शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

भान ठेऊन चालवा वाहन, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे प्रतिपादन 

By निखिल म्हात्रे | Updated: January 25, 2024 17:24 IST

शाळा, महाविद्यालयांत वाहतूक सुरक्षा जनजागृती कार्यक्रम.

निखिल म्हात्रे,अलिबाग : सध्या मोटारसायकल अपघाताबरोबरच त्यामधील मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गाडी चालवित असताना आपल्या घरी आपले कुटुंब वाट पाहत आहे. हे भान ठेऊन मोटारसायकल चालकाने गाडी चालवावी, असा सल्ला जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला. तसेच यंदा अपघातात २० टक्क्यांनी मृत्युमुखी पडण्याच्या संख्येत घट झाल्याचे सांगत कमीत कमी अपघात होण्यासाठी वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याकडे घार्गे यांनी लक्ष वेधले.

रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील माध्यमिक शाळा व महाविद्यालयात वाहतूक सुरक्षा जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले होते. यावेळी घार्गे बोलत होते. अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, वाहतूक पोलिस निरीक्षक अनिल लाड, वाहतूक कर्मचारी, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

घार्गे म्हणाले की, जिल्ह्यात सध्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ती थांबविण्यासाठी सध्या वाहतूक विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत महाविद्यालयातील मुलांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. सध्या अल्पवयीन मुले महाविद्यालयात येण्यासाठी मोटारसायकलचा आग्रह करताना दिसत आहेत. तर त्यांचे पालकही मोठ्या उत्साहात त्यांचे हट्ट पुरविताना दिसत आहेत. त्यामुळे मुलांमध्ये बेजबाबदारपणा वाढत चालला आहे. याला आळा घालण्यासाठी आता वाहतूक विभागाने पुढाकार घेतला आहे. या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगत ते त्यांनी अंगिकारण्याची गरज आहे.

अपघात कमी करण्यासाठी विशेष दक्षता :

जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस वाहतूक शाखेमार्फत विशेष दक्षता घेतली जात आहे. विना हेल्मेट वाहन चालकांवर कारवाई, ड्रंक अँण्ड ड्राइव्ह तापासणी, महामार्गावर चारचाकी गाड्यांचा वेग तपासणे, सीटबेल्ट न लावणाऱ्या चालकांवर कारवाई यासह गाडी चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या मोटारसायकलस्वारांवरही कारवाई सुरू आहे. त्यामुळे सध्या अपघातांचे प्रमाण कमी होत असल्याचे जिल्हा वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल लाड यांनी सांगितले.

टॅग्स :alibaugअलिबागPoliceपोलिस