शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

रुंदीकरणाच्या भरावामुळे वडखळमध्ये पुराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 00:11 IST

पेणच्या पश्चिम भागात मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाचे काम जलद गतीने सुरू आहे.

पेण : पेणच्या पश्चिम भागात मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाचे काम जलद गतीने सुरू आहे. रस्ता रुंदीकरणात महामार्गाची उंची जागोजागी वाढली आहे. जुलै महिन्यात होणारी अतिवृष्टी व समुद्राला येणाऱ्या उधाणामुळे डोंगरपट्ट्यातून येणारे पाणी नद्यामधून समुद्र-खाड्यामध्ये जाते; परंतु रुंदीकरणासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पेणच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसमोर ही परिस्थिती हाताळण्याचे आव्हान येत्या काही दिवसांत उभे राहणार आहे.वडखळ ग्रामपंचायती हद्दीतील लोकवस्तीला याचा सर्वात जास्त फटका बसणार आहे. रुंदीकरणासाठी केलेला भराव व शेतामध्ये केलेल्या मातीच्या भरावामुळे पावसाचे पाणी जाण्यासाठी आलेले नाले बुजले आहेत. त्यामुळे हे पाणी वडखळ हद्दीत तुंबून गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.राष्टÑीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या टप्प्याचे २०१७ पासून काम सुरू झाले. त्यामध्ये पहिला मुहूर्त १६ जून २०१४, दुसरा मुहूर्त ३१ मार्च २०१६, तिसरा मुहूर्त ३१ मार्च २०१८ होता, तरीही आजपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. सध्या उच्च न्यायालयात जून २०१९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले असून कामाच्या अंतिम मुदतीनंतरही बरीच कामे बाकी आहे. सध्या जागोजागी साकव, उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. पेण शहराच्या पश्चिम बाजूकडील राष्टÑीय महामार्गाच्या भरावाची उंची रामवाडी पुलाजवळ तब्बल अंदाजे ३० ते ३४ फूट इतकी ठिकाणी आहे. तर वडखळ बायपासचे उंच झालेले भराव तसेच धरमतर खाडीकिनारच्या परिसरात शेतीमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या भरावामुळे वडखळच्या इंद्रनगर, नवेगाव या डोंगरपट्टीतून येणारे पावसाचे पाणी वडखळ गावात पाणी तुंबणार आहे.पेण शहरालगत भोगावती नदीपात्रातून येणारे डोंगरपट्टीमधील पावसाच्या पाण्याचा प्रवाह वितरण व्यवस्थेत मोठा अटकाव निर्माण करणारा आहे. महसूल यंत्रणेने या परिस्थितीचा अहवाल वरिष्ठांना देणे गरजेचे आहे. याबाबत वडखळ ग्रामपंचायत सरपंच राजेश मोकल व ग्रामविकास अधिकारी यांनी संभाव्य धोके लक्षात घेऊन या बाबत रायगड जिल्हाधिकारी, पेण प्रांत अधिकारी, पेण तहसीलदार यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.पळस्पे-इंद्रापूर राष्टÑीय महामार्गाचा ८४ कि.मी. टप्पा असून, महामार्गाच्या भरावाचे काम पेण खारपाडा ते पेण आमटेमपर्यंत पूर्ण झालेले आहे. बºयाच ठिकाणच्या साकव व मोरींचे काम तसेच उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी काम सुरू आहे, त्या ठिकाणी दररोज वाहतूककोंडीचा सामना प्रवासी व वाहनचालकांना करावा लागत आहे.