शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

खारलँड विभागाच्या आराखड्यात त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 04:20 IST

१४३ वर्षांची ‘खातनईची उघाडी’ गायब; रोजगार हमी योजनेतून नवी उघाडी बांधण्याकरिता महिला गावकीचा प्रस्ताव

- जयंत धुळप अलिबाग : अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील शहापूर गावातील धाकटा पाडा येथील ‘खातनईची उघाडी’च्या झडपा (दरवाजे) उधाणाच्या भरतीमुळे उद्ध्वस्त झाल्या होत्या, त्यामुळे गावातील ३३६ शेतकऱ्यांची १४९ हेक्टर भातशेती खाºया पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.जानेवारी २०१८ मध्ये शहापूरमधील शेतकरी महिलांनी तब्बल ८० हजार रुपये खर्च करून श्रमदानातून या ‘खातनईची उघाडी’च्या झडपा दुरुस्त करून भातशेती वाचवली. मात्र, खारलॅन्ड विभागाच्या शासकीय आराखड्यातून १८५० मध्ये केलेली तब्बल १४३ वर्षांची जुनी ‘खातनईची उघाडी’ गायब झाल्याचे उघडकीस आले आहे.शासनाच्या आराखड्यात ‘खातनईची उघाडी’चा समावेश नसल्याने त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी सरकारी निधी देता येणार नसल्याचे खारलॅन्ड विभागाचे उपअभियंता सुरेश शिरसाट यांनी श्रमिक मुक्ती दलाच्या शेतकरी शिष्टमंडळास सांगितल्यावर सदर प्रकार उघडकीस आल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली. या वेळी महिला गावकीच्या अध्यक्षा मधुरा पाटील यांनीही आश्चर्य व्यक्त केले.महाराष्ट्र शासनाच्या एप्रिल २०१४ मधील राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या योजनेत ‘खातनईची उघाडी’सहच्या समुद्र संरक्षक बंधाºयाचा समावेश आहे. खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, पेण महाराष्ट्र खारभूमी कायद्यानुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून ‘कार्यकारी अभियंता, खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, पेण-रायगड, यांनी मौजे धाकटापाडा शहापूर, ता. अलिबाग, जि. रायगड येथील खारभूमी विकास योजना तयार केली आहे. १८५० पासून पेझारी-धाकटे शहापूर असा मूळ समुद्र संरक्षक बंधारा होता. त्यामध्ये या खातनईच्या उघाडीचा समावेश होता. कालांतराने १९७५ मध्ये याच संरक्षक बंधाºयावरून पेझारी-धाकटे शहापूर हा रस्ता करण्यात आला. त्या वेळी खातनईच्या उघाडीच्या वर पूल बांधण्यात आला. मात्र, उघाडी तशीच राहिल्याचे धाकटे शहापूरचे ज्येष्ठ शेतकरी भास्कर रोहिदास पाटील यांनी सांगितले.भातशेती नापीक करण्याचा आरोपखातनईची उघाडी सुस्थितीत असेल, तरच गावातील ३३६ शेतकºयांच्या १४९ हेक्टर भातशेतीचे खाºया पाण्यापासून रक्षण होईल. भात पिकास कोणत्याही प्रकारे धोका पोहोचणार नाही, असा योजनेचा मूूळ हेतू असून, आता नेमकी हीच ‘खातनईची उघाडी’ खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने आराखड्यातून कागदोपत्री गायब केल्याने १४९ हेक्टर भातशेती नापीक करण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप शेतकºयांकडून करण्यात येत आहे.नवी उघाडी बांधण्याच्या महिला गावकीच्या प्रस्तावास ग्रामसभेत मंजुरीशहापूर ग्रामस्थांच्या जीवनमरणाशी निगडित खातनईच्या उघाडीऐवजी नवीन उघाडी बांधण्याकरिता खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग निधी देऊ शकत नसल्याने आता रोजगार हमीतून ही नवी उघाडी बांधण्याचा प्रस्ताव महिला गावकीच्या अध्यक्षा मधुरा भास्कर पाटील यांनी ग्रामसभेत मांडला. त्यास ग्रामसभेने मान्यता दिली असून, आता हा प्रस्ताव अलिबाग पंचायत समितीकडे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड