शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे खचतोय वेळास-आदगाव रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 00:04 IST

वेळास - आदगाव मार्गावरील रस्ता खचत जात असल्याचे दिसते.

गणेश प्रभाळे दिघी : तालुक्यातील वेळास - आदगाव मार्गावरील रस्ता खचत जात असल्याचे दिसते. सध्या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे रस्त्याला पाच इंच साइडपट्टी राहिल्याने या खड्ड्यांत दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याने याची त्वरित दखल घेण्याची मागणी होत आहे.श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन दृष्टिकोनातून प्रमुख असे समुद्रकिनारे विशेषत: प्रसिद्धीस आले आहेत. त्यामध्ये श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, कोंडविल या किनाऱ्यांचा समावेश आहे. त्यातच, वेळास व आदगाव समुद्रकिनारा देखील पर्यटकांच्या विशेष पसंतीचा आहे. कारण या समुद्र किनाºयाचे वैशिष्ट्य म्हणजे हा खडकाळ समुद्रकिनारा आहे. खडकावर आपटणाºया सागरलाटा पर्यटकांस आकर्षित करतात. त्यामुळे पावसाळी पर्यटकांसह स्थानिक रहिवाशांचीही गर्दी या ठिकाणी होते. दिवेआगरहून मुरुड जंजिºयाकडे जाताना दिघी रस्त्याला अलीकडेच वेळास फाटा येथून दोन कि.मी.वर हा समुद्रकिनारा आहे. या किनाºयालगत रस्त्याला पावसाळी हंगामात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आहे. मात्र, सद्यस्थितीत वेळास - आदगाव या मार्गावर संरक्षण भिंत नसल्याने हा रस्ता खचण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.वेळासपासून आदगाव हा मार्ग पूर्ण समुद्रालगत आहे. मुंबईतील मरीन ड्राइव्हसारखे आकर्षण या ठिकाणी दृष्टिक्षेपात येते. विस्तीर्ण समुद्र किनारा असल्याने पर्यटक देखील या ठिकाणी भेट देतात. रस्त्यालगत समुद्र धूपप्रतिबंधक बंधारा आहे मात्र, तोही काही अंतराचा आहे. समुद्राच्या जोरदार लाटांमुळे रस्त्याची आणखी दुर्दशा होत आहे. जोरदार पावसात हा रस्ता पूर्ण पडण्याची भीती आहे. वेळीच दुरुस्ती झाली नाही तर वेळास व आदगाव या दोन्ही गावांचा संपर्क तुटू शकतो. आदगावकडे जाणाºया मार्गातून प्रवास करताना वाहन चालकाला रस्त्याच्या बाजूला मोठा खड्डा पाच ते सहा फूट खोल असताना त्याच खड्ड्याच्या बाजूला रस्त्याच्या कडेवरून भीतिदायक प्रवास करण्याची वेळ आली आहे. मात्र, संबंधित विभाग याकडे लक्ष देत नसल्याने अनर्थ घडू शकतो. यामुळे चालक, प्रवाशांकडून संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

।सूचना फलक नाहीसागरी मार्ग म्हटल्यावर समुद्राची भरती ओहोटी लाटांचा मारा या गोष्टी लक्षात घेतल्यास रस्त्याची वारंवार करावी लागणारी देखभाल न झाल्याने वेळास-आदगाव रस्ता पूर्णपणे खचला आहे. मुख्य जिल्हा मार्ग असल्याने रस्त्याच्या देखरेखीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्यावर आहे.विशेष म्हणजे अधिकाऱ्यांना या रस्त्याची कल्पना असून देखील तात्काळ दुरुस्ती किंवा धोकादायक सूचना फलक लावले नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. काही दिवसातच पडणाºया पावसामुळे साइडपट्टी खचलेल्या ठिकाणी रस्ता खचला आहे. रस्त्याची दुरुस्ती होवून संरक्षक कठड्यांची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.>अपघाताची जास्त शक्यतासार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असणारा हा रस्ता वेळास ते आदगाव हा तीन किलोमीटर अंतराचा रस्ता असून रस्त्याच्या कडेला खोल खड्डे आहेत. समोरून येणाºया वाहनांना साइडपट्टी खचल्यामुळे एकमेकांची धडक लागून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रस्त्यालगत संरक्षक कठडे तेही पूर्ण मोडकळीस आल्याने व साइडपट्टी खचल्याने वाहन खड्ड्यात पडून दुर्घटना होऊ शकते. वाहनचालकांना जीव मुठीत धरून या ठिकाणाहून वाहने चालवावी लागत आहेत. काही दिवसातच मुसळधार पावसामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.>वेळास येथील खचलेल्या रस्त्यावर दरवर्षी सार्वजनिक बांधकाम खाते माती टाकून भराव करते. मात्र, पावसाळ्यात पुन्हा पुन्हा रस्ता खचतो. बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. कायमस्वरूपी संरक्षण भिंतीसह पक्के रस्ते व्हावे.- धवल तवसालकर,ग्रामस्थ, वेळासवेळास - आदगाव रस्त्याला ७०० ते ८०० मीटर लांबीची संरक्षण भिंत होण्यासाठी वरिष्ठांना पत्रक दिले आहे. सध्या उपाययोजना करण्यात येईल.- श्रीकांत गनगणे, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीवर्धन.