शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चोख वाहतूक व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 04:58 IST

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास होणार वाहतूककोंडीमुक्त; पेण, वडखळ, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाडमध्ये लावले दुभाजक

अलिबाग : गौरी-गणपती विसर्जनानंतर भक्तांच्या परतीच्या प्रवासात कोणताच अडथळा येऊ नये, यासाठी रायगडच्या वाहतूक विभागाने तब्बल ३५० कर्मचारी मुंबई-गोवामहामार्गावर तैनात केले आहेत. गणेशभक्तांना वाहतूककोंडीचा कोणताच त्रास होणार नाही, याची पुरेशी खबरदारी घेतली असल्याचे वाहतूक विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितले.बाप्पाच्या आगमनाला काही प्रमाणात खड्ड्यांचे विघ्न असले, तरी कोणत्याही प्रकारची वाहतूककोंडी होऊन भक्तांच्या प्रवासाचा खोळंबा झाला, असे झाले नाही. वाहतूक पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे गणेशभक्तांना वेळेवर त्यांच्या घरी जाऊन सण साजरा करता आला आहे. त्यांच्या परतीच्या प्रवासात कोणताच अडथळा येऊ नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. पेण, वडखळ, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाड, पोलादपूर या ठिकाणच्या बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर लावून एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती. त्यामुळे वाहतूककोंडीचा त्रास या वेळी प्रवाशांना जाणवला नाही. तशीच वाहतूक २३ सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवली असल्याचे वराडे यांनी सांगितले.पाच दिवसांचे गणपती विसर्जन झाल्यानंतर कोकणातून ठाणे, मुंबई, पुण्याकडे परतणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवामहामार्गावर पोलिसांनी विशेष खबरदारी घेत महत्त्वाच्या ठिकाणी ६ उपविभागीय पोलीस अधिकारी, १६ पोलीस निरीक्षक, २४ सह. पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, २९७ पोलीस कर्मचारी, तसेच पोलीसस्थानकांतर्गत स्थानिक स्तरावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.दहा दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर गणेशभक्त मुंबई-पुण्याकडे परतणार असल्याने रस्ता मोकळा करण्यासाठी विशेष मोहीम वाहतूक विभागाने हाती घेतली आहे.वाहतूककोंडी होऊ नये, याकरिता माणगावमधून काढण्यात आलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, तसेच गणेशभक्तांनी नियमांचे पालन करून वाहने चालविण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांकडून देण्यात येत आहेत.महामार्गावर ठिकठिकाणी, सूचना फलक लावण्यात आले असून सीसीटीव्हीचा वॉचही ठेवण्यात येत आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्ग