शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

प्रकल्पाला जमीन देताना शेतकऱ्यांनी पार्टनरशिप मागावी, राज ठाकरेंचा रायगडकरांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 07:35 IST

अलिबाग येथे सोमवारी रायगड भूमी रक्षणासाठी मनसेतर्फे जमीन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

अलिबाग : महाराष्ट्रात जे जे चांगले आहे, ते ते हिसकावले जात आहे. महाराष्ट्रावर रोज अत्याचार होत आहेत, अशी खंत व्यक्त करत रायगड जिल्ह्यातही विविध प्रकल्प, कॉरिडॉर आणि विकासाच्या नावाने दलालांमार्फत जमिनी विकत घेतल्या जात आहेत. प्रकल्पाला जमीन मागितली जात असेल तर शेतकऱ्यांनी त्यात पार्टनरशिप मागावी, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडकरांना दिला आहे.

अलिबाग येथे सोमवारी रायगड भूमी रक्षणासाठी मनसेतर्फे जमीन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज ठाकरे यांनी भूसंपादनामुळे होणाऱ्या परिणामांबाबत पत्रकारांशी संवाद साधला. जमिनी राहिल्या नाहीत तर तुम्ही बेघर व्हाल. त्यामुळे जमिनी विकू नका. सध्या कुंपणच शेत खात आहे. जिल्हा शांतपणे पोखरत चालले आहेत. तो वाचविणे गरजेचे आहे. जमीन घेणारे बाहेरचे असले तरी त्यामागे राजकीय हस्तक्षेप आहे. दलाल कवडीमोल भावाने जमीन विकत घेऊन चढ्या भावाने समोरच्याला विकत आहेत. त्यामुळे येथील भूधारक बेघर होण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी विविध दाखले देत सांगितले. 

अप्पासाहेब धर्माधिकारींची घेतली भेटरेवदंडा येथे सकाळी पद्मश्री डाॅ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. आपणही शेतकऱ्यांमध्ये जमिनी विकू नका, याबाबत जनजागृती करा, यासाठी त्यांची भेट घेतल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

मराठी उद्योजक असेल, तर मदत कराजमीन भुसभुशीत असेल तर घुशी लागतात. कडक असेल तर नाही. पुणे जिल्ह्यातील हिंजवडी हे गाव आज गायब झाले आहे. तशीच जिल्ह्यातील गावे गायब होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जमिनी विकून आपले अस्तित्व मिटवू नका. पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असून, आपणच शेतकऱ्यांना शिक्षित करा, असे आवाहनही त्यांनी पत्रकारांना केले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRaigadरायगड