शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

३१ मार्च उलटला तरी नेरुळ-उरण मार्गावर लोकल धावलीच नाही, डेडलाईन्स पुन्हा हुकल्याने उरणकरांच्या आनंदावर विरजण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 23:48 IST

Raigad News: या वर्षातील मार्चअखेरपर्यंत १७८६ कोटी खर्चाच्या नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्प आणि रायगड, मुंबईतील  मच्छीमारांसाठी वरदान ठरणारा एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचा व १८५ कोटी खर्चाच्या करंजा मच्छीमार बंदर कार्यान्वित करण्याची घोषणा हवेतच विरली आहे.

- मधुकर ठाकूरउरण : या वर्षातील मार्चअखेरपर्यंत १७८६ कोटी खर्चाच्या नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्प आणि रायगड, मुंबईतील  मच्छीमारांसाठी वरदान ठरणारा एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचा व १८५ कोटी खर्चाच्या करंजा मच्छीमार बंदर कार्यान्वित करण्याची घोषणा हवेतच विरली आहे.वारंवार डेडलाईन्स बदलल्या नंतरही ३१ मार्चच्या दिवसभरात नेरुळ-उरण रेल्वे मार्गावर रेल्वे धावलीच नाही.तर करंजा मच्छीमार बंदर कार्यान्वित  झाले नसल्याने हे दोन्ही प्रकल्प सुरू होण्यासाठी उरणकरांना आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.यामुळे मात्र उरणकरांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्यासाठी आणखी विलंब होणार असल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

उरणकरांना मागील ५० वर्षांपासून नेरुळ-उरण रेल्वे मार्गाची प्रतिक्षा लागुन राहीली आहे.१७८६ कोटी खर्चाचा २७ किमी लांबीचा हा रेल्वे मार्ग  उरणकरांसाठी विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा   आहे.प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर काही तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला या रेल्वे मार्गाचे काम अगदी रखडत-रखडत सुरू झाले होते.मात्र त्यानंतर त्यातील त्रुटी, तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्यानंतर मागील काही वर्षांपासून  नेरुळ-उरण रेल्वे मार्गाच्या कामाने वेग घेतला आहे.दरम्यानच्या काळात या रेल्वे मार्गावरील खारकोपर स्थानकापर्यंत प्रवासी वाहतूक सुरूही करण्यात आली आहे.त्यानंतर खारकोपर ते उरण स्थानकापर्यंत रखडलेली कामे वेगाने सुरू केली आहेत.वेगाने प्रगतीपथावर असलेल्या कामामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने मागील तीन चार वर्षांपासून या रेल्वे मार्गावरील कामे पुर्णत्वास नेऊन या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या अनेक डेडलाईन्स जाहीर केल्या होत्या.

फेब्रुवारी नंतर मार्च २०२३ अखेरीस या रेल्वे मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्याची घोषणा केली होती.त्यासाठी या मार्गावर ट्रायलरनही घेण्यात आली होती.सुरक्षा चाचण्यादरम्यान  रेल्वे एका दिवशी पहाटेच थेट उरण स्थानकातच  मार्च २०२३ अखेरीस या रेल्वे मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू होईल अशी खुणगाठ उरणकरांनी बांधली होती.मात्र ३१ मार्चच्या शुक्रवारी दिवसभरात तरी रेल्वे या मार्गावर धावलीच नाही. यामुळे मात्र उरणकरांच्या आनंदावर विरजण पडले आहे.बहुतांश मोठी कामे पुर्णत्वास गेलेली आहेत. तरी महत्त्वाची अनेक किरकोळ कामे पूर्ण झाली नसल्याने या रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आणखी वेळ लागणार आहे.यामुळे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात विलंब होणार असल्याची कबुली मध्यरेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.मात्र प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचेही शिवाजी सुतार यांनी स्पष्ट केले.

रायगड, मुंबईतील हजारो मच्छीमारांसाठी वरदान ठरणारा आणि एक हजार मच्छीमार बोटी लॅण्डींगची क्षमता असलेला करंजा मच्छीमार बंदराचे काम मागील दहा वर्षांपासून रखडत रखडत सुरू आहे. ६५ कोटी खर्चाचे काम विलंबामुळे आणि काही तांत्रिक अडचणींमुळे १५० कोटींच्या घरात गेले आहे.केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक मदतीवर उभारण्यात येत असलेल्या या बंदराच्या कामासाठी निधी कमी पडला होता. त्यानंतर बंदराचे काम पूर्ण करण्यासाठी ३५ कोटींचा अतिरिक्त निधीचा बुस्टर डोसही देण्यात आला आहे.त्यानंतर कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.त्यामुळे करंजा मच्छीमार बंदराचे कामही मार्च २०२३ अखेरीस पुर्ण होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने केली होती.त्याआधी दोन वर्षापुर्वी २८ ऑक्टोबर २०२०  तत्कालीन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी करंजा बंदराच्या भेटी दरम्यान मार्च २०२३ पर्यंत बंदर कार्यान्वित करण्याची घोषणा केली होती.मात्र निर्णय वेगवान ,गतिमान महाराष्ट्र सरकारच्या डेडलाईन्स तुर्तास तरी कागदावरच  आहेत.समुद्राच्या भरती-ओहटी आणि त्यामुळे उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे कामे पूर्ण करण्यासाठी विलंब झाला आहे.मात्र मच्छीमार बंदर  कार्यान्वित करण्यासाठी आणखी दीड दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित असल्याचे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता तुषार पाटोळे यांनी सांगितले. मार्च अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याची घोषणा झालेल्या दोन्ही प्रकल्पांची हेडलाईन्स पुन्हा हुकल्यामुळे मात्र उरणकरांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेRaigadरायगड