शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पावसामुळे रस्त्याची साइडपट्टी गेली वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 23:51 IST

पेपरमिल ते धानकान्हे हा १२.२५० कि.मी. चा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला होता.

मिलिंद अष्टीवकर रोहा : तालुक्यातील पेपरमिल ते धानकान्हे हा १२.२५० कि.मी. चा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला होता. २०१८ मध्ये पेपरमिल ते देवकान्हे हा ११ किमीपर्यंतचा रस्ता पूर्ण करण्यात आला होता. मात्र हा रस्ता पेपरमिल ते देवकान्हेपर्यंत पहिल्याच पावसात साइडपट्टी वाहून गेल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. या मार्गावरील वांदेलीच्या हद्दीतील रस्त्याच्या बाजूच्या साइडपट्टी वळणावर वाहून गेल्या आहेत. याशिवाय ठिकठिकाणी साइडपट्टीचा अभाव असल्याने व कालव्याच्या उंचीनुसार रस्त्याची उंची नसल्याने त्रासदायक ठरत आहे.या मार्गावरील पेपरमिल ते देवकान्हे या ११ किमी अंतरावरील काम पूर्ण झाले आहे. मात्र ३ मीटरचा रस्ता आणि दोन्ही बाजूला १.५० मीटर साइडपट्टी असणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही असे स्पष्ट ठिकठिकाणी असलेल्या साइडपट्टीवरुन दिसत आहे. आता या मार्गावरील रस्ता हा खराब झालेला आहे. साइडपट्ट्या वाहून गेल्या आहेत. कारपेटला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी करणे आवश्यक आहे अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.याच रस्त्याचा पुढील भाग असलेला देवकान्हे ते धानकान्हे हा १.२५० किमीचा रस्ता रखडला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने सर्व्हे केल्याप्रमाणे रस्ता मंजूर झाला होता. या रस्त्याची जागा अजून शेतकऱ्यांच्या नावावर असल्याने शेतकरी भूसंपादनाचे पैसे मागत आहेत. मात्र तशी तरतूद ही आपल्या बजेटमध्ये नसल्याने हा रस्ता रखडला आहे. रस्ता पूर्ण होण्यासाठी देवकान्हे ग्रुप ग्रामपंचायतीला शेतकऱ्यांची समजूत घालण्यासाठी पत्र दिले होते. मात्र ग्रामपंचायतीने शेतकरी तयार होत नाहीत असे स्पष्ट पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे आहे त्या स्थितीत रस्ता आमच्याकडून पूर्ण होणार नाही, असे जिल्हा परिषद शाखा अभियंता आनंद गोरे यांनी सांगितले.>रस्त्यांच्या कामाबाबत नागरिकांना शंकामुख्य रस्त्यावरुन सोनगाव, मालसई, कारिवणे, हार्डी, हाल, कवळठे, तळवडा आदिवासीवाडी चणेरा, डोलवहाल आणि तिसे हे रस्ते मुख्य रस्त्यापासून या गावांना जोडले जातात. या रस्त्यांची कोट्यवधीची मंजुरी जिल्हा नियोजन डेव्हलपमेंट कमिटीमधून झाली आहे. ही कामे तरी चांगली होतील ना असे स्थानिक नागरिकांतून विचारणा होत आहे.