शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

माणगाव तालुक्यातील भातशेती पाण्यात गेल्याने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 02:12 IST

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून संपूर्ण कोकणासह रायगड जिल्ह्याला सततच्या पावसाने झोडपले असल्याने माणगाव तालुक्यातील हजारो हेक्टर भातशेती पावसाच्या पाण्याखाली आली आहे.

माणगाव : जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून संपूर्ण कोकणासह रायगड जिल्ह्याला सततच्या पावसाने झोडपले असल्याने माणगाव तालुक्यातील हजारो हेक्टर भातशेती पावसाच्या पाण्याखाली आली आहे. यामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. पावसाचे, नदीनाल्यांचे, पुराचे पाणी शेतात राहिल्याने भातशेती खराब झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग नुकसानीमुळे घाबरला आहे.शेतकऱ्यांनी पारंपरिक पध्दतीने भातशेतीची लावणी करून घेतली. या संततधार पावसाने काही भागातील लावणीसुध्दा करावयाची बाकी राहिली आहेत तर भातशेतीचे आवाण(रोप) चांगली उगवली, परंतु या पावसाचे पाणी तुडुंब शेतात भरल्याने रोपे कुजली आहेत. त्यामुळे शेतकरी आवाण (रोप) लावण्याकरिता आवाण शोधत फिरताना दिसत आहेत.माणगाव तालुक्याची भौगोलिक स्थिती पाहता सदर डोंगर, टेकड्या, नद्या-नाले यांनी व्यापले आहे.त्यामुळे या भागात पावसाळ्यात जोरदार अतिवृष्टी झाल्यावर डोंगर माथ्यावरील पावसाचे पाणी त्या त्या ठिकाणच्या नाल्यातून ओहळाद्वारे नदीत जाते. या पाण्यामुळे माणगावमधील काळ नदीस पूर येते. पुराचे पाणी सखल भागातील भातशेतीत घुसल्याने भातशेती खराब झाली आहे. पर्यायी शेतकºयाची मेहनत व आर्थिक नुकसान माणगाव तालुक्यात झाले आहे.माणगाव विभागात गोरेगाव विभाग, पेण- खरवली विभाग, मोर्बा विभाग, लोणेरे विभाग, इंदापूर विभाग, निजामपूर विभागातील शेतकºयाची हजारो हेक्टर भातशेती पाण्याखाली येवून नुकसान झाले आहे.शासनाने त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकºयांना मदत मिळावी ही मागणी होत आहे.>संततधार पावसाने शेतात पाणी तुंबल्याने सखल भागातील शेती कुजून खराब झाल्याचे, तसेच लावणी केलेली शेती सुध्दा खराब होवू लागल्याचे निदर्शनास आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार ३०० ते ४०० एकर शेतजमीन तालुक्यात खराब झाल्याचे दिसते, तरी उर्वरित रोपे शेतकºयांनी एककाडी पध्दतीने शेती करावी जेणेकरून रोपे कमी लागतील.-पी.बी. नवले, तालुका कृषी अधिकारी, माणगाव>आमच्या शेतीची लावणी लवकर केली होती. परंतु या सततच्या पडणाºया पावसाने आमची भातशेती पाण्यात बुडून गेल्याने खराब झाली आहे.-उदय गायकवाड, शेतकरीमाझ्या शेतीमधील आवाण पावसाने खराब झाले आहे. आता या शेतीत आवाण शोधण्याकरिता मी फिरत आहे.-दुर्वास म्हशेळकर,शेतकरी, गोरेगाव