शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम तुंगी गावात लवकरच पोहोचणार वीज

By admin | Updated: December 22, 2016 06:18 IST

तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या खांडस ग्रामपंचायतीमधील तुंगी गावात काही दिवसांनी वीज पोहचणार आहे. खासदार श्रीरंग बारणे

विजय मांडे / कर्जततालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या खांडस ग्रामपंचायतीमधील तुंगी गावात काही दिवसांनी वीज पोहचणार आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्लीमध्ये वन विभागाकडे केलेला पाठपुरावा आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत तुंगी गावाला वीज पोहोचावी म्हणून आमदार सुरेश लाड आणि जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. तीन किलोमीटर लांबीवरून तुंगी गावात सौदामिनी पोहोचावी या प्रस्तावास महावितरण कंपनीने अंतिम मंजुरी दिली आहे. तुंगी गावातील लोकांचा सौर दिव्याच्या प्रकाशात रात्र काढण्याचा दररोजचा प्रसंग आता कालबाह्य होणार आहे.तुंगी हे दुर्गम भागात वसलेले गाव वीज, रस्ता या पायाभूत सुविधांपासून कोसो दूर आहे. खांडस ग्रामपंचायतीमधील तुंगी गावाच्या पायथ्याशी पूर्वेकडे असलेल्या खांडस गावात पाझर तलाव आणि तर पाठीमागे असलेल्या डोंगरपाडा गावात देखील पाझरतलाव आजही काठोकाठ भरलेला आहे. असे असतानाही टेकडीवर असलेल्या तुंगीमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष असते. ८० घरांची वस्ती असलेल्या या गावात जाण्यासाठी रस्ता वन विभाग आपल्या जमिनीतून करू देत नाही, त्यामुळे विजेचे खांब देखील टाकता येत नाहीत.त्यामुळे या तुंगी गावात वर्षानुवर्षे अंधाराचे साम्राज कायम असते. त्यावर काही प्रमाणात मात करण्याचा प्रयत्न तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या अनसूया पादिर यांनी प्रथम तुंगी गावासाठी आपल्या निधीतून सौर दिवे दिले. त्यावेळी गावाच्या वेशी उजळण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने करून बघितला होता. त्यानंतर आदिवासी प्रकल्प विभागाने त्या गावातील घरात दिव्यांचा प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला. गावातील ८० घरातील प्रत्येक घरी एक असे ८० सौर दिवे दिले. २००५ मध्ये या गावाची दैना पावसाळ्यात दरडी कोसळून आणि आजूबाजूला असलेल्या डोंगरात भूस्खनन होऊन झाली. गाव विस्थापित करण्याची वेळ आहे. शेतजमीन त्या भागात असल्याने स्थानिकांनी त्याच भागात विस्थापन करण्याची मागणी केली होती. मात्र रखडलेले काम आजही त्याच स्थितीत असून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे यांनी समाज कल्याण विभागातून प्रत्येकी १५ हजार खर्च असलेले ४० सौर दिवे असलेले किट मंजूर करून घेतले. या सौर दिव्यांच्या किट आज तुंगीमधील प्रत्येक घरावर दिसून येतात. त्यामुळे सौर दिव्याच्या प्रकाशात आयुष्य काढावे लागेल अशी परिस्थिती असताना या भागाचे खासदार श्रीरंग बारणे कर्जत दौऱ्यावर आले असता त्यांनी खांडस भागात तुंगी ग्रामस्थांची भेट घेतली. वन विभागाकडे आपण पाठपुरावा करून रस्ता आणि विजेचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. पुढे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत खासदार बारणे, आमदार लाड,जिल्हा परिषद सदस्य पेमारे यांनी तुंगी गावाचा प्रश्न सतत लावून धरला होता. सततच्या पाठपुराव्याला यश आले असून महावितरण कंपनीने तुंगी गावातील विजेच्या प्रस्ताव वन विभागाकडे जमीन मिळण्यासाठी केला. वन विभागाने आपल्या जमिनीतून डोंगरपाडा ते तुंगी अशा मार्गात विजेचे खांब बसविण्यास मंजुरी दिल्यानंतर दीनदयाळ उपाध्याय जीवन ज्योती योजनेमधून वीज पुरवठा करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.