शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

रुंदीकरणाच्या भरावामुळे वडखळमध्ये पुराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 00:11 IST

पेणच्या पश्चिम भागात मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाचे काम जलद गतीने सुरू आहे.

पेण : पेणच्या पश्चिम भागात मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाचे काम जलद गतीने सुरू आहे. रस्ता रुंदीकरणात महामार्गाची उंची जागोजागी वाढली आहे. जुलै महिन्यात होणारी अतिवृष्टी व समुद्राला येणाऱ्या उधाणामुळे डोंगरपट्ट्यातून येणारे पाणी नद्यामधून समुद्र-खाड्यामध्ये जाते; परंतु रुंदीकरणासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पेणच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसमोर ही परिस्थिती हाताळण्याचे आव्हान येत्या काही दिवसांत उभे राहणार आहे.वडखळ ग्रामपंचायती हद्दीतील लोकवस्तीला याचा सर्वात जास्त फटका बसणार आहे. रुंदीकरणासाठी केलेला भराव व शेतामध्ये केलेल्या मातीच्या भरावामुळे पावसाचे पाणी जाण्यासाठी आलेले नाले बुजले आहेत. त्यामुळे हे पाणी वडखळ हद्दीत तुंबून गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.राष्टÑीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या टप्प्याचे २०१७ पासून काम सुरू झाले. त्यामध्ये पहिला मुहूर्त १६ जून २०१४, दुसरा मुहूर्त ३१ मार्च २०१६, तिसरा मुहूर्त ३१ मार्च २०१८ होता, तरीही आजपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. सध्या उच्च न्यायालयात जून २०१९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले असून कामाच्या अंतिम मुदतीनंतरही बरीच कामे बाकी आहे. सध्या जागोजागी साकव, उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. पेण शहराच्या पश्चिम बाजूकडील राष्टÑीय महामार्गाच्या भरावाची उंची रामवाडी पुलाजवळ तब्बल अंदाजे ३० ते ३४ फूट इतकी ठिकाणी आहे. तर वडखळ बायपासचे उंच झालेले भराव तसेच धरमतर खाडीकिनारच्या परिसरात शेतीमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या भरावामुळे वडखळच्या इंद्रनगर, नवेगाव या डोंगरपट्टीतून येणारे पावसाचे पाणी वडखळ गावात पाणी तुंबणार आहे.पेण शहरालगत भोगावती नदीपात्रातून येणारे डोंगरपट्टीमधील पावसाच्या पाण्याचा प्रवाह वितरण व्यवस्थेत मोठा अटकाव निर्माण करणारा आहे. महसूल यंत्रणेने या परिस्थितीचा अहवाल वरिष्ठांना देणे गरजेचे आहे. याबाबत वडखळ ग्रामपंचायत सरपंच राजेश मोकल व ग्रामविकास अधिकारी यांनी संभाव्य धोके लक्षात घेऊन या बाबत रायगड जिल्हाधिकारी, पेण प्रांत अधिकारी, पेण तहसीलदार यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.पळस्पे-इंद्रापूर राष्टÑीय महामार्गाचा ८४ कि.मी. टप्पा असून, महामार्गाच्या भरावाचे काम पेण खारपाडा ते पेण आमटेमपर्यंत पूर्ण झालेले आहे. बºयाच ठिकाणच्या साकव व मोरींचे काम तसेच उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी काम सुरू आहे, त्या ठिकाणी दररोज वाहतूककोंडीचा सामना प्रवासी व वाहनचालकांना करावा लागत आहे.