शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक हितासाठी बाप्पाला दीड दिवसांत निरोप; ५७ वर्षांची परंपरा कोरोनामुळे खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 00:25 IST

जिल्ह्यातील अन्य मंडळांनी घेतले उल्लेखनीय निर्णय

आविष्कार देसाई

रायगड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखताना मानवता धर्म डोळ्यासमोर ठेऊन अलिबाग येथील जिल्हा परिषदेने गेल्या ५७ वर्षांची पंरपरा खंडित केली आहे. दरवर्षी शिवतीर्थ इमारतीमध्ये दहा दिवस विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तीचे दीड दिवसांत विसर्जन केले आहे. जिल्ह्यातील अन्य गणेशोत्सव मंडळांनी असेच सामाजिक हित जपणारे निर्णय घेतले आहेत.

कोरोनाचा कहर अद्यापही थांबलेला नाही. जिल्ह्यात २२ हजारांचा आकडा कोरोना रुग्णांनी ओलांडाला आहे. दिवसामध्ये सुमारे ४०० रुग्ण सापडण्याचे प्रमाण सुरूच आहे. सध्या जिल्ह्यात गणेशोत्सव सुरू आहे. जल्लोषात उत्सव साजरा करण्याची परंपरा या खेपेला मात्र खंडित झाल्याचे दिसून येते. गणेशोत्सवाच्या कालावधीत मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडल्याने गर्दी होणार आहे. त्यामुळे सामाजिक अंतर राखण्याचे नियम धाब्यावर बसविले जाण्याची शक्यता गृहीत धरून, सरकार आणि प्रशासनाने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन गणेशभक्तांना केले आहे. विशेषत: सार्वजनिक मंडळांनी कोरोनाच्या नियमांबाबत अधिक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने आधीच शांतता समितीच्या सभेतून स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात २८७ सार्वजनिक तर १,००,२३९ खासगी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जाणार असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक बळावली आहे. त्याचे परिणाम पुढील आठ दिवसांमध्ये दिसून येणार असल्याची भीती आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. अलिबाग येथील जिल्हा परिषद इमारतीमध्ये दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. गेल्या ५६ वर्षांपासून अधिकारी आणि कर्मचारी एकत्र येत बाप्पाचा उत्सव मनोभावे साजरा करत आहेत. यंदाचे ५७वे वर्ष आहे. मात्र, या वर्षी कोरोनाचे संकट ओळखून सर्वांनी मिळून चांगला आणि मानवतावादी निर्णय घेतला आहे. दरवर्षी अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. मात्र, दीड दिवसांतच बाप्पाला निरोप देण्यात आला आहे, असे उत्सव समितीचे सचिव समिर अधिकारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गेल्या ५६ वर्षांची परंपरा खंडित करताना वाईट वाटले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यासाठी असा निर्णय घेणे गरजेचे होते. कारण बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची भीती होती. सर्व मनोरंजनाचे कार्यक्रमही रद्द केले आहेत.मंडपातील दर्शन बंदअलिबाग भाजी मार्के ट येथील बाप्पा तर ५८ वर्षांचा झाला आहे. येथील सन्मित्र मंडळाने भाविकांना मंडपातील दर्शन बंद केले आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत मंडपाच्या बाहेरूनच सामाजिक अंतर राखून दर्शन घेण्याची व्यवस्था केली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष आश्विन लालन यांनी ‘लोकमत’ला सांगितेल. बाप्पाच्या आगमनाची अथवा विसर्जनाची मिरवणूक काढणार नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवRaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस