शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

द्रोणागिरी किल्ला मोजतोय अखेरची घटका, ओएनजीसीच्या बंधनांमुळे किल्ल्याची डागडुजी अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 00:04 IST

Dronagiri fort News : रायगड जिल्ह्यातील उरण शहरालगत असलेल्या द्रोणागिरी डोंगरमाथ्यावर ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला आहे. डोंगरमाथ्यावर किल्ला तर डोंगराच्या पायथ्याशी कोळी-आगऱ्यांच्या द्रोणागिरी देवीचे स्थान आहे.

- मधुकर ठाकूर उरण : सोळाव्या शतकातील देवगिरीच्या यादव राजवटीतील उरणच्या द्रोणागिरी डोंगरमाथ्यावर असलेला ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला कायमच दुर्लक्षित राहिला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी ओएनजीसी असल्याने पुरातन विभागही या किल्ल्याकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे असंरक्षित राहिलेल्या द्रोणागिरी किल्ल्याचा ऐतिहासिक दुर्मीळ ठेवा पडझडीमुळे दृष्टिआड होण्याच्या मार्गावर आहे.रायगड जिल्ह्यातील उरण शहरालगत असलेल्या द्रोणागिरी डोंगरमाथ्यावर ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला आहे. डोंगरमाथ्यावर किल्ला तर डोंगराच्या पायथ्याशी कोळी-आगऱ्यांच्या द्रोणागिरी देवीचे स्थान आहे. उरण तालुक्यातील करंजा गावाजवळ असलेला किल्ला ऐतिहासिक काळापासूनच महत्त्वपूर्ण राहिलेला आहे. सोळाव्या शतकातील देवगिरीच्या यादव राजवटीतील किल्ल्याची १५३० मध्ये पोर्तुगीज लोकांनी डागडुजी केली. १५३५ मध्ये अँटोनो-डे-पोर्टो यांनी नोसा सेन्होरा, एन.एस.डी. पेना आणि सॅम फ्रान्सिस्को या तीन चर्च बांधले. १६ व्या शतकात हा किल्ला आदिलशहाने ताब्यात घेतला. १० मार्च, १७३९ रोजी हा किल्ला मनाजी आंग्रे यांनी ताब्यात घेतला. या किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष आजही गडावर दिसतात. तेथे एक चर्च आहे. येथे असलेल्या मूर्ती शिलालेखशिवाय आहेत. चर्च आतल्या तटबंदीमध्ये आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा चर्चच्या दक्षिणेस ५० मीटर अंतरावर आहे. गेटची कमान तुटलेली आहे. संरक्षकांच्या खोल्यांचीही स्थितीही दयनीय आहे. गल्लीच्या दगडावर कोरलेला गणपती एका संरक्षक कक्षात ठेवला आहे. दयनीय झालेल्या अवस्थेत वेताळ मंदिर आहे.या द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी ओएनजीसी प्रकल्प आहे. प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी या डोंगरावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा सशस्त्र पहारा आहे.द्रोणागिरी किल्ल्याची नोंद राष्ट्रीय राज्य संरक्षित स्मारकातही नोंद नसल्याचे सांगण्यात येत आहे. या किल्ल्यांची एमएमआरडीएने नोंद घेण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, तेही प्रयत्न विफल ठरले आहेत. येथील ओएनजीसी प्रकल्पांच्या काही बंधनांमुळे पुरातन विभागही या किल्ल्याकडे लक्ष देण्यास राजी नाही. त्यामुळे असंरक्षित राहिलेला द्रोणागिरी किल्ल्याचा ऐतिहासिक दुर्मीळ ठेवा पडझडीमुळे दृष्टिआड होण्याच्या मार्गावर लागला आहे. परिसरातील काही गड, दुर्गप्रेमी संस्थांकडून किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, ते पुरेसे नसल्याने राज्य संरक्षित स्मारक विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया गड, दुर्गप्रेमी संस्थेचे सदस्य डॉ.सत्यजीत ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. 

ओएनजीसीने द्रोणागिरी डोंगर परिसरातील काही भाग सील करून प्रकल्पाच्या सुरक्षिततेसाठी सीआयएसएफचे जवान तैनात केले आहेत. किल्ल्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने दुरुस्ती करण्यासाठी आधी असंरक्षित स्मारक संरक्षित करण्याची गरज आहे. या आधीही किल्ल्याची एमएमआरडीएने नोंद घेण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत.    - डॉ. मयूर ठाकरे,     (राष्ट्रीय स्मारक विभागाचे   टेक्निकल असिस्टंट, पुरातत्त्व     विभागाचे जनसंपर्क अधिकारी)  

टॅग्स :Raigadरायगड