शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

ई-रिक्षा आल्या, पर्यटकांना मात्र पायपीटचीच शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 09:42 IST

अनेक विघ्ने पार पडत शासनाने माथेरानमध्ये ई-रिक्षास परवानगी दिली.

मुकुंद रांजाणे, लोकमत न्यूज नेटवर्क माथेरान : अनेक विघ्ने पार पडत शासनाने माथेरानमध्ये ई-रिक्षास परवानगी दिली. परंतु, काही दिवसांपासून या रिक्षांच्या पाठीमागे साडेसाती सुरू झाली आहे. शहरात सात रिक्षा चालविण्यास परवानगी असताना प्रत्यक्षात चार ते पाच रिक्षा सुरू असल्याने पर्यटक, स्थानिक व विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सोसावा लागत आहे. माथेरानमध्ये अनेक वर्षांच्या संघर्षानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ई-रिक्षा सुरू करण्यात आल्या. गेल्यावर्षी पहिल्या टप्प्यात सात रिक्षा नगरपालिकेने खरेदी करून हा प्रकल्प सुरू केला.  पुढील आदेश येईपर्यंत या रिक्षा बंद अवस्थेतच पडून होत्या. त्यामुळे त्यातील काही रिक्षा या नादुरुस्त झाल्याचे उघड झाले होते.

...म्हणून हातरिक्षाचालक संतापलेमाथेरानमधील हातरिक्षाचालक हे अनेक दिवसांपासून या रिक्षा त्यांना मिळाव्यात यासाठी पाठपुरावा करीत आहेत. परंतु, मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने हातरिक्षाचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या हातरिक्षाचालक-मालक संघटनेने मोठा संघर्ष करून माथेरानकरिता ई-रिक्षा मिळविल्या होत्या. परंतु, त्याचा फायदा मात्र ठेकेदार घेत आहे, असा आरोप आहे.

वाहने नादुरुस्त का झाली?- हा प्रकल्प पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एक वर्षासाठी सुरू करण्यात आल्यानंतर या रिक्षांची दुरुस्ती करून पुन्हा ठेकेदारास चालवण्याकरिता देण्यात आल्या. - परंतु, योग्य ती काळजी न घेतली गेल्याने या रिक्षा आता नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे सातपैकी एक रिक्षा तर केव्हाच नादुरुस्त होऊन फक्त सहाच रिक्षा आता अस्तित्वात आहेत; पण त्यासुद्धा सातत्याने बंद पडत असतात.- तर, चार ते पाच रिक्षाच प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असतात. रिक्षाचालक योग्य ती काळजी घेत नसल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :RaigadरायगडMatheranमाथेरान