शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
5
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
6
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
7
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
8
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
9
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
10
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
11
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
14
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
15
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
16
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
17
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
18
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
19
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
20
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु

चारसूत्री भात लागवडीवर भर, कृषी विभागाचे साहाय्य; वेळ व आर्थिक बचत होणार

By निखिल म्हात्रे | Updated: July 3, 2024 17:02 IST

पारंपरिक भात लागवडीपासून शेतकऱ्यांना भाताचे उत्पादन मिळत नाही, अशी ओरड कायमच आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या पुढाकाराने चारसूत्री लागवड पद्धत सुरू करण्यात आली आहे.

अलिबाग : आठवडाभर झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील भात लावणी सुरू झाली आहे. त्यामध्ये चारसूत्री भात लागवडीवर शेतकऱ्यांनी अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये या आधुनिक पद्धतीचा अवलंब केला जात आहे.

पारंपरिक भात लागवडीपासून शेतकऱ्यांना भाताचे उत्पादन मिळत नाही, अशी ओरड कायमच आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या पुढाकाराने चारसूत्री लागवड पद्धत सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कृषी सहायकांनी गावागावात जाऊन चारसूत्री भात लागवड पद्धतीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.जिल्ह्यात यंदा पावसाने उशिरा एंट्री मारली आहे. त्यामुळे भात लावणीची कामेदेखील लांबणीवर गेली आहेत. आठ ते दहा दिवस लावणीची कामे उशिरा झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे; परंतु आठवडाभर पाऊस सुरू असल्याने सखल भागामध्ये पाणी साचले व शेतही पाण्याने भरून गेले आहे.

८०० हून अधिक हेक्टरवर चारसूत्री लागवड

पारंपरिक भात लावणीपेक्षा शेतकऱ्यांनी चारसूत्री भात लागवडीचे फायदे होत आहेत. या पद्धतीत कमी रोप लागते, शिवाय खर्चही कमी येतो. मजूरवर्ग कमी लागतो आणि उत्पादन अधिक मिळते. त्यामुळे कृषी विभागाने जनजागृती केली आहे. कृषी सहायकांच्या मदतीने या पद्धतीने लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ८०० हून अधिक हेक्टरवर चारसूत्री पद्धतीने लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

या लागवडीतून मजुरीच्या खर्चाची बचत होण्याबरोबर वेळही वाचला जात आहे. त्यामुळे ही पद्धत चांगली आहे, असा विश्वास आहे. चारसूत्री लागवड करताना स्वतः कृषी विभागाचे अधिकारी शेतावर असतात, असं प्रगतिशील शेतकरीप्रदीप गुरव म्हणाले.

टॅग्स :alibaugअलिबागFarmerशेतकरी