शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

३१ मार्च उलटला तरी नेरुळ-उरण मार्गावर लोकल धावलीच नाही, डेडलाईन्स पुन्हा हुकल्याने उरणकरांच्या आनंदावर विरजण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 23:48 IST

Raigad News: या वर्षातील मार्चअखेरपर्यंत १७८६ कोटी खर्चाच्या नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्प आणि रायगड, मुंबईतील  मच्छीमारांसाठी वरदान ठरणारा एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचा व १८५ कोटी खर्चाच्या करंजा मच्छीमार बंदर कार्यान्वित करण्याची घोषणा हवेतच विरली आहे.

- मधुकर ठाकूरउरण : या वर्षातील मार्चअखेरपर्यंत १७८६ कोटी खर्चाच्या नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्प आणि रायगड, मुंबईतील  मच्छीमारांसाठी वरदान ठरणारा एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचा व १८५ कोटी खर्चाच्या करंजा मच्छीमार बंदर कार्यान्वित करण्याची घोषणा हवेतच विरली आहे.वारंवार डेडलाईन्स बदलल्या नंतरही ३१ मार्चच्या दिवसभरात नेरुळ-उरण रेल्वे मार्गावर रेल्वे धावलीच नाही.तर करंजा मच्छीमार बंदर कार्यान्वित  झाले नसल्याने हे दोन्ही प्रकल्प सुरू होण्यासाठी उरणकरांना आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.यामुळे मात्र उरणकरांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्यासाठी आणखी विलंब होणार असल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

उरणकरांना मागील ५० वर्षांपासून नेरुळ-उरण रेल्वे मार्गाची प्रतिक्षा लागुन राहीली आहे.१७८६ कोटी खर्चाचा २७ किमी लांबीचा हा रेल्वे मार्ग  उरणकरांसाठी विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा   आहे.प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर काही तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला या रेल्वे मार्गाचे काम अगदी रखडत-रखडत सुरू झाले होते.मात्र त्यानंतर त्यातील त्रुटी, तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्यानंतर मागील काही वर्षांपासून  नेरुळ-उरण रेल्वे मार्गाच्या कामाने वेग घेतला आहे.दरम्यानच्या काळात या रेल्वे मार्गावरील खारकोपर स्थानकापर्यंत प्रवासी वाहतूक सुरूही करण्यात आली आहे.त्यानंतर खारकोपर ते उरण स्थानकापर्यंत रखडलेली कामे वेगाने सुरू केली आहेत.वेगाने प्रगतीपथावर असलेल्या कामामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने मागील तीन चार वर्षांपासून या रेल्वे मार्गावरील कामे पुर्णत्वास नेऊन या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या अनेक डेडलाईन्स जाहीर केल्या होत्या.

फेब्रुवारी नंतर मार्च २०२३ अखेरीस या रेल्वे मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्याची घोषणा केली होती.त्यासाठी या मार्गावर ट्रायलरनही घेण्यात आली होती.सुरक्षा चाचण्यादरम्यान  रेल्वे एका दिवशी पहाटेच थेट उरण स्थानकातच  मार्च २०२३ अखेरीस या रेल्वे मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू होईल अशी खुणगाठ उरणकरांनी बांधली होती.मात्र ३१ मार्चच्या शुक्रवारी दिवसभरात तरी रेल्वे या मार्गावर धावलीच नाही. यामुळे मात्र उरणकरांच्या आनंदावर विरजण पडले आहे.बहुतांश मोठी कामे पुर्णत्वास गेलेली आहेत. तरी महत्त्वाची अनेक किरकोळ कामे पूर्ण झाली नसल्याने या रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आणखी वेळ लागणार आहे.यामुळे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात विलंब होणार असल्याची कबुली मध्यरेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.मात्र प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचेही शिवाजी सुतार यांनी स्पष्ट केले.

रायगड, मुंबईतील हजारो मच्छीमारांसाठी वरदान ठरणारा आणि एक हजार मच्छीमार बोटी लॅण्डींगची क्षमता असलेला करंजा मच्छीमार बंदराचे काम मागील दहा वर्षांपासून रखडत रखडत सुरू आहे. ६५ कोटी खर्चाचे काम विलंबामुळे आणि काही तांत्रिक अडचणींमुळे १५० कोटींच्या घरात गेले आहे.केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक मदतीवर उभारण्यात येत असलेल्या या बंदराच्या कामासाठी निधी कमी पडला होता. त्यानंतर बंदराचे काम पूर्ण करण्यासाठी ३५ कोटींचा अतिरिक्त निधीचा बुस्टर डोसही देण्यात आला आहे.त्यानंतर कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.त्यामुळे करंजा मच्छीमार बंदराचे कामही मार्च २०२३ अखेरीस पुर्ण होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने केली होती.त्याआधी दोन वर्षापुर्वी २८ ऑक्टोबर २०२०  तत्कालीन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी करंजा बंदराच्या भेटी दरम्यान मार्च २०२३ पर्यंत बंदर कार्यान्वित करण्याची घोषणा केली होती.मात्र निर्णय वेगवान ,गतिमान महाराष्ट्र सरकारच्या डेडलाईन्स तुर्तास तरी कागदावरच  आहेत.समुद्राच्या भरती-ओहटी आणि त्यामुळे उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे कामे पूर्ण करण्यासाठी विलंब झाला आहे.मात्र मच्छीमार बंदर  कार्यान्वित करण्यासाठी आणखी दीड दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित असल्याचे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता तुषार पाटोळे यांनी सांगितले. मार्च अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याची घोषणा झालेल्या दोन्ही प्रकल्पांची हेडलाईन्स पुन्हा हुकल्यामुळे मात्र उरणकरांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेRaigadरायगड