शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

रायगड जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 06:57 IST

रायगड जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३३ अंशांच्या घरात पोहोचला आहे. उन्हाच्या असह्य झळांमुळे भल्या पहाटेपासूनच शेतकऱ्यांची कामासाठी लगबग सुरू आहे. शेतकºयांना ऊन डोक्यावर घेऊन शेतात राबावे लागत आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला आहे. यामुळे अंगाची लाहीलाही होत असली तरी पावसाळा जवळ येत असल्याने भर उन्हात शेतकरी शेती मशागतीच्या कामाला लागला आहे. या वर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात येणार असून, यासाठी शेतकऱ्यांसह कृषी विभागही सज्ज होत आहे.रायगड जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३३ अंशांच्या घरात पोहोचला आहे. उन्हाच्या असह्य झळांमुळे भल्या पहाटेपासूनच शेतकऱ्यांची कामासाठी लगबग सुरू आहे. शेतकºयांना ऊन डोक्यावर घेऊन शेतात राबावे लागत आहे.जिल्ह्यात चालू वर्षात खरीप हंगामात १ लाख १४ हजार हेक्टरवर पिकाची लागवड करण्यात येणार आहे. यामधील १ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर भातपिकाची लागवड करण्यात येईल. तर उर्वरित क्षेत्रांवर इतर पिकांची लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या भाताचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी तयारी करत आहे. पालापाचोळा जमा करून, राब जाळण्याच्या कामात शेतकरी मग्न आहे. तसेच पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी बांधाला लागून चर खोदणे, शेतीची बांधबंदिस्ती करण्याचे काम सर्वत्र सुरू असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी शेतीची नांगरणी करण्याचे काम सुरू आहे.बैलजोडीच्या मदतीने पूर्वी मशागतीची कामे केली जात होती. मात्र आता या कामात शेतकºयांनी आधुनिकतेची कास धरण्यास सुरु वात केली आहे. मशागतीच्या कामासाठी ट्रॅ्क्टरचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. यामध्ये नांगरणी, वखरणी, शेतीचे सपाटीकरण करणे या कामांचा समावेश आहे.मुंबईकरांचा कामाला हातभारतळा : संपूर्ण जग कोरोना महामारी रोगाने हादरले आहे. लॉकडाउन व संचारबंदीमुळे मुंबईकर मंडळी गावाकडे आली आहेत आणि त्याचा फायदा शेतकºयांना होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. तळा तालुक्यातील बळीराजाने आपल्या शेतात मान्सूनपूर्व शेती-मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. यंदा मान्सून लवकर येण्याची चिन्हे दिसू लागली असल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. नदी, धरणाच्या पाण्यावर असणारी उन्हाळी शेती तयार होत असून कोरडवाहू शेतीत बळीराजा कामात गुंतला आहे.

टॅग्स :Raigadरायगड