शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

दुरुस्तीच्या कामानंतरही घारापुरी बेटावरील खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ, व्यावसायिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 16:41 IST

घारापुरी ऐतिहासिक बेटाला वीजपुरवठा करणाऱ्या २०० केव्हीए क्षमतेच्या समुद्राच्या पाण्याखाली टाकण्यात आलेल्या सब मरीन केबल्स जहाजांच्या ॲकरिंगमुळे ठिकठिकाणी नादूरुस्त झाल्या होत्या.

मधुकर ठाकूर

उरण : घारापुरी बेटावरील खंडित झालेला वीजपुरवठा अथक प्रयत्नांनंतर ३५ दिवसांनी सुरू झाला आहे. मात्र त्यानंतरही वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची मालिका सुरूच आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा येथील ग्रामस्थ व व्यावसायिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबतच्या सुचना देण्याची आणि छोट्या - मोठ्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीने  महावितरण विभागाकडे तक्रारीव्दारे केली आहे.

घारापुरी ऐतिहासिक बेटाला वीजपुरवठा करणाऱ्या २०० केव्हीए क्षमतेच्या समुद्राच्या पाण्याखाली टाकण्यात आलेल्या सब मरीन केबल्स जहाजांच्या ॲकरिंगमुळे ठिकठिकाणी नादूरुस्त झाल्या होत्या. त्यामुळे बेटावरील राजबंदर,शेतबंदर, मोराबंदर या तीनही गावातील विद्युत पुरवठा २६ जुनपासुन ३५ दिवस खंडित झाला होता. दरम्यान तब्बल ३५ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर महावितरण विभागाने घारापुरी बेटावर वीजपुरवठा करणाऱ्या नादुरुस्त २०० केव्हीए सबमरिन केबल्सची दुरुस्ती केली आहे.यामुळे ३५ दिवसांपासून बेटावरील खंडित झालेला वीजपुरवठा २७ जुलै पासून सुरू झाला आहे. मात्र त्यानंतरही तकलादू पध्दतीने आणि घिसाडघाईने झालेल्या दुरुस्तीच्या कामामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

तासनतास खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा फटका येथील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तीनही गावातील ग्रामस्थांबरोबरच छोट्या - मोठ्या व्यावसायिकांनाही बसत आहे.व्यावसायिंकांना नाहक आर्थिक नुकसानचा सामना करावा लागत आहे. तसेच ग्रामस्थ वग्रामपंचायतीला वीज, पाणी या दोन्हीही संकटांचा सामना करावा लागत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येबाबत पनवेल येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे  तीनवेळा पत्रव्यवहार करून कळविण्यात आले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्षच केले जात असल्याचा ग्रामपंचायतीचा आरोप आहे.  

वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत सुचना देण्याची आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीने  महावितरण विभागाकडे तक्रारीव्दारे केली असल्याची माहिती सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.