शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

यंदा शेतकऱ्यांची दिवाळी चिंतेत; पावसामुळे महाडमध्ये ९० टक्के शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 00:19 IST

परतीच्या पावसाने महाड तालुक्यातील जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले.

दासगाव :यंदा पावसाने संपूर्ण महाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. काही शेतकऱ्यांची संपूर्ण शेतीच नेस्तनाबूद झाली. शासनाकडून लवकरच मदत मिळण्याची आशा होती. मात्र, चार दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या सणासाठी नुकसानीचा मोबदला शासनाकडून मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना असताना अद्याप एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा न झाल्याने दिवाळीला शासनाकडून मदत मिळण्याची आशा संपली असल्याने आता दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

परतीच्या पावसाने महाड तालुक्यातील जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले. शेतकऱ्यांचे वर्षाचे भातपीक नष्ट करून टाकले. शेवटी शेतकऱ्यांकडे शासनाच्या मदतीशिवाय काही एक उपाय शिल्लक राहिलेला नाही. शासनाने मदत जाहीर जरी केली असली तरी हेक्टरी दर निश्चित केला नाही. कृषी खात्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामेही पूर्ण करण्यात आले असून तसा अहवाल महसूल विभागाला कृषी विभागाने दिला आहे. लवकरच मदतीची रक्कम आपल्या खात्यात जमा होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.

चार दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. शेतकऱ्याच्या घरामध्ये भाताचा एक दानाही नाही. खर्चाला एक रुपया नाही. अशा प्ररिस्थितीत शेतकऱ्यांनी दिवाळी सण कसा साजरा करायचा, हा प्रश्न समोर आहे. दरवर्षी हाच शेतकरी दिवाळीअगोदर भातकापणी करून भात विकून मिळालेल्या पैशांतून आनंदाने दिवाळी साजरी करीत असे. यंदा परतीच्या पावसाने केलेल्या या नुकसानीमुळे शेतकरी दिवाळी साजरी करून शकणार नाही.

शासनाकडून काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते की, शेतकऱ्यांची दिवाळी गोड जाईल. मात्र गोडतर राहिली बाजूला, दिवाळी मोठ्या अडचणीत आली आहे. काही शेतकऱ्यांनी आता शिल्लक राहिलेले भात कापून सुकवून ते विकून जे पैसे मिळतील त्यामध्ये दिवाळी साजरी करण्याचे ठरविले आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे शेतकरी यंदा दिवाळी आनंदाने साजरी करू शकणार नाहीत. 

टॅग्स :Farmerशेतकरी