शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

‘एमआयडीसी’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, बंधाऱ्यांंच्या दुरुस्तीअभावी शहापूर-धेरंडमधील शेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 20:35 IST

Rajgad News: खाडीकिनारी असणाऱ्या बंधाऱ्यांची दुरुस्ती केली नसल्याने १५० शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक देखील वाय जात असल्याने तीन वर्षांची दाेन काेटी ६४ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करत ‘एमआयडीसी’विरोधातील रोष आता कायदेशीर लढाईतून व्यक्त केला जाणार आहे.

रायगड : अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंडमधील जमिनी एमआयडीसीने संपादित केल्या आहेत. परंतु खाडीकिनारी असणाऱ्या बंधाऱ्यांची दुरुस्ती केली नसल्याने १५० शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक देखील वाय जात असल्याने तीन वर्षांची दाेन काेटी ६४ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करत ‘एमआयडीसी’विरोधातील रोष आता कायदेशीर लढाईतून व्यक्त केला जाणार आहे.

अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंडमधील ३८७.७७ इतके हरी-२ मध्ये मोडणारे क्षेत्र नगर रचना विभागाची विनापरवानगी संपादित करण्यात आले. ही सर्व जमीन खारभूमीचे उपजाऊ क्षेत्र आहे. पण गेल्या तीन वर्षांपासून मोठे शहापूर पूर्व भागातील खार बंधिस्थीजवळ ५० मीटर लांबीचे व २० मीटर खोली असलेले भगदाड पडले आहे. त्यामुळे २५ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान येथील संरक्षण बांध फुटून हाताताेंडाशी आलेले भात पिकामध्ये खारे पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच भातशेतीचे पूर्व मशागतीचा खर्च, उत्पादनातील घट आणि रोजगार बुडाल्यामुळे तीन वर्षांत जवळपास दाेन काेटी ६४ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले असल्याने एमआयडीसीने शहापूर-धेरंड परिसरातील १५० शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाच्यामार्फत शेतकऱ्यांनी केली आहे.

३५० खार बंधारे दुर्लक्षितचया भागातील शेती, गावे उच्चतम भरती रेषेच्या दाेन मीटर खाली आहेत. या क्षेत्राचे संरक्षण गेली ३५० वर्षे खार बंधारे करीत आहेत. येथील जमिनी एमआयडीसीने २००९ साली संपादित केल्यानंतर या खार बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि नूतनीकरण याची जबाबदारी एमआयडीसीकडे आहे. हे समजावून देण्यासाठी शेतकऱ्यांना एमआयडीसीच्या अंधेरी येथील मुख्यालयाजवळ दोन वेळा आंदोलने केली आहेत.

आश्वासनांवरच बोळवण२३ नाेव्हेबर २०१९ रोजी श्रमिक मुक्ती दल आणि सहायक मुख्य कार्यकरी अधिकारी अविनाश सुबेदार यांच्या दालनात बैठक झाली. सदर बैठकीत संपादनाशी निगडित बांधाची जबाबदारी एमआयडीसीने घेण्याचे इतिवृत्तातील मुद्दा क्रमाक पाचमध्ये मान्य केले. परंतु तात्पुरत्या दुरुस्तीपलीकडे आजतागायत काहीही झालेले नाही.

सामाजिक चळवळीची जन्मभूमीया जमिनीत सरखेल कान्होजी आंग्रे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, दिवंगत ना. ना. पाटील, दिवंगत तांडेल, जागतिक कीर्तीच्या विचारवंत डॉ. गेल ओम्व्हेट, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या विचारांची आणि संघर्षाची बीज या मातीत दडली आहेत.

 एमआयडीसीने जमीन संपादित केल्यानंतर बांध बंधिस्थी सुस्थितीत ठेवण्याचे, त्याची दुरुस्ती करण्याचे मान्य केलेले आहे. असे असताना आता टाळाटाळ होत असल्याने त्यांची शिक्षा शेतकऱ्यांना भाेगावी लागत आहे. त्यामुळे आमचा हक्क मिळेपर्यंत कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने लढा सुरूच राहणार आहे.- राजन भगत, श्रमिक मुक्ती दल

टॅग्स :Raigadरायगड