शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

उरण बाजारपेठेत रानभाज्या दाखल; मागणी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 01:13 IST

ग्राहकांअभावी आदिवासींवर उपासमारीची वेळ

- मधुकर ठाकूरउरण : कोरोना महामारीच्या संकटातच उरणच्या बाजारपेठेत चविष्ट, रुचकर रानभाज्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत, परंतु या रानभाज्यांकडे ग्राहकांनीच पाठ फिरविल्याने, ऐन मोसमातच आदिवासींवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर डोंगर आणि जंगलात विविध प्रकारच्या रानभाज्या उगवू लागतात. या रानभाज्या विकून आदिवासी आपली उपजीविका करतात. सध्या बाजारात कुल्लू, शेवाळी, अंबाडी, कंदमुळे, कुर्डू, टाकळा, भोकरं, वाघेटा, कंटोळा आदी प्रकारांतील रानभाज्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. पावसाळी हंगामात डोंगर, जंगलात नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या आणि उगवलेल्या या रानभाज्या औषधी व आरोग्याला अत्यंत गुणकारी असतातच. शिवाय रुचकर, स्वादिष्ट असतात. त्यामुळे फक्त पावसाळी हंगामातच मिळणाऱ्या या रानभाज्या बाजारात येण्याची प्रतीक्षा खवय्यांना नेहमीच असते.उरणच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात या रानभाज्या दाखल झाल्या आहेत. आदिवासी महिला या रानभाज्या विक्रीसाठी शहरात घेऊन येतात मात्र, कोरोनाच्या भीतीने उरणच्या बाजारपेठेत चविष्ट, रुचकर रानभाज्यांना ग्राहक मिळेनासे झाले आहेत. यामुळे ऐन हंगामातच रानभाज्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याने आदिवासींवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.या आदिवासींचा या रानभाज्यांवरच या हंगामात उदरनिर्वाह चालतो. मात्र यंदा कोरोनामुळे रानमेव्याच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न थांबले, त्याचबरोबर आता रानभाज्यांची ही विक्री होत नसल्याने आदिवासी हवालदिल झालेआहेत.