शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, चोख बंदोबस्त
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
4
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
5
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
6
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
7
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
8
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
9
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
10
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
11
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
12
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
13
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
14
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
15
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
16
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
17
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
18
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
20
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

"स्थानिकांना रोजगाराच्या संधी देणार; सरकारी योजनांचा बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 23:29 IST

सुनील तटकरे । पेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा; फिरते विक्री केंद्र स्थापन करणार

पेण : देशातील भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने शेतकरी व कामगारविरोधी कायदे करून भांडवलदारांचे हित जोपासले आहे. सर्वसमान्यांना यापुढे अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. महाराष्ट्रात शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी कोरोनासारख्या कठीण परिस्थितीत उत्तम प्रकारे काम करीत आहे. जनहिताचे अनेक प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सरकार बांधील आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याकडे आघाडी सरकारने लक्ष आहे. स्थानिक नागरिकांना प्रामुख्याने रोजगाराची हमी हेच सरकारचे प्राधान्यक्रम राहिले, असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी शनिवारी पेण येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यात केले.

पेण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खणीकर्म पर्यटन क्रीडा फळोत्पादन युवक कल्याण माहिती जनसंपर्क व राजशिष्टाचार खात्याच्या राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश लाड हे उपस्थित होते.

या वेळी तटकरे यांनी मोदी सरकारच्या शेतकरी व कामगारविरोधी कायद्यावर हल्ला चढवला. सामान्य कामगार यामुळे देशोधडीला लागणार आहे. भांडवलधार्जिणे सरकार असेच या केंद्र सरकारचे धोरण आहे. पेणमधील गणेशमूर्तिकारांचा व्यवसाय व प्लास्टर आॅफ पॅरिसपासून गणेशमूर्ती बनवू नये, पीओपीवर घातलेली बंदी, याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना प्रत्यक्ष भेटून हा प्रश्न संसदेच्या सभागृहात उपस्थित करून समस्येचे निराकरण करणे गरजेचे आहे. याबरोबर पेण अर्बन सहकारी बँकेबाबत संसदेत ठेवीदारांचे हित रक्षण कायदा उपस्थित झाल्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या उपस्थितीत याही प्रश्नावर बोलताना या सहकारी बँकेबाबत एका चांगल्या बँकेमध्ये विलीनीकरण करावे, असेही खासदार म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडले. पक्ष संघटनेच्या सर्व पातळ्यांवर पक्षाच्या सर्व सेलवर नियुक्ती करून राष्ट्रवादी काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी आता सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकजूट होऊन काम करावे. सर्वसामान्यांची कामे, प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी आगामी काळात झटले पाहिजे. रायगडात राष्ट्रवादी काँगेस पक्ष एक नंबरचा बनेल, असे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आघाडी सरकार रोजगारनिर्मितीसाठी वेगवेगळे उपक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असून त्याचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून स्वयंरोजगार निर्मितीसाठी फिरत्या विक्री केंद्रासाठी अनेक वस्तू व पदार्थांची विक्री करून रोजगारनिर्मिती करता येईल. या सरकारी योजनांचा बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAditi Tatkareअदिती तटकरे