शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

फार्महाउस मालकाने बंद केली धोत्रेवाडीची विहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:57 IST

झाडांना वापर : पाणी देण्याची आदिवासी बांधवांची मागणी

- कांता हाबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातील धोत्रेवाडीमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तेथील दोन विहिरीपैकी एक विहीर आटली आहे, तर दुसरी विहीर खासगी जमीन मालकाने आपल्या फार्महाउसमध्ये कुंपणबंद केली आहे. शासनाच्या निधीमधून बांधण्यात आलेल्या विहिरीमधील पाणी फार्महाउस मालक वीज पंप लावून आपल्या बागेतील झाडांना घालत आहेत. मात्र, त्या वेळी बाजूच्या गावातील लोकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, तर शासनाच्या निधीमधून बांधलेल्या विहिरीचे पाणी मिळावे यासाठी आता आंदोलन करण्याचा इशारा आदिवासींनी दिला आहे.

कर्जत तालुक्यातील उन्हाळ्याने पाणीटंचाईचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त भागातील ग्रामस्थांची वणवण वाढली आहे. तालुक्यातील तब्बल ३९ गावे आणि ५७ आदिवासी वाड्या पाणीटंचाईग्रस्त आहेत. असे असताना पाथरज ग्रामपंचायतीमधील धोत्रेवाडीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी लोकांना वणवण करावी लागत आहे. आदिवासी विकास विभागाने त्या वाडीसाठी दोन विहिरी खोदून दिल्या आहेत, त्यातील एका विहिरीने तळ गाठला असून दुसरी विहीर पाण्याने तुडुंब भरली आहे. मात्र, ती विहीर शेतकरी असलेल्या खासगी व्यक्तीच्या जागेत खोदल्यानंतर ही जमीन नवी मुंबई येथील व्यक्तीने खरेदी केली आणि सरकारी निधीमधून खोदण्यात आलेली विहीर त्या नवीन जमीन मालकाची झाली. मात्र, त्या आधी ती विहिरी धोत्रेवाडीमधील आदिवासी लोकांसाठी पिण्याचे पाणी देत होती. ती विहीर संबंधित जमिनीचे मालक नवीन झाल्याने विहीर कुंपणात गेली. नवी मुंबईमधील त्या जमीन मालकाने आपल्या जमिनीला कुंपण घातल्याने आणि आतमध्ये कोणालाही प्रवेश देण्यास विरोध केल्याने धोत्रेवाडीमधील लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

धोत्रेवाडीमधील आदिवासी लोकांनी त्या जमीन मालकाविरु द्ध गतवर्षी जोरदार आवाज उठविल्यानंतर कर्जत तहसील कार्यालयाने विहिरीचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मे २०१८ मध्ये तहसीलदारांनी पाठ फिरली आणि पुन्हा त्या फार्म हाउस मालकाने आपल्या जमिनीतील विहिरीजवळ येण्याचा मार्ग बंद केला.

यावर्षी धोत्रेवाडीमध्ये पुन्हा एकदा पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवली असून शासनाच्या निधीमधून बांधलेली विहीर फार्म हाउस मालकाने कुंपण घालून बंद केली आहे. हा जमीन मालक शासनाच्या निधीमधून बांधलेल्या विहिरीचे पाणी वीज पंप लावून आपल्या फार्महाउसमधील झाडांना टाकत आहे.त्यामुळे स्थानिक आदिवासी संतप्त झाले असून त्यांनी शासनाच्या निधीमधून बांधलेल्या विहिरीचे पाणी मिळावे यासाठी आता आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश काळात पिण्याच्या पाण्यासाठी कोणालाही अडवू शकत नाही. या काळात झाडांपेक्षा मनुष्यप्राणी महत्त्वाचा समजला जातो, त्यामुळे तक्र ारी प्राप्त होताच विहिरीचे अधिग्रहण करण्याची कार्यवाही केली जाईल.- अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जतधोत्रेवाडीमधील विहिरीत भरपूर पाणी असून देखील आमच्या वाडीतील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी वणवण करावी लागत आहे.आम्हाला आमच्या विहिरीचे पाणी हवे आहे.- जयवंती हिंदोळा,ग्रामस्थ

टॅग्स :water shortageपाणीटंचाई