शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

यंदा शेतकऱ्यांची दिवाळी चिंतेत; पावसामुळे महाडमध्ये ९० टक्के शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 00:19 IST

परतीच्या पावसाने महाड तालुक्यातील जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले.

दासगाव :यंदा पावसाने संपूर्ण महाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. काही शेतकऱ्यांची संपूर्ण शेतीच नेस्तनाबूद झाली. शासनाकडून लवकरच मदत मिळण्याची आशा होती. मात्र, चार दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या सणासाठी नुकसानीचा मोबदला शासनाकडून मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना असताना अद्याप एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा न झाल्याने दिवाळीला शासनाकडून मदत मिळण्याची आशा संपली असल्याने आता दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

परतीच्या पावसाने महाड तालुक्यातील जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले. शेतकऱ्यांचे वर्षाचे भातपीक नष्ट करून टाकले. शेवटी शेतकऱ्यांकडे शासनाच्या मदतीशिवाय काही एक उपाय शिल्लक राहिलेला नाही. शासनाने मदत जाहीर जरी केली असली तरी हेक्टरी दर निश्चित केला नाही. कृषी खात्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामेही पूर्ण करण्यात आले असून तसा अहवाल महसूल विभागाला कृषी विभागाने दिला आहे. लवकरच मदतीची रक्कम आपल्या खात्यात जमा होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.

चार दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. शेतकऱ्याच्या घरामध्ये भाताचा एक दानाही नाही. खर्चाला एक रुपया नाही. अशा प्ररिस्थितीत शेतकऱ्यांनी दिवाळी सण कसा साजरा करायचा, हा प्रश्न समोर आहे. दरवर्षी हाच शेतकरी दिवाळीअगोदर भातकापणी करून भात विकून मिळालेल्या पैशांतून आनंदाने दिवाळी साजरी करीत असे. यंदा परतीच्या पावसाने केलेल्या या नुकसानीमुळे शेतकरी दिवाळी साजरी करून शकणार नाही.

शासनाकडून काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते की, शेतकऱ्यांची दिवाळी गोड जाईल. मात्र गोडतर राहिली बाजूला, दिवाळी मोठ्या अडचणीत आली आहे. काही शेतकऱ्यांनी आता शिल्लक राहिलेले भात कापून सुकवून ते विकून जे पैसे मिळतील त्यामध्ये दिवाळी साजरी करण्याचे ठरविले आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे शेतकरी यंदा दिवाळी आनंदाने साजरी करू शकणार नाहीत. 

टॅग्स :Farmerशेतकरी