा खर्च वाचेल, शिवाय उत्पादनातही वाढ होईल, अशी भावना सध्या ग्रामीण भागातील चिंतातून बळीराजाकडून व्यक्त होत आहे.सध्या शेतीच्या कामासाठी मजुरांची कमतरता भासत आहे, त्यामुळे अधिक मजुरी द्यावी लागत आहे. अशा स्थितीत घरातील तरुण पोरगा मात्र आपल्या वडिलांना शेतात हातभार लावायचा सोडून निरर्थक कामात आपला वेळ वाया घालवत आहे. शेतातील कामाची आजच्या तरुणांना लाज वाटत असल्याचे चित्र अनेक कुटुंबांत पाहायला मिळत आहे. मदर डे आणि फादर डे च्या शुभेच्छा फक्त मोबाइलवर देऊन कृती मात्र शून्य असते. आईवडिलांची घरकामात, शेतीच्या कामात मदत करण्यापेक्षा सोशल मीडियावर अधिकाधिक वेळ घालविण्यात ही पिढी धन्यता मानत आहे.आजचा तरुणवर्ग मोबाइलच्या फेºयात गुरफटला आहे. त्यामुळे शेतीच्या कामात मदत करायला तयार नाही. शेतकरी असून शेतीच्या कामांची त्याला पुरेशी माहिती नाही. पुढील पिढी शेतीचे काम करेल, असा प्रश्न पालकांना पडतो. शिक्षणाबरोबरच शेतीचे शिक्षणही तरुण पिढीने घेणे, काळाची गरज आहे.- किसन उमटे,शेतकरी, कानसळवडिलांनी शेती तरुण पिढीने टिकवणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावर तासन्तास वेळ वाया घालविण्यात धन्यता मानणारी ही पिढी वडिलांच्या कष्टाला कशी न्याय देणार? शिक्षण झाले तरी नोकरी नाही आणि शेतीचे काम येत नाही तर पुढे ही मंडळी काय करणार असा प्रश्न आहे?- राजेश गोळे,सामाजिक कार्यकर्ते, पेडली

टॅग्स :Farmerशेतकरी