शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ई-रिक्षा आल्या, पर्यटकांना मात्र पायपीटचीच शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 09:42 IST

अनेक विघ्ने पार पडत शासनाने माथेरानमध्ये ई-रिक्षास परवानगी दिली.

मुकुंद रांजाणे, लोकमत न्यूज नेटवर्क माथेरान : अनेक विघ्ने पार पडत शासनाने माथेरानमध्ये ई-रिक्षास परवानगी दिली. परंतु, काही दिवसांपासून या रिक्षांच्या पाठीमागे साडेसाती सुरू झाली आहे. शहरात सात रिक्षा चालविण्यास परवानगी असताना प्रत्यक्षात चार ते पाच रिक्षा सुरू असल्याने पर्यटक, स्थानिक व विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सोसावा लागत आहे. माथेरानमध्ये अनेक वर्षांच्या संघर्षानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ई-रिक्षा सुरू करण्यात आल्या. गेल्यावर्षी पहिल्या टप्प्यात सात रिक्षा नगरपालिकेने खरेदी करून हा प्रकल्प सुरू केला.  पुढील आदेश येईपर्यंत या रिक्षा बंद अवस्थेतच पडून होत्या. त्यामुळे त्यातील काही रिक्षा या नादुरुस्त झाल्याचे उघड झाले होते.

...म्हणून हातरिक्षाचालक संतापलेमाथेरानमधील हातरिक्षाचालक हे अनेक दिवसांपासून या रिक्षा त्यांना मिळाव्यात यासाठी पाठपुरावा करीत आहेत. परंतु, मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने हातरिक्षाचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या हातरिक्षाचालक-मालक संघटनेने मोठा संघर्ष करून माथेरानकरिता ई-रिक्षा मिळविल्या होत्या. परंतु, त्याचा फायदा मात्र ठेकेदार घेत आहे, असा आरोप आहे.

वाहने नादुरुस्त का झाली?- हा प्रकल्प पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एक वर्षासाठी सुरू करण्यात आल्यानंतर या रिक्षांची दुरुस्ती करून पुन्हा ठेकेदारास चालवण्याकरिता देण्यात आल्या. - परंतु, योग्य ती काळजी न घेतली गेल्याने या रिक्षा आता नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे सातपैकी एक रिक्षा तर केव्हाच नादुरुस्त होऊन फक्त सहाच रिक्षा आता अस्तित्वात आहेत; पण त्यासुद्धा सातत्याने बंद पडत असतात.- तर, चार ते पाच रिक्षाच प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असतात. रिक्षाचालक योग्य ती काळजी घेत नसल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :RaigadरायगडMatheranमाथेरान