शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने किडीची शक्यता, तुडतुडा व करपा रोगाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 06:23 IST

जिल्ह्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर असलेली आंबा बागायत, १० हजार हेक्टर क्षेत्रावर असलेला काजू आणि ६ हजार हेक्टर क्षेत्रावर असलेल्या नारळ आणि आंतरपिकांतर्गत ४ हजार ५०० हेक्टरात सुपारी या पिकांवर गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ राहिलेले...

जयंत धुळप/ लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : जिल्ह्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर असलेली आंबा बागायत, १० हजार हेक्टर क्षेत्रावर असलेला काजू आणि ६ हजार हेक्टर क्षेत्रावर असलेल्या नारळ आणि आंतरपिकांतर्गत ४ हजार ५०० हेक्टरात सुपारी या पिकांवर गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ राहिलेले वातावरण आणि गेल्या ४ डिसेंबर रोजी झालेला अवकाळी पाऊ स यामुळे विपरीत परिणामाची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे तुडतुड्या कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून, करपा रोगाचीही शक्यता असल्याने आवश्यकत्या फवारण्या करून पिकांची काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.संपूर्ण कोकण विभागामध्ये आंबा, काजू आणि नारळ ही प्रमुख पिके असून, सद्यस्थितीत ही पिके वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आहेत. आंबा पीक विविध अवस्थेमध्ये असून, काही ठिकाणी फळे वाटाण्याच्या आकाराची झाली आहेत. काही बागांमध्ये मोहर फुटण्याच्या अवस्थेमध्ये असून बहुसंख्य बागांमध्ये पालवी पक्व होण्याच्या अवस्थेमध्ये आहे. वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे पालवी तसेच मोहोर अवस्थेत असलेल्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तुडतुडा व करपा यांच्या प्रादुर्भावामुळे फळांवर डाग येण्याची तसेच मोहोर करपण्याची शक्यता आहे. यावर तातडीची उपाययोजना कृषी विभागाने सुचविली आहे.काजू पीक वाढीच्या विविध अवस्थेमध्ये असून, काही बागांमध्ये नवीन पालवी येण्यास सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी नवीन पालवीतून मोहोर येऊ न फळधारणेस सुरुवात झाली आहे. ढगाळ वातावरण तसेच पाऊ स पडल्यामुळे काजूवर ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यासाठी लॅमडा सायहेलोथ्रिन ५ टक्के प्रवाही ६ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही १० मिली यापैकी एक कीटकनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्याबरोबर बागेमधील गवत काढून बाग त्वरित स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्यामुळे बागेतील आर्द्रता कमी होण्यास मदत होईल.किनापट्टीवरील भागात वादळामुळे नारळ आणि सुपारीची झाडे उन्मळून पडली असतील तर अशा झाडांची त्वरित विल्हेवाट लावावी. मेलेल्या झाडांची खोडे बागेत तशीच पडून राहिल्यास त्यामध्ये सोंड्या भुंगा आणि गेंड्या भुंगा या किडी आणि खोडावर वाढणाºया अळंबीची उत्पत्ती होऊ शकते. ती कालांतराने नारळ व सुपारी बागेचे नुकसान करू शकते. तसेच नारळावर कोंब कुजणे या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी नारळाच्या कोंबात कॉपर आॅक्सिक्लोराईड ५० टक्के प्रवाही २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण ओतावे, अशी उपाययोजना कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी सुचविली आहे.कृषी विभागाने सुचवलेली उपाययोजना१पाऊ स थांबल्यावर लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ०६ मिली किंवा इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के प्रवाही ३ मिली यापैकी एक कीटकनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.२या कीटकनाशकासोबत कार्बेनडॅझिम १२ टक्के अधिक मॅन्कोझेब ६३ टक्के हे संयुक्त बुरशीनाशक १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.३ज्या आंबा बागांमध्ये मोहर फुललेल्या अवस्थेमध्ये आहे, अशा ठिकाणी फळधारणेचे प्रमाण वाढविण्यासाठी २० पीपीएम एनएए (२० मिली ग्रॅम प्रति लिटर) फवारणी करावी.४भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आल्यास हेक्झॅकोनेझोल ५ टक्के प्रवाही ५ मिली किंवा गंधक ८० टक्के पाण्यात विरघळणारी पावडर २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.५पाऊ स पडल्यामुळे जमिनीत कोषावस्थेत असलेली फळमाशी बाहेर येऊ न फळे काढणीस तयार असणाºया बागांमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी फळमाशीच्या नियंत्रणासाठी आंबा बागेत रक्षक सापळे हेक्टरी ४ या प्रमाणात वापरावे.

टॅग्स :Natureनिसर्गRaigadरायगड