शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

खारलँड विभागाच्या आराखड्यात त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 04:20 IST

१४३ वर्षांची ‘खातनईची उघाडी’ गायब; रोजगार हमी योजनेतून नवी उघाडी बांधण्याकरिता महिला गावकीचा प्रस्ताव

- जयंत धुळप अलिबाग : अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील शहापूर गावातील धाकटा पाडा येथील ‘खातनईची उघाडी’च्या झडपा (दरवाजे) उधाणाच्या भरतीमुळे उद्ध्वस्त झाल्या होत्या, त्यामुळे गावातील ३३६ शेतकऱ्यांची १४९ हेक्टर भातशेती खाºया पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.जानेवारी २०१८ मध्ये शहापूरमधील शेतकरी महिलांनी तब्बल ८० हजार रुपये खर्च करून श्रमदानातून या ‘खातनईची उघाडी’च्या झडपा दुरुस्त करून भातशेती वाचवली. मात्र, खारलॅन्ड विभागाच्या शासकीय आराखड्यातून १८५० मध्ये केलेली तब्बल १४३ वर्षांची जुनी ‘खातनईची उघाडी’ गायब झाल्याचे उघडकीस आले आहे.शासनाच्या आराखड्यात ‘खातनईची उघाडी’चा समावेश नसल्याने त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी सरकारी निधी देता येणार नसल्याचे खारलॅन्ड विभागाचे उपअभियंता सुरेश शिरसाट यांनी श्रमिक मुक्ती दलाच्या शेतकरी शिष्टमंडळास सांगितल्यावर सदर प्रकार उघडकीस आल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली. या वेळी महिला गावकीच्या अध्यक्षा मधुरा पाटील यांनीही आश्चर्य व्यक्त केले.महाराष्ट्र शासनाच्या एप्रिल २०१४ मधील राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या योजनेत ‘खातनईची उघाडी’सहच्या समुद्र संरक्षक बंधाºयाचा समावेश आहे. खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, पेण महाराष्ट्र खारभूमी कायद्यानुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून ‘कार्यकारी अभियंता, खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, पेण-रायगड, यांनी मौजे धाकटापाडा शहापूर, ता. अलिबाग, जि. रायगड येथील खारभूमी विकास योजना तयार केली आहे. १८५० पासून पेझारी-धाकटे शहापूर असा मूळ समुद्र संरक्षक बंधारा होता. त्यामध्ये या खातनईच्या उघाडीचा समावेश होता. कालांतराने १९७५ मध्ये याच संरक्षक बंधाºयावरून पेझारी-धाकटे शहापूर हा रस्ता करण्यात आला. त्या वेळी खातनईच्या उघाडीच्या वर पूल बांधण्यात आला. मात्र, उघाडी तशीच राहिल्याचे धाकटे शहापूरचे ज्येष्ठ शेतकरी भास्कर रोहिदास पाटील यांनी सांगितले.भातशेती नापीक करण्याचा आरोपखातनईची उघाडी सुस्थितीत असेल, तरच गावातील ३३६ शेतकºयांच्या १४९ हेक्टर भातशेतीचे खाºया पाण्यापासून रक्षण होईल. भात पिकास कोणत्याही प्रकारे धोका पोहोचणार नाही, असा योजनेचा मूूळ हेतू असून, आता नेमकी हीच ‘खातनईची उघाडी’ खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने आराखड्यातून कागदोपत्री गायब केल्याने १४९ हेक्टर भातशेती नापीक करण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप शेतकºयांकडून करण्यात येत आहे.नवी उघाडी बांधण्याच्या महिला गावकीच्या प्रस्तावास ग्रामसभेत मंजुरीशहापूर ग्रामस्थांच्या जीवनमरणाशी निगडित खातनईच्या उघाडीऐवजी नवीन उघाडी बांधण्याकरिता खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग निधी देऊ शकत नसल्याने आता रोजगार हमीतून ही नवी उघाडी बांधण्याचा प्रस्ताव महिला गावकीच्या अध्यक्षा मधुरा भास्कर पाटील यांनी ग्रामसभेत मांडला. त्यास ग्रामसभेने मान्यता दिली असून, आता हा प्रस्ताव अलिबाग पंचायत समितीकडे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड