शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चोख वाहतूक व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 04:58 IST

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास होणार वाहतूककोंडीमुक्त; पेण, वडखळ, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाडमध्ये लावले दुभाजक

अलिबाग : गौरी-गणपती विसर्जनानंतर भक्तांच्या परतीच्या प्रवासात कोणताच अडथळा येऊ नये, यासाठी रायगडच्या वाहतूक विभागाने तब्बल ३५० कर्मचारी मुंबई-गोवामहामार्गावर तैनात केले आहेत. गणेशभक्तांना वाहतूककोंडीचा कोणताच त्रास होणार नाही, याची पुरेशी खबरदारी घेतली असल्याचे वाहतूक विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितले.बाप्पाच्या आगमनाला काही प्रमाणात खड्ड्यांचे विघ्न असले, तरी कोणत्याही प्रकारची वाहतूककोंडी होऊन भक्तांच्या प्रवासाचा खोळंबा झाला, असे झाले नाही. वाहतूक पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे गणेशभक्तांना वेळेवर त्यांच्या घरी जाऊन सण साजरा करता आला आहे. त्यांच्या परतीच्या प्रवासात कोणताच अडथळा येऊ नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. पेण, वडखळ, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाड, पोलादपूर या ठिकाणच्या बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर लावून एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती. त्यामुळे वाहतूककोंडीचा त्रास या वेळी प्रवाशांना जाणवला नाही. तशीच वाहतूक २३ सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवली असल्याचे वराडे यांनी सांगितले.पाच दिवसांचे गणपती विसर्जन झाल्यानंतर कोकणातून ठाणे, मुंबई, पुण्याकडे परतणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवामहामार्गावर पोलिसांनी विशेष खबरदारी घेत महत्त्वाच्या ठिकाणी ६ उपविभागीय पोलीस अधिकारी, १६ पोलीस निरीक्षक, २४ सह. पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, २९७ पोलीस कर्मचारी, तसेच पोलीसस्थानकांतर्गत स्थानिक स्तरावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.दहा दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर गणेशभक्त मुंबई-पुण्याकडे परतणार असल्याने रस्ता मोकळा करण्यासाठी विशेष मोहीम वाहतूक विभागाने हाती घेतली आहे.वाहतूककोंडी होऊ नये, याकरिता माणगावमधून काढण्यात आलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, तसेच गणेशभक्तांनी नियमांचे पालन करून वाहने चालविण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांकडून देण्यात येत आहेत.महामार्गावर ठिकठिकाणी, सूचना फलक लावण्यात आले असून सीसीटीव्हीचा वॉचही ठेवण्यात येत आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्ग