शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

रुंदीकरणाच्या भरावामुळे वडखळमध्ये पुराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 00:11 IST

पेणच्या पश्चिम भागात मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाचे काम जलद गतीने सुरू आहे.

पेण : पेणच्या पश्चिम भागात मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाचे काम जलद गतीने सुरू आहे. रस्ता रुंदीकरणात महामार्गाची उंची जागोजागी वाढली आहे. जुलै महिन्यात होणारी अतिवृष्टी व समुद्राला येणाऱ्या उधाणामुळे डोंगरपट्ट्यातून येणारे पाणी नद्यामधून समुद्र-खाड्यामध्ये जाते; परंतु रुंदीकरणासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पेणच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसमोर ही परिस्थिती हाताळण्याचे आव्हान येत्या काही दिवसांत उभे राहणार आहे.वडखळ ग्रामपंचायती हद्दीतील लोकवस्तीला याचा सर्वात जास्त फटका बसणार आहे. रुंदीकरणासाठी केलेला भराव व शेतामध्ये केलेल्या मातीच्या भरावामुळे पावसाचे पाणी जाण्यासाठी आलेले नाले बुजले आहेत. त्यामुळे हे पाणी वडखळ हद्दीत तुंबून गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.राष्टÑीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या टप्प्याचे २०१७ पासून काम सुरू झाले. त्यामध्ये पहिला मुहूर्त १६ जून २०१४, दुसरा मुहूर्त ३१ मार्च २०१६, तिसरा मुहूर्त ३१ मार्च २०१८ होता, तरीही आजपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. सध्या उच्च न्यायालयात जून २०१९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले असून कामाच्या अंतिम मुदतीनंतरही बरीच कामे बाकी आहे. सध्या जागोजागी साकव, उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. पेण शहराच्या पश्चिम बाजूकडील राष्टÑीय महामार्गाच्या भरावाची उंची रामवाडी पुलाजवळ तब्बल अंदाजे ३० ते ३४ फूट इतकी ठिकाणी आहे. तर वडखळ बायपासचे उंच झालेले भराव तसेच धरमतर खाडीकिनारच्या परिसरात शेतीमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या भरावामुळे वडखळच्या इंद्रनगर, नवेगाव या डोंगरपट्टीतून येणारे पावसाचे पाणी वडखळ गावात पाणी तुंबणार आहे.पेण शहरालगत भोगावती नदीपात्रातून येणारे डोंगरपट्टीमधील पावसाच्या पाण्याचा प्रवाह वितरण व्यवस्थेत मोठा अटकाव निर्माण करणारा आहे. महसूल यंत्रणेने या परिस्थितीचा अहवाल वरिष्ठांना देणे गरजेचे आहे. याबाबत वडखळ ग्रामपंचायत सरपंच राजेश मोकल व ग्रामविकास अधिकारी यांनी संभाव्य धोके लक्षात घेऊन या बाबत रायगड जिल्हाधिकारी, पेण प्रांत अधिकारी, पेण तहसीलदार यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.पळस्पे-इंद्रापूर राष्टÑीय महामार्गाचा ८४ कि.मी. टप्पा असून, महामार्गाच्या भरावाचे काम पेण खारपाडा ते पेण आमटेमपर्यंत पूर्ण झालेले आहे. बºयाच ठिकाणच्या साकव व मोरींचे काम तसेच उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी काम सुरू आहे, त्या ठिकाणी दररोज वाहतूककोंडीचा सामना प्रवासी व वाहनचालकांना करावा लागत आहे.