शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

उरण बाजारपेठेत रानभाज्या दाखल; मागणी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 01:13 IST

ग्राहकांअभावी आदिवासींवर उपासमारीची वेळ

- मधुकर ठाकूरउरण : कोरोना महामारीच्या संकटातच उरणच्या बाजारपेठेत चविष्ट, रुचकर रानभाज्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत, परंतु या रानभाज्यांकडे ग्राहकांनीच पाठ फिरविल्याने, ऐन मोसमातच आदिवासींवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर डोंगर आणि जंगलात विविध प्रकारच्या रानभाज्या उगवू लागतात. या रानभाज्या विकून आदिवासी आपली उपजीविका करतात. सध्या बाजारात कुल्लू, शेवाळी, अंबाडी, कंदमुळे, कुर्डू, टाकळा, भोकरं, वाघेटा, कंटोळा आदी प्रकारांतील रानभाज्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. पावसाळी हंगामात डोंगर, जंगलात नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या आणि उगवलेल्या या रानभाज्या औषधी व आरोग्याला अत्यंत गुणकारी असतातच. शिवाय रुचकर, स्वादिष्ट असतात. त्यामुळे फक्त पावसाळी हंगामातच मिळणाऱ्या या रानभाज्या बाजारात येण्याची प्रतीक्षा खवय्यांना नेहमीच असते.उरणच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात या रानभाज्या दाखल झाल्या आहेत. आदिवासी महिला या रानभाज्या विक्रीसाठी शहरात घेऊन येतात मात्र, कोरोनाच्या भीतीने उरणच्या बाजारपेठेत चविष्ट, रुचकर रानभाज्यांना ग्राहक मिळेनासे झाले आहेत. यामुळे ऐन हंगामातच रानभाज्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याने आदिवासींवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.या आदिवासींचा या रानभाज्यांवरच या हंगामात उदरनिर्वाह चालतो. मात्र यंदा कोरोनामुळे रानमेव्याच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न थांबले, त्याचबरोबर आता रानभाज्यांची ही विक्री होत नसल्याने आदिवासी हवालदिल झालेआहेत.