शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

पावसामुळे फुटला कर्जत तालुक्यातील उमरोली गावातील तलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 23:41 IST

कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीमधील उमरोली गावातील गाव तलाव सततच्या पावसाने फुटला आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीमधील उमरोली गावातील गाव तलाव सततच्या पावसाने फुटला आहे. मे महिन्यात त्या तलावातील गाळ आणि माती सरपंच सुनीता बुंधाटे यांच्या पुढाकाराने काढण्यात आला होता. दरम्यान, गाव तलाव फुटल्याने त्यातील सर्व पाणी हे वाहून गेले आहे. त्यामुळे उमरोली गावातील जनावरांचे यावर्षी पिण्याच्या पाण्यासाठी हाल होणार आहेत.कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यात असलेल्या उमरोली गावात जुना गाव तलाव आहे. त्या तलावात गेली अनेक वर्षे मोठ्या प्रमाणात गाळ साचून राहिला होता. तो गाळ काढण्याचे काम यावर्षी उन्हाळ्यात उमरोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीताबुंधाटे यांनी ग्रामनिधीमधून काढून घेतला होता. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात पावसाचे पाणी साचून राहणार होते. त्यामुळे उमरोली ग्रामस्थ यावर्षी आनंदात होते. मात्र गेली काही दिवस सातत्याने पाऊस पडत असून तलाव ओसंडून वाहत होता.१४ सप्टेंबर रोजी पहाटे त्या तलावाला भगदाड पडले आणि त्यातील सर्व पाणी हे तीन तासात वाहून गेले. त्यामुळे आता तलाव कोरडा पडला असून त्या तलावाकडे पाहून उमरोली ग्रामस्थ यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.उमरोली गावातील जनावरे आणि गुरे यांच्यासाठी ते पाणी उपयोगात यायचे. मात्र आता तलाव फुटून त्यातील सर्व पाणी वाहून गेल्याने उन्हाळ्यात जनावरे काय करतील? असा प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. पावसाळा सुरू आहे तोपर्यंत जनावरांसाठी पाण्याची अडचण भासणार नाही, मात्र उन्हाळ्यात कु ठण पाणी आणायची अशी चिंता ग्रामस्थांना सतावत आहे.