शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

दुरुस्तीच्या कामानंतरही घारापुरी बेटावरील खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ, व्यावसायिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 16:41 IST

घारापुरी ऐतिहासिक बेटाला वीजपुरवठा करणाऱ्या २०० केव्हीए क्षमतेच्या समुद्राच्या पाण्याखाली टाकण्यात आलेल्या सब मरीन केबल्स जहाजांच्या ॲकरिंगमुळे ठिकठिकाणी नादूरुस्त झाल्या होत्या.

मधुकर ठाकूर

उरण : घारापुरी बेटावरील खंडित झालेला वीजपुरवठा अथक प्रयत्नांनंतर ३५ दिवसांनी सुरू झाला आहे. मात्र त्यानंतरही वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची मालिका सुरूच आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा येथील ग्रामस्थ व व्यावसायिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबतच्या सुचना देण्याची आणि छोट्या - मोठ्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीने  महावितरण विभागाकडे तक्रारीव्दारे केली आहे.

घारापुरी ऐतिहासिक बेटाला वीजपुरवठा करणाऱ्या २०० केव्हीए क्षमतेच्या समुद्राच्या पाण्याखाली टाकण्यात आलेल्या सब मरीन केबल्स जहाजांच्या ॲकरिंगमुळे ठिकठिकाणी नादूरुस्त झाल्या होत्या. त्यामुळे बेटावरील राजबंदर,शेतबंदर, मोराबंदर या तीनही गावातील विद्युत पुरवठा २६ जुनपासुन ३५ दिवस खंडित झाला होता. दरम्यान तब्बल ३५ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर महावितरण विभागाने घारापुरी बेटावर वीजपुरवठा करणाऱ्या नादुरुस्त २०० केव्हीए सबमरिन केबल्सची दुरुस्ती केली आहे.यामुळे ३५ दिवसांपासून बेटावरील खंडित झालेला वीजपुरवठा २७ जुलै पासून सुरू झाला आहे. मात्र त्यानंतरही तकलादू पध्दतीने आणि घिसाडघाईने झालेल्या दुरुस्तीच्या कामामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

तासनतास खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा फटका येथील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तीनही गावातील ग्रामस्थांबरोबरच छोट्या - मोठ्या व्यावसायिकांनाही बसत आहे.व्यावसायिंकांना नाहक आर्थिक नुकसानचा सामना करावा लागत आहे. तसेच ग्रामस्थ वग्रामपंचायतीला वीज, पाणी या दोन्हीही संकटांचा सामना करावा लागत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येबाबत पनवेल येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे  तीनवेळा पत्रव्यवहार करून कळविण्यात आले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्षच केले जात असल्याचा ग्रामपंचायतीचा आरोप आहे.  

वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत सुचना देण्याची आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीने  महावितरण विभागाकडे तक्रारीव्दारे केली असल्याची माहिती सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.