शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

यंदा शेतकऱ्यांची दिवाळी चिंतेत; पावसामुळे महाडमध्ये ९० टक्के शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 00:19 IST

परतीच्या पावसाने महाड तालुक्यातील जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले.

दासगाव :यंदा पावसाने संपूर्ण महाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. काही शेतकऱ्यांची संपूर्ण शेतीच नेस्तनाबूद झाली. शासनाकडून लवकरच मदत मिळण्याची आशा होती. मात्र, चार दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या सणासाठी नुकसानीचा मोबदला शासनाकडून मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना असताना अद्याप एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा न झाल्याने दिवाळीला शासनाकडून मदत मिळण्याची आशा संपली असल्याने आता दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

परतीच्या पावसाने महाड तालुक्यातील जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले. शेतकऱ्यांचे वर्षाचे भातपीक नष्ट करून टाकले. शेवटी शेतकऱ्यांकडे शासनाच्या मदतीशिवाय काही एक उपाय शिल्लक राहिलेला नाही. शासनाने मदत जाहीर जरी केली असली तरी हेक्टरी दर निश्चित केला नाही. कृषी खात्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामेही पूर्ण करण्यात आले असून तसा अहवाल महसूल विभागाला कृषी विभागाने दिला आहे. लवकरच मदतीची रक्कम आपल्या खात्यात जमा होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.

चार दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. शेतकऱ्याच्या घरामध्ये भाताचा एक दानाही नाही. खर्चाला एक रुपया नाही. अशा प्ररिस्थितीत शेतकऱ्यांनी दिवाळी सण कसा साजरा करायचा, हा प्रश्न समोर आहे. दरवर्षी हाच शेतकरी दिवाळीअगोदर भातकापणी करून भात विकून मिळालेल्या पैशांतून आनंदाने दिवाळी साजरी करीत असे. यंदा परतीच्या पावसाने केलेल्या या नुकसानीमुळे शेतकरी दिवाळी साजरी करून शकणार नाही.

शासनाकडून काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते की, शेतकऱ्यांची दिवाळी गोड जाईल. मात्र गोडतर राहिली बाजूला, दिवाळी मोठ्या अडचणीत आली आहे. काही शेतकऱ्यांनी आता शिल्लक राहिलेले भात कापून सुकवून ते विकून जे पैसे मिळतील त्यामध्ये दिवाळी साजरी करण्याचे ठरविले आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे शेतकरी यंदा दिवाळी आनंदाने साजरी करू शकणार नाहीत. 

टॅग्स :Farmerशेतकरी