शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

फार्महाउस मालकाने बंद केली धोत्रेवाडीची विहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:57 IST

झाडांना वापर : पाणी देण्याची आदिवासी बांधवांची मागणी

- कांता हाबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातील धोत्रेवाडीमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तेथील दोन विहिरीपैकी एक विहीर आटली आहे, तर दुसरी विहीर खासगी जमीन मालकाने आपल्या फार्महाउसमध्ये कुंपणबंद केली आहे. शासनाच्या निधीमधून बांधण्यात आलेल्या विहिरीमधील पाणी फार्महाउस मालक वीज पंप लावून आपल्या बागेतील झाडांना घालत आहेत. मात्र, त्या वेळी बाजूच्या गावातील लोकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, तर शासनाच्या निधीमधून बांधलेल्या विहिरीचे पाणी मिळावे यासाठी आता आंदोलन करण्याचा इशारा आदिवासींनी दिला आहे.

कर्जत तालुक्यातील उन्हाळ्याने पाणीटंचाईचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त भागातील ग्रामस्थांची वणवण वाढली आहे. तालुक्यातील तब्बल ३९ गावे आणि ५७ आदिवासी वाड्या पाणीटंचाईग्रस्त आहेत. असे असताना पाथरज ग्रामपंचायतीमधील धोत्रेवाडीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी लोकांना वणवण करावी लागत आहे. आदिवासी विकास विभागाने त्या वाडीसाठी दोन विहिरी खोदून दिल्या आहेत, त्यातील एका विहिरीने तळ गाठला असून दुसरी विहीर पाण्याने तुडुंब भरली आहे. मात्र, ती विहीर शेतकरी असलेल्या खासगी व्यक्तीच्या जागेत खोदल्यानंतर ही जमीन नवी मुंबई येथील व्यक्तीने खरेदी केली आणि सरकारी निधीमधून खोदण्यात आलेली विहीर त्या नवीन जमीन मालकाची झाली. मात्र, त्या आधी ती विहिरी धोत्रेवाडीमधील आदिवासी लोकांसाठी पिण्याचे पाणी देत होती. ती विहीर संबंधित जमिनीचे मालक नवीन झाल्याने विहीर कुंपणात गेली. नवी मुंबईमधील त्या जमीन मालकाने आपल्या जमिनीला कुंपण घातल्याने आणि आतमध्ये कोणालाही प्रवेश देण्यास विरोध केल्याने धोत्रेवाडीमधील लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

धोत्रेवाडीमधील आदिवासी लोकांनी त्या जमीन मालकाविरु द्ध गतवर्षी जोरदार आवाज उठविल्यानंतर कर्जत तहसील कार्यालयाने विहिरीचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मे २०१८ मध्ये तहसीलदारांनी पाठ फिरली आणि पुन्हा त्या फार्म हाउस मालकाने आपल्या जमिनीतील विहिरीजवळ येण्याचा मार्ग बंद केला.

यावर्षी धोत्रेवाडीमध्ये पुन्हा एकदा पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवली असून शासनाच्या निधीमधून बांधलेली विहीर फार्म हाउस मालकाने कुंपण घालून बंद केली आहे. हा जमीन मालक शासनाच्या निधीमधून बांधलेल्या विहिरीचे पाणी वीज पंप लावून आपल्या फार्महाउसमधील झाडांना टाकत आहे.त्यामुळे स्थानिक आदिवासी संतप्त झाले असून त्यांनी शासनाच्या निधीमधून बांधलेल्या विहिरीचे पाणी मिळावे यासाठी आता आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश काळात पिण्याच्या पाण्यासाठी कोणालाही अडवू शकत नाही. या काळात झाडांपेक्षा मनुष्यप्राणी महत्त्वाचा समजला जातो, त्यामुळे तक्र ारी प्राप्त होताच विहिरीचे अधिग्रहण करण्याची कार्यवाही केली जाईल.- अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जतधोत्रेवाडीमधील विहिरीत भरपूर पाणी असून देखील आमच्या वाडीतील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी वणवण करावी लागत आहे.आम्हाला आमच्या विहिरीचे पाणी हवे आहे.- जयवंती हिंदोळा,ग्रामस्थ

टॅग्स :water shortageपाणीटंचाई