शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

खारलँड विभागाच्या आराखड्यात त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 04:20 IST

१४३ वर्षांची ‘खातनईची उघाडी’ गायब; रोजगार हमी योजनेतून नवी उघाडी बांधण्याकरिता महिला गावकीचा प्रस्ताव

- जयंत धुळप अलिबाग : अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील शहापूर गावातील धाकटा पाडा येथील ‘खातनईची उघाडी’च्या झडपा (दरवाजे) उधाणाच्या भरतीमुळे उद्ध्वस्त झाल्या होत्या, त्यामुळे गावातील ३३६ शेतकऱ्यांची १४९ हेक्टर भातशेती खाºया पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.जानेवारी २०१८ मध्ये शहापूरमधील शेतकरी महिलांनी तब्बल ८० हजार रुपये खर्च करून श्रमदानातून या ‘खातनईची उघाडी’च्या झडपा दुरुस्त करून भातशेती वाचवली. मात्र, खारलॅन्ड विभागाच्या शासकीय आराखड्यातून १८५० मध्ये केलेली तब्बल १४३ वर्षांची जुनी ‘खातनईची उघाडी’ गायब झाल्याचे उघडकीस आले आहे.शासनाच्या आराखड्यात ‘खातनईची उघाडी’चा समावेश नसल्याने त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी सरकारी निधी देता येणार नसल्याचे खारलॅन्ड विभागाचे उपअभियंता सुरेश शिरसाट यांनी श्रमिक मुक्ती दलाच्या शेतकरी शिष्टमंडळास सांगितल्यावर सदर प्रकार उघडकीस आल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली. या वेळी महिला गावकीच्या अध्यक्षा मधुरा पाटील यांनीही आश्चर्य व्यक्त केले.महाराष्ट्र शासनाच्या एप्रिल २०१४ मधील राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या योजनेत ‘खातनईची उघाडी’सहच्या समुद्र संरक्षक बंधाºयाचा समावेश आहे. खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, पेण महाराष्ट्र खारभूमी कायद्यानुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून ‘कार्यकारी अभियंता, खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, पेण-रायगड, यांनी मौजे धाकटापाडा शहापूर, ता. अलिबाग, जि. रायगड येथील खारभूमी विकास योजना तयार केली आहे. १८५० पासून पेझारी-धाकटे शहापूर असा मूळ समुद्र संरक्षक बंधारा होता. त्यामध्ये या खातनईच्या उघाडीचा समावेश होता. कालांतराने १९७५ मध्ये याच संरक्षक बंधाºयावरून पेझारी-धाकटे शहापूर हा रस्ता करण्यात आला. त्या वेळी खातनईच्या उघाडीच्या वर पूल बांधण्यात आला. मात्र, उघाडी तशीच राहिल्याचे धाकटे शहापूरचे ज्येष्ठ शेतकरी भास्कर रोहिदास पाटील यांनी सांगितले.भातशेती नापीक करण्याचा आरोपखातनईची उघाडी सुस्थितीत असेल, तरच गावातील ३३६ शेतकºयांच्या १४९ हेक्टर भातशेतीचे खाºया पाण्यापासून रक्षण होईल. भात पिकास कोणत्याही प्रकारे धोका पोहोचणार नाही, असा योजनेचा मूूळ हेतू असून, आता नेमकी हीच ‘खातनईची उघाडी’ खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने आराखड्यातून कागदोपत्री गायब केल्याने १४९ हेक्टर भातशेती नापीक करण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप शेतकºयांकडून करण्यात येत आहे.नवी उघाडी बांधण्याच्या महिला गावकीच्या प्रस्तावास ग्रामसभेत मंजुरीशहापूर ग्रामस्थांच्या जीवनमरणाशी निगडित खातनईच्या उघाडीऐवजी नवीन उघाडी बांधण्याकरिता खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग निधी देऊ शकत नसल्याने आता रोजगार हमीतून ही नवी उघाडी बांधण्याचा प्रस्ताव महिला गावकीच्या अध्यक्षा मधुरा भास्कर पाटील यांनी ग्रामसभेत मांडला. त्यास ग्रामसभेने मान्यता दिली असून, आता हा प्रस्ताव अलिबाग पंचायत समितीकडे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड