शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

३१ मार्च उलटला तरी नेरुळ-उरण मार्गावर लोकल धावलीच नाही, डेडलाईन्स पुन्हा हुकल्याने उरणकरांच्या आनंदावर विरजण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 23:48 IST

Raigad News: या वर्षातील मार्चअखेरपर्यंत १७८६ कोटी खर्चाच्या नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्प आणि रायगड, मुंबईतील  मच्छीमारांसाठी वरदान ठरणारा एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचा व १८५ कोटी खर्चाच्या करंजा मच्छीमार बंदर कार्यान्वित करण्याची घोषणा हवेतच विरली आहे.

- मधुकर ठाकूरउरण : या वर्षातील मार्चअखेरपर्यंत १७८६ कोटी खर्चाच्या नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्प आणि रायगड, मुंबईतील  मच्छीमारांसाठी वरदान ठरणारा एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचा व १८५ कोटी खर्चाच्या करंजा मच्छीमार बंदर कार्यान्वित करण्याची घोषणा हवेतच विरली आहे.वारंवार डेडलाईन्स बदलल्या नंतरही ३१ मार्चच्या दिवसभरात नेरुळ-उरण रेल्वे मार्गावर रेल्वे धावलीच नाही.तर करंजा मच्छीमार बंदर कार्यान्वित  झाले नसल्याने हे दोन्ही प्रकल्प सुरू होण्यासाठी उरणकरांना आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.यामुळे मात्र उरणकरांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्यासाठी आणखी विलंब होणार असल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

उरणकरांना मागील ५० वर्षांपासून नेरुळ-उरण रेल्वे मार्गाची प्रतिक्षा लागुन राहीली आहे.१७८६ कोटी खर्चाचा २७ किमी लांबीचा हा रेल्वे मार्ग  उरणकरांसाठी विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा   आहे.प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर काही तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला या रेल्वे मार्गाचे काम अगदी रखडत-रखडत सुरू झाले होते.मात्र त्यानंतर त्यातील त्रुटी, तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्यानंतर मागील काही वर्षांपासून  नेरुळ-उरण रेल्वे मार्गाच्या कामाने वेग घेतला आहे.दरम्यानच्या काळात या रेल्वे मार्गावरील खारकोपर स्थानकापर्यंत प्रवासी वाहतूक सुरूही करण्यात आली आहे.त्यानंतर खारकोपर ते उरण स्थानकापर्यंत रखडलेली कामे वेगाने सुरू केली आहेत.वेगाने प्रगतीपथावर असलेल्या कामामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने मागील तीन चार वर्षांपासून या रेल्वे मार्गावरील कामे पुर्णत्वास नेऊन या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या अनेक डेडलाईन्स जाहीर केल्या होत्या.

फेब्रुवारी नंतर मार्च २०२३ अखेरीस या रेल्वे मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्याची घोषणा केली होती.त्यासाठी या मार्गावर ट्रायलरनही घेण्यात आली होती.सुरक्षा चाचण्यादरम्यान  रेल्वे एका दिवशी पहाटेच थेट उरण स्थानकातच  मार्च २०२३ अखेरीस या रेल्वे मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू होईल अशी खुणगाठ उरणकरांनी बांधली होती.मात्र ३१ मार्चच्या शुक्रवारी दिवसभरात तरी रेल्वे या मार्गावर धावलीच नाही. यामुळे मात्र उरणकरांच्या आनंदावर विरजण पडले आहे.बहुतांश मोठी कामे पुर्णत्वास गेलेली आहेत. तरी महत्त्वाची अनेक किरकोळ कामे पूर्ण झाली नसल्याने या रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आणखी वेळ लागणार आहे.यामुळे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात विलंब होणार असल्याची कबुली मध्यरेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.मात्र प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचेही शिवाजी सुतार यांनी स्पष्ट केले.

रायगड, मुंबईतील हजारो मच्छीमारांसाठी वरदान ठरणारा आणि एक हजार मच्छीमार बोटी लॅण्डींगची क्षमता असलेला करंजा मच्छीमार बंदराचे काम मागील दहा वर्षांपासून रखडत रखडत सुरू आहे. ६५ कोटी खर्चाचे काम विलंबामुळे आणि काही तांत्रिक अडचणींमुळे १५० कोटींच्या घरात गेले आहे.केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक मदतीवर उभारण्यात येत असलेल्या या बंदराच्या कामासाठी निधी कमी पडला होता. त्यानंतर बंदराचे काम पूर्ण करण्यासाठी ३५ कोटींचा अतिरिक्त निधीचा बुस्टर डोसही देण्यात आला आहे.त्यानंतर कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.त्यामुळे करंजा मच्छीमार बंदराचे कामही मार्च २०२३ अखेरीस पुर्ण होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने केली होती.त्याआधी दोन वर्षापुर्वी २८ ऑक्टोबर २०२०  तत्कालीन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी करंजा बंदराच्या भेटी दरम्यान मार्च २०२३ पर्यंत बंदर कार्यान्वित करण्याची घोषणा केली होती.मात्र निर्णय वेगवान ,गतिमान महाराष्ट्र सरकारच्या डेडलाईन्स तुर्तास तरी कागदावरच  आहेत.समुद्राच्या भरती-ओहटी आणि त्यामुळे उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे कामे पूर्ण करण्यासाठी विलंब झाला आहे.मात्र मच्छीमार बंदर  कार्यान्वित करण्यासाठी आणखी दीड दोन महिन्यांचा कालावधी अपेक्षित असल्याचे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता तुषार पाटोळे यांनी सांगितले. मार्च अखेरपर्यंत कार्यान्वित करण्याची घोषणा झालेल्या दोन्ही प्रकल्पांची हेडलाईन्स पुन्हा हुकल्यामुळे मात्र उरणकरांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेRaigadरायगड