शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

मातीचा दर्जा खालावतोय, संशोधकांचे निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 01:04 IST

एक ग्रॅम माती (मृदा)निर्मितीसाठी २०० वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो.

अलिबाग : एक ग्रॅम माती (मृदा)निर्मितीसाठी २०० वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो. भरघोस आणि दर्जेदार पिकांचे उत्पादनासाठी माती सुपीक असणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या काही वर्षात मातीचा पर्यायाने शेतजमिनीचा दर्जा खालावत आहे.जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये १९ हजार ७५९ मातीचे नमुने तपासण्यात आले. २०१८-१९ मध्ये ५ हजार ७७८ माती नमुन्यांपैकी ३ हजार ४३४ मातीचे नमुने तपासण्यात आले आहेत. यंदा ५७ हजार ७८० मातीच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट असून बुधवार,५ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांना हे वाटप करणार असल्याची माहिती जिल्हा मृद सर्वेक्षणातील चाचणी अधिकारी श्याम धर्माधिकारी यांनी दिली.मातीचे नमुने तपासताना जमिनीतील आम्लविम्लनिर्देशांक (सामू), क्षारता, सेंद्रीय कर्ब, नत्र, स्फूरद, पालाश, गंधक, जस्त, बोरॉन, लोह, मँगनिज व तांबे या १२ घटकांची तपासणी करण्यात येते. त्याचे मातीतील क्षमतेवर प्रमाणपत्र दिले जाते. यंदा जागतिक मृदा दिनानिमित्त ‘मृदा प्रदूषणाचे उपाय व्हा!’असे घोषवाक्य तयार करण्यात आले आहे. गतवर्षी ‘पृथ्वीचे संरक्षण करू या, मातीच्या रक्षणाने’ असे घोषवाक्य तयार करण्यात आले होते.पाऊस, नद्यांना पूर, उधाणभरती, त्सुनामी आदींमुळे पाण्याच्या प्रवाहाचे पाणी शिरल्याने जमीन नापीक होते. बेसुमार वृक्षतोड व चराऊ कुरणे नष्ट झाल्याने ओसाड जमिनींवरील मातीची वाºयाद्वारे धूप होते. त्याचबरोबरच शहरीकरण, औद्योगिकीकरण, रस्ते विकास या भौतिक कारणांमुळेही उत्खनन, धूप होते. याचा परिणाम मातीचा दर्जा खालावण्यावर होतो. वारंवार एकच पीक घेतल्यानेही मातीतील कस कमी होतो.>भौगोलिक क्षेत्रफळापैकी ४२.५० टक्के जमीन नापिकी‘जागतिक मृदा दिन’ आयोजित करण्यामागे संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेची भूमिका महत्त्वाची आहे. जगभरात मातीशी निगडित प्रश्न गंभीर आहेतच, पण भारतातील जमीन प्रदूषित होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत खूप वाढले आहे. भारताच्या ३२८.७३ दशलक्ष जमीन क्षेत्रफळापैकी १२०.४० दशलक्ष म्हणजे ३६ टक्के जमीन नापीक होत चालली आहे. पाणी व हवेमुळे देशात दरवर्षी ५.३ अरब टन सुपीक मातीची धूप होऊन ती नष्ट होत आहे.महाराष्ट्राच्या ३.०७ दशलक्ष भौगोलिक क्षेत्रफळापैकी सुमारे ४२.५० टक्के जमीन खराब वा नापिकी आहे. परिणामी राज्यातील १५९ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र दुष्काळग्रस्त आहे. राज्यातील सुमारे १४६ लाख हेक्टर क्षेत्रफळावर माती आणि पाणी संवर्धनाची गरज विचारात घेवून ‘पाणी अडवा,पाणी जिरवा’, यासारख्या पाणी व जमीन संवर्धनाच्या योजना अमलात आणाव्या लागल्या आहेत.>मातीची गुणवत्ता बिघडण्याची कारणेपाण्याचा अतिवापर, दुर्भिक्ष, रासायनिक खतांचा असंतुलित वापर,एकच एक पीकवारंवार घेणे.रासायनिक खतांच्या चुकीच्या पद्धतीने वापरवा शिफारशीपेक्षा जास्त वापर.शेतातील पाण्याचा निचरा न झाल्याने ते मुळाशी साचून राहते, परिणामी मुळांना हवा न मिळाल्याने वाढ खुंटते.साचलेल्या पाण्यात मातीतील क्षार विरघळतात. सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने पाण्याचे बाष्पीभवन होवून पाण्यातील क्षार जमिनीत अडकतात.