शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 06:57 IST

रायगड जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३३ अंशांच्या घरात पोहोचला आहे. उन्हाच्या असह्य झळांमुळे भल्या पहाटेपासूनच शेतकऱ्यांची कामासाठी लगबग सुरू आहे. शेतकºयांना ऊन डोक्यावर घेऊन शेतात राबावे लागत आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला आहे. यामुळे अंगाची लाहीलाही होत असली तरी पावसाळा जवळ येत असल्याने भर उन्हात शेतकरी शेती मशागतीच्या कामाला लागला आहे. या वर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात येणार असून, यासाठी शेतकऱ्यांसह कृषी विभागही सज्ज होत आहे.रायगड जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३३ अंशांच्या घरात पोहोचला आहे. उन्हाच्या असह्य झळांमुळे भल्या पहाटेपासूनच शेतकऱ्यांची कामासाठी लगबग सुरू आहे. शेतकºयांना ऊन डोक्यावर घेऊन शेतात राबावे लागत आहे.जिल्ह्यात चालू वर्षात खरीप हंगामात १ लाख १४ हजार हेक्टरवर पिकाची लागवड करण्यात येणार आहे. यामधील १ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर भातपिकाची लागवड करण्यात येईल. तर उर्वरित क्षेत्रांवर इतर पिकांची लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या भाताचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी तयारी करत आहे. पालापाचोळा जमा करून, राब जाळण्याच्या कामात शेतकरी मग्न आहे. तसेच पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी बांधाला लागून चर खोदणे, शेतीची बांधबंदिस्ती करण्याचे काम सर्वत्र सुरू असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी शेतीची नांगरणी करण्याचे काम सुरू आहे.बैलजोडीच्या मदतीने पूर्वी मशागतीची कामे केली जात होती. मात्र आता या कामात शेतकºयांनी आधुनिकतेची कास धरण्यास सुरु वात केली आहे. मशागतीच्या कामासाठी ट्रॅ्क्टरचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. यामध्ये नांगरणी, वखरणी, शेतीचे सपाटीकरण करणे या कामांचा समावेश आहे.मुंबईकरांचा कामाला हातभारतळा : संपूर्ण जग कोरोना महामारी रोगाने हादरले आहे. लॉकडाउन व संचारबंदीमुळे मुंबईकर मंडळी गावाकडे आली आहेत आणि त्याचा फायदा शेतकºयांना होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. तळा तालुक्यातील बळीराजाने आपल्या शेतात मान्सूनपूर्व शेती-मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. यंदा मान्सून लवकर येण्याची चिन्हे दिसू लागली असल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. नदी, धरणाच्या पाण्यावर असणारी उन्हाळी शेती तयार होत असून कोरडवाहू शेतीत बळीराजा कामात गुंतला आहे.

टॅग्स :Raigadरायगड